शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती बैठक : नांदगाव ५६ खेडी योजनेला नवीन मंजुरी

By admin | Updated: July 4, 2017 00:28 IST

ग्रामसडक, कुपोषणावर वादळी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय पुन्हा जिल्हा परिषदेच्या आवारात आणावे, तसेच या योजनेत कामे मंजूर करताना त्यात जिल्हा परिषद सदस्यांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा, असा ठराव सोमवारी (दि.३) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.दरम्यान, कुपोषण, शिक्षक बदल्या, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती यावरून सभा वादळी ठरली. बैठकीस अध्यक्ष शीतल सांगळे, सभापती सुनीता चारोस्कर, मनीषा पवार, यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, बाळासाहेब क्षीरसागर, यतिन कदम, भास्कर गावित, शंकरराव धनवटे, डॉ. भारती पवार, सविता पवार, किरण थोरे आदी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे चुकीच्या प्राधान्यक्रमाने मंजूर करण्यात आल्याचा आरोप सभापती यतिन पगार यांनी केला. उपअभियंता हेमंत पाटील यांनी आमदारांच्या समितीने सूचविलेल्या कामांनुसार तसेच प्राधान्यक्रमानुसार ही कामे मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. कामे बदलायची असतील, तर आमदारांकरवी बदला, असे सांगताच सभागृहातील सदस्य संतप्त झाले. आमदार आणि आमच्यात वाद लावू नका, असे यतिन कदम व यतिन पगार यांनी सांगितले. आसखेडा ते शिरपूरवाडे हा रस्ता रहदारी नसताना मंजूर करण्यात आल्याचे यतिन पगार यांनी सांगितले तर चाटोरी ते भेंडाळी हा रस्ताही असाच रहदारी नसताना मंजूर करण्यात आल्याचा आरोप यतिन कदम यांनी केला. १२८ कोटींचे रस्ते होत असताना बदनामी मात्र जिल्हा परिषदेची होत आहे, असे यतिन कदम यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय जिल्हा परिषदेच्या आवारात हलवावे, अशी मागणी केली. यतिन पगार यांनी या कार्यालयासाठी आपण स्वत:च्या कार्यालयाची जागा देतो, पण हे कार्यालय आधी नाशिकला स्थलांतरित करावे, अशी सूचना मांडली. अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराची केळी आणि अंडी उपलब्ध होत नसल्याचा आरोप भास्कर गावित यांनी केला. तर कुपोषणावर लाखो रुपये खर्च होऊनही आदिवासी भागातील कुपोषित बालकांची संख्या वाढतच असल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले. डॉ. आत्माराम कुंभार्डे आणि सविता पवार यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्यांची बांधकामे होत नसल्याकडे लक्ष वेधले. जागा मिळत नसल्यानेच अंगणवाड्यांची कामे प्रलंबित राहत असल्याचा खुलासा दीपककुमार मीना यांनी केला. अपंग महिलेवर अन्यायडॉ. भारती पवार यांनी, प्रशासनाने एका अपंग महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निता धनंजय पवार या महिलेबाबत थेट अपंग आयुक्तांनी दखल घेत जिल्हा परिषदेला पत्र दिल्याचे सांगितले. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी या महिलेसह अन्य तीन असे चौघांवर अन्याय झाल्याची कबुली दिली. प्रवर्ग बदलल्याने त्यांच्यावर अन्याय झाला असून, त्यांना १५ दिवसांपूर्वीच सोयीचे ठिकाणी बदली देण्यात आल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी डॉ. भारती पवार यांनी केली.नांदगाव ५६ खेडी पाणी योजनेला मंजुरीयतिन कदम यांनी नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेच्या सेसचा कोट्यवधीचा खर्च होत असताना प्रत्यक्षात वसुली लाखातच होत असल्याचा आरोप करीत या योजनेतील पाणीगळती रोखली तर जिल्हा परिषदेचा लाखोेंचा निधी वाचणार असल्याचे सांगितले. बांधकाम सभापती मनिष पवार यांनी यासंदर्भात नांदगावला नुकतीच एक बैठक घेऊन या योजनेबाबत सरपंचांना माहिती दिल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी या योजनेची नेमकी किती गळती आहे. याचा अहवाल पुढील बैठकीस सादर करावा, असे आदेश अनिल लांडगे यांनी दिले. डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी या योजनेला पर्यायी योजना शासनाकडे मंजुरीला पाठवा, असे सांगितले. त्यावर कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नांदगाव- ५६ खेडी योजनेला पर्यायी योजना तत्वत: मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.