शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

येवला येथे  श्रीमद्भागवत कथा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:42 IST

मनुष्याने प्राण्यांवर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, भागवतकार सांगतात मनुष्याने ज्याचे अंतकाली चिंतन केले जाते त्याचा पुढील जन्म मिळतो म्हणून अंतकाळी देवाचे चिंतन करावे म्हणजे जीवनातून मुक्ती मिळेल, असे प्रतिपादन वेदांताचार्य प्रभाकर महाराज शास्त्री (आळंदी देवाची) यांनी मुरमी, ता. येवला येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेचे चौथे पुष्प गुंफताना व्यक्त केले.

पाटोदा : मनुष्याने प्राण्यांवर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, भागवतकार सांगतात मनुष्याने ज्याचे अंतकाली चिंतन केले जाते त्याचा पुढील जन्म मिळतो म्हणून अंतकाळी देवाचे चिंतन करावे म्हणजे जीवनातून मुक्ती मिळेल, असे प्रतिपादन वेदांताचार्य प्रभाकर महाराज शास्त्री (आळंदी देवाची) यांनी मुरमी, ता. येवला येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेचे चौथे पुष्प गुंफताना व्यक्त केले.  यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, भरत राजाने खूप तपश्चर्या केली परंतु शेवटी हरिणाचे पिलू पाळले, त्या हरिणाची खूप आसक्ती झाली. शेवटी हरीण हरीण म्हणून प्राण सोडला. त्यांना पुढील जन्म हरिणाचा मिळाला म्हणून प्राण्यावर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, असे महाराजांनी समजावले. महाराजांनी कपिल देवहुती संवाद, ध्रुव चरित्र, जडभरत रहु गण संवाद, अजामिल व्याख्यान, प्रल्हाद चरित्र, दक्षप्रजापती चरित्र आदी प्रसंग कथन केले. कथेप्रसंगी संगीत भजने होत असल्याने भाविक तल्लीन होऊन भजने गाऊन नाचतात.  कार्यक्रमास अंबादास महाराज जगताप, निवृत्ती महाराज चव्हाण, शिवाजी महाराज गायके, वाल्मीक महाराज कदम, नारायण महाराज काळे, अमृता शिंदे, सरपंच रघुनाथ शिंदे, उपसरपंच नारायण गुंजाळ, कृष्णा गरूडे, आनंदा शिंदे, शिवाजी महाले, रावसाहेब बढे, पांडुरंग गायके आदी मान्यवर व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्र मासाठी संगीत विशारद हरिभाऊ महाराज टेकाडे, सिंथेसाइजर मदन महाराज नखाते, आॅर्गनायझर रमेश महाराज बिटे, तबलावादक सुनील महाराज ढेंगळे आदींची सुरेख साथ संगत लाभली असल्याने कार्यक्रमास उत्तरोत्तर रंग भरत आहे. शेवटी ग्रंथाची आरती यजमान नवनाथ शिंदे यांच्या हस्ते होऊन कथेचा समारोप करण्यात येतो.

टॅग्स :Nashikनाशिक