शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

एस.टी. महामंडळाची वारी हुकल्याने सलग दुसऱ्या वर्षी दीड कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

नाशिक: यात्रा, जत्राच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाला मोठे उत्पन्न मिळत असते. धार्मिक सण, उत्सवाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी ...

नाशिक: यात्रा, जत्राच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाला मोठे उत्पन्न मिळत असते. धार्मिक सण, उत्सवाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी जादा गाड्यांचेदेखील नियोजन केले जाते; मात्र या दोन वर्षांच्या काळात धार्मिक स्थळांवर तसेच यात्रा, जत्रांवर निर्बंध असल्याचा फटका एस.टी. महामंडळालादेखील बसला आहे. पंढरपूरच्या यात्रेसाठी नाशिक विभागाला दरवर्षी दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळते; मात्र सलग दुसऱ्या वर्षी महामंडळाला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

सन २०१९ मधील पंढरपूर यात्रेची आकडेवारी पाहिली तर त्यावरून महामंडळाला गेल्या दोन वर्षात माेठा आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते.

२०१९ मध्ये नाशिकच्या एस.टी.महामंडळाला दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले हेाते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा लाख रुपये अधिक उत्पन्न मिळाले होते. जिल्ह्यातील १३ डेपोंमधून सुमारे २९५ बसेस सोडण्यात आल्या होत्या.

३०० : बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या

१ कोटी ६० लाख रुपये उत्पन्न मिळायचे एस.टीला

३६०००: प्रवासी एस.टीतून दरवर्षी प्रवास करायचे

--इन्फो--

संतश्री निवृत्तीनाथ पालखीसाठी दोन बसेस

शासनाच्या आदेशाप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या पालखीसाठी दोन बसेस पुरविण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार या बसेस विनामूल्य देण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठीदेखील या बसेस उपलब्ध राहणार आहेत.

--इन्फो--

नाशिक जिल्ह्यातून संतश्री निवृृत्तीनाथ पालखी

राज्यातील दहा मानाच्या पालख्यांमध्ये त्र्यंबकेश्वर येथून निघणारी संतश्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश आहे. कोरेानामुळे यंदा बसमधून पालखी वाखरीपर्यंत रवाना झाली असली तरी यापूर्वी या दिंडीत जिल्ह्यातील सुमारे ३०० ते ३५० दिंड्या सहभागी होत असतात. पालखी निघण्यापूर्वी जिल्हाभरातून वारकऱ्यांच्या दिंड्यांचे त्र्यंंबकेश्वरला आगमन होत असते. ----इन्फो--

वारकऱ्यांचे गावी मन रमेना!

१) दरवर्षी पंढरपूरची वारी करीत आहे; मात्र सलग दुसऱ्या वर्षी वारीला जाता आले नाही, याची खंत लागून राहिली आहे. टाळ-मृदंगाचा ध्वनी आणि विठ्ठल नामाचा गजर कानी सतत गुंजत आहे. - वारकरी.

२) यंदा माउलीचे दर्शन होणार नसल्याची हुरहुर लागली आहे. एस.टीतून निवृत्तीनाथांची पालखी जाणार असल्याने या पालखी सोहळ्यात सहभागी होता आले नसल्याने मनाला हुरहुर लागून राहिली आहे. - वारकरी.