शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

एकता पॅनलमध्ये फूट; चर्चा निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:52 IST

सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सातपूर : सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  निमा या औद्योगिक संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल तयार झाले आहे, तर सत्ताधारी एकता पॅनलच्या श्रेष्ठींमध्ये गेल्या आठ दिवसांपासून चर्चेचे गुºहाळ सुरू होते. नाराज बंडखोरांकडून तिसऱ्या पॅनलची निर्मिती होण्याची शक्यता गृहीत धरून उमेदवारी जाहीर केली जात नव्हती. शेवटी उमेदवारी माघारीच्या दिवशी जे व्हायचे ते झालेच. उमेदवारी देण्यावरून सत्ताधारी एकता पॅनलमध्येच एकमत न झाल्याने एकता दुभंगली आणि एकता पॅनलमध्ये दोन गट तयार झाले आहेत, तरीही रविवारी माघारीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून समेटासाठी एक दिवसाची मुदत घेण्यात आलीहोती. त्यानंतर सोमवारी दिवसभर मॅरेथॉन बैठका घेऊनही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता एकता विरुद्ध एकता आणि उद्योग विकास असे तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहेत.  एकता पॅनल (मंगेश पाटणकर गट)चे अध्यक्ष पदाचे उमेदवार माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष लघुउद्योग उदय खरोटे, सरचिटणीस समीर पटवा, चिटणीस व्हीनस वाणी, खजिनदार गजकुमार गांधी, तर एकता पॅनल (धनंजय बेळे गट)चे अध्यक्ष पदाचे उमेदवार के. एल. राठी, उपाध्यक्ष लघुउद्योग आशिष  नहार, सरचिटणीस आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, चिटणीस मिलिंद राजपूत, खजिनदार आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, तर  उद्योग विकास पॅनलकडे अध्यक्षपदाचा उमेदवार नाही, तर उपाध्यक्ष लघुउद्योग शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, चिटणीस सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास अहेर असे पदाधिकाºयांचे उमेदवार आहेत.खरे पॅनल कोणते?सत्ताधारी एकता पॅनलचे लघुउद्योग गटासाठीचे उमेदवार उदय खरोटे आणि आशिष नहार यांच्या नावात एकमत होत नसल्याने फूट पडल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी समेटासाठी भाजपाचे नेते सुनील बागुल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. बागुल यांनी दिवसभर मॅरेथॉन बैठका घेऊनही एकमत होऊ शकले नाही.  कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने अखेर बागुल यांनाच माघार घ्यावी लागल्याचे सांगितले जात आहे. एकता पॅनलमध्ये दोन गट पडले असून, दोघेही गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांनी एकता नावावर दावा केल्याने नेमके खरे एकता पॅनल कोणते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMIDCएमआयडीसी