शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

एस.टी. महामंडळाची वारी हुकल्याने सलग दुसऱ्या वर्षी दीड कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

नाशिक: यात्रा, जत्राच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाला मोठे उत्पन्न मिळत असते. धार्मिक सण, उत्सवाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी ...

नाशिक: यात्रा, जत्राच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाला मोठे उत्पन्न मिळत असते. धार्मिक सण, उत्सवाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी जादा गाड्यांचेदेखील नियोजन केले जाते; मात्र या दोन वर्षांच्या काळात धार्मिक स्थळांवर तसेच यात्रा, जत्रांवर निर्बंध असल्याचा फटका एस.टी. महामंडळालादेखील बसला आहे. पंढरपूरच्या यात्रेसाठी नाशिक विभागाला दरवर्षी दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळते; मात्र सलग दुसऱ्या वर्षी महामंडळाला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

सन २०१९ मधील पंढरपूर यात्रेची आकडेवारी पाहिली तर त्यावरून महामंडळाला गेल्या दोन वर्षात माेठा आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते.

२०१९ मध्ये नाशिकच्या एस.टी.महामंडळाला दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले हेाते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा लाख रुपये अधिक उत्पन्न मिळाले होते. जिल्ह्यातील १३ डेपोंमधून सुमारे २९५ बसेस सोडण्यात आल्या होत्या.

३०० : बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या

१ कोटी ६० लाख रुपये उत्पन्न मिळायचे एस.टीला

३६०००: प्रवासी एस.टीतून दरवर्षी प्रवास करायचे

--इन्फो--

संतश्री निवृत्तीनाथ पालखीसाठी दोन बसेस

शासनाच्या आदेशाप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या पालखीसाठी दोन बसेस पुरविण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार या बसेस विनामूल्य देण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठीदेखील या बसेस उपलब्ध राहणार आहेत.

--इन्फो--

नाशिक जिल्ह्यातून संतश्री निवृृत्तीनाथ पालखी

राज्यातील दहा मानाच्या पालख्यांमध्ये त्र्यंबकेश्वर येथून निघणारी संतश्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश आहे. कोरेानामुळे यंदा बसमधून पालखी वाखरीपर्यंत रवाना झाली असली तरी यापूर्वी या दिंडीत जिल्ह्यातील सुमारे ३०० ते ३५० दिंड्या सहभागी होत असतात. पालखी निघण्यापूर्वी जिल्हाभरातून वारकऱ्यांच्या दिंड्यांचे त्र्यंंबकेश्वरला आगमन होत असते. ----इन्फो--

वारकऱ्यांचे गावी मन रमेना!

१) दरवर्षी पंढरपूरची वारी करीत आहे; मात्र सलग दुसऱ्या वर्षी वारीला जाता आले नाही, याची खंत लागून राहिली आहे. टाळ-मृदंगाचा ध्वनी आणि विठ्ठल नामाचा गजर कानी सतत गुंजत आहे. - वारकरी.

२) यंदा माउलीचे दर्शन होणार नसल्याची हुरहुर लागली आहे. एस.टीतून निवृत्तीनाथांची पालखी जाणार असल्याने या पालखी सोहळ्यात सहभागी होता आले नसल्याने मनाला हुरहुर लागून राहिली आहे. - वारकरी.