शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

येवला येथे  श्रीमद्भागवत कथा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:42 IST

मनुष्याने प्राण्यांवर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, भागवतकार सांगतात मनुष्याने ज्याचे अंतकाली चिंतन केले जाते त्याचा पुढील जन्म मिळतो म्हणून अंतकाळी देवाचे चिंतन करावे म्हणजे जीवनातून मुक्ती मिळेल, असे प्रतिपादन वेदांताचार्य प्रभाकर महाराज शास्त्री (आळंदी देवाची) यांनी मुरमी, ता. येवला येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेचे चौथे पुष्प गुंफताना व्यक्त केले.

पाटोदा : मनुष्याने प्राण्यांवर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, भागवतकार सांगतात मनुष्याने ज्याचे अंतकाली चिंतन केले जाते त्याचा पुढील जन्म मिळतो म्हणून अंतकाळी देवाचे चिंतन करावे म्हणजे जीवनातून मुक्ती मिळेल, असे प्रतिपादन वेदांताचार्य प्रभाकर महाराज शास्त्री (आळंदी देवाची) यांनी मुरमी, ता. येवला येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेचे चौथे पुष्प गुंफताना व्यक्त केले.  यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, भरत राजाने खूप तपश्चर्या केली परंतु शेवटी हरिणाचे पिलू पाळले, त्या हरिणाची खूप आसक्ती झाली. शेवटी हरीण हरीण म्हणून प्राण सोडला. त्यांना पुढील जन्म हरिणाचा मिळाला म्हणून प्राण्यावर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, असे महाराजांनी समजावले. महाराजांनी कपिल देवहुती संवाद, ध्रुव चरित्र, जडभरत रहु गण संवाद, अजामिल व्याख्यान, प्रल्हाद चरित्र, दक्षप्रजापती चरित्र आदी प्रसंग कथन केले. कथेप्रसंगी संगीत भजने होत असल्याने भाविक तल्लीन होऊन भजने गाऊन नाचतात.  कार्यक्रमास अंबादास महाराज जगताप, निवृत्ती महाराज चव्हाण, शिवाजी महाराज गायके, वाल्मीक महाराज कदम, नारायण महाराज काळे, अमृता शिंदे, सरपंच रघुनाथ शिंदे, उपसरपंच नारायण गुंजाळ, कृष्णा गरूडे, आनंदा शिंदे, शिवाजी महाले, रावसाहेब बढे, पांडुरंग गायके आदी मान्यवर व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्र मासाठी संगीत विशारद हरिभाऊ महाराज टेकाडे, सिंथेसाइजर मदन महाराज नखाते, आॅर्गनायझर रमेश महाराज बिटे, तबलावादक सुनील महाराज ढेंगळे आदींची सुरेख साथ संगत लाभली असल्याने कार्यक्रमास उत्तरोत्तर रंग भरत आहे. शेवटी ग्रंथाची आरती यजमान नवनाथ शिंदे यांच्या हस्ते होऊन कथेचा समारोप करण्यात येतो.

टॅग्स :Nashikनाशिक