शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती बैठक : नांदगाव ५६ खेडी योजनेला नवीन मंजुरी

By admin | Updated: July 4, 2017 00:28 IST

ग्रामसडक, कुपोषणावर वादळी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय पुन्हा जिल्हा परिषदेच्या आवारात आणावे, तसेच या योजनेत कामे मंजूर करताना त्यात जिल्हा परिषद सदस्यांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा, असा ठराव सोमवारी (दि.३) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.दरम्यान, कुपोषण, शिक्षक बदल्या, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती यावरून सभा वादळी ठरली. बैठकीस अध्यक्ष शीतल सांगळे, सभापती सुनीता चारोस्कर, मनीषा पवार, यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, बाळासाहेब क्षीरसागर, यतिन कदम, भास्कर गावित, शंकरराव धनवटे, डॉ. भारती पवार, सविता पवार, किरण थोरे आदी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे चुकीच्या प्राधान्यक्रमाने मंजूर करण्यात आल्याचा आरोप सभापती यतिन पगार यांनी केला. उपअभियंता हेमंत पाटील यांनी आमदारांच्या समितीने सूचविलेल्या कामांनुसार तसेच प्राधान्यक्रमानुसार ही कामे मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. कामे बदलायची असतील, तर आमदारांकरवी बदला, असे सांगताच सभागृहातील सदस्य संतप्त झाले. आमदार आणि आमच्यात वाद लावू नका, असे यतिन कदम व यतिन पगार यांनी सांगितले. आसखेडा ते शिरपूरवाडे हा रस्ता रहदारी नसताना मंजूर करण्यात आल्याचे यतिन पगार यांनी सांगितले तर चाटोरी ते भेंडाळी हा रस्ताही असाच रहदारी नसताना मंजूर करण्यात आल्याचा आरोप यतिन कदम यांनी केला. १२८ कोटींचे रस्ते होत असताना बदनामी मात्र जिल्हा परिषदेची होत आहे, असे यतिन कदम यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय जिल्हा परिषदेच्या आवारात हलवावे, अशी मागणी केली. यतिन पगार यांनी या कार्यालयासाठी आपण स्वत:च्या कार्यालयाची जागा देतो, पण हे कार्यालय आधी नाशिकला स्थलांतरित करावे, अशी सूचना मांडली. अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराची केळी आणि अंडी उपलब्ध होत नसल्याचा आरोप भास्कर गावित यांनी केला. तर कुपोषणावर लाखो रुपये खर्च होऊनही आदिवासी भागातील कुपोषित बालकांची संख्या वाढतच असल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले. डॉ. आत्माराम कुंभार्डे आणि सविता पवार यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्यांची बांधकामे होत नसल्याकडे लक्ष वेधले. जागा मिळत नसल्यानेच अंगणवाड्यांची कामे प्रलंबित राहत असल्याचा खुलासा दीपककुमार मीना यांनी केला. अपंग महिलेवर अन्यायडॉ. भारती पवार यांनी, प्रशासनाने एका अपंग महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निता धनंजय पवार या महिलेबाबत थेट अपंग आयुक्तांनी दखल घेत जिल्हा परिषदेला पत्र दिल्याचे सांगितले. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी या महिलेसह अन्य तीन असे चौघांवर अन्याय झाल्याची कबुली दिली. प्रवर्ग बदलल्याने त्यांच्यावर अन्याय झाला असून, त्यांना १५ दिवसांपूर्वीच सोयीचे ठिकाणी बदली देण्यात आल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी डॉ. भारती पवार यांनी केली.नांदगाव ५६ खेडी पाणी योजनेला मंजुरीयतिन कदम यांनी नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेच्या सेसचा कोट्यवधीचा खर्च होत असताना प्रत्यक्षात वसुली लाखातच होत असल्याचा आरोप करीत या योजनेतील पाणीगळती रोखली तर जिल्हा परिषदेचा लाखोेंचा निधी वाचणार असल्याचे सांगितले. बांधकाम सभापती मनिष पवार यांनी यासंदर्भात नांदगावला नुकतीच एक बैठक घेऊन या योजनेबाबत सरपंचांना माहिती दिल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी या योजनेची नेमकी किती गळती आहे. याचा अहवाल पुढील बैठकीस सादर करावा, असे आदेश अनिल लांडगे यांनी दिले. डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी या योजनेला पर्यायी योजना शासनाकडे मंजुरीला पाठवा, असे सांगितले. त्यावर कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नांदगाव- ५६ खेडी योजनेला पर्यायी योजना तत्वत: मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.