शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

एकता पॅनलमध्ये फूट; चर्चा निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:52 IST

सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सातपूर : सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  निमा या औद्योगिक संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल तयार झाले आहे, तर सत्ताधारी एकता पॅनलच्या श्रेष्ठींमध्ये गेल्या आठ दिवसांपासून चर्चेचे गुºहाळ सुरू होते. नाराज बंडखोरांकडून तिसऱ्या पॅनलची निर्मिती होण्याची शक्यता गृहीत धरून उमेदवारी जाहीर केली जात नव्हती. शेवटी उमेदवारी माघारीच्या दिवशी जे व्हायचे ते झालेच. उमेदवारी देण्यावरून सत्ताधारी एकता पॅनलमध्येच एकमत न झाल्याने एकता दुभंगली आणि एकता पॅनलमध्ये दोन गट तयार झाले आहेत, तरीही रविवारी माघारीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून समेटासाठी एक दिवसाची मुदत घेण्यात आलीहोती. त्यानंतर सोमवारी दिवसभर मॅरेथॉन बैठका घेऊनही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता एकता विरुद्ध एकता आणि उद्योग विकास असे तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहेत.  एकता पॅनल (मंगेश पाटणकर गट)चे अध्यक्ष पदाचे उमेदवार माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष लघुउद्योग उदय खरोटे, सरचिटणीस समीर पटवा, चिटणीस व्हीनस वाणी, खजिनदार गजकुमार गांधी, तर एकता पॅनल (धनंजय बेळे गट)चे अध्यक्ष पदाचे उमेदवार के. एल. राठी, उपाध्यक्ष लघुउद्योग आशिष  नहार, सरचिटणीस आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, चिटणीस मिलिंद राजपूत, खजिनदार आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, तर  उद्योग विकास पॅनलकडे अध्यक्षपदाचा उमेदवार नाही, तर उपाध्यक्ष लघुउद्योग शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, चिटणीस सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास अहेर असे पदाधिकाºयांचे उमेदवार आहेत.खरे पॅनल कोणते?सत्ताधारी एकता पॅनलचे लघुउद्योग गटासाठीचे उमेदवार उदय खरोटे आणि आशिष नहार यांच्या नावात एकमत होत नसल्याने फूट पडल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी समेटासाठी भाजपाचे नेते सुनील बागुल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. बागुल यांनी दिवसभर मॅरेथॉन बैठका घेऊनही एकमत होऊ शकले नाही.  कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने अखेर बागुल यांनाच माघार घ्यावी लागल्याचे सांगितले जात आहे. एकता पॅनलमध्ये दोन गट पडले असून, दोघेही गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांनी एकता नावावर दावा केल्याने नेमके खरे एकता पॅनल कोणते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMIDCएमआयडीसी