शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म म्हणजे देवभोळेपणा नव्हे: सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 01:19 IST

महाराष्ट्रातील विविध विचारधारांचा अभ्यास, चिंतन शालेय जीवनापासून सुरू झाले. अध्यात्म म्हणजे देवभोळेपणा नाही तर तो उन्नत व उत्कृष्ट जीवन जगण्याचा अध्याय या अंगाने प्रबोधन करू शकल्याचे समाधान असल्याचे प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देसूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या ऑनलाईन व्याख्यानात प्रतिपादन

नाशिक : महाराष्ट्रातील विविध विचारधारांचा अभ्यास, चिंतन शालेय जीवनापासून सुरू झाले. अध्यात्म म्हणजे देवभोळेपणा नाही तर तो उन्नत व उत्कृष्ट जीवन जगण्याचा अध्याय या अंगाने प्रबोधन करू शकल्याचे समाधान असल्याचे प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने झालेल्या ‘एक तास शब्द उपासकासोबत’ या उपक्रमाचे तिसरे पुष्प अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आणि सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. सदानंद मोरे यांनी गुंफले. आपला साहित्य प्रवास रसिकांसमोर उलगडताना ते म्हणाले की महाराष्ट्र केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. वारकरी संप्रदायाच्या संस्कारांनी जडणघडण घडत गेली. संत तुकारामांचा संपन्न वारसा लाभला हे खरोखरच माझे भाग्य आहे. तसेच सगळ्यात चिकित्सक बुद्धी म्हणजे वाचलेलं ऐकलेलं सत्याशी मिळतं जुळतं असेल तेच स्वीकारायचं, अशी जडणघडण बालवयात झाली. आचार्य अत्रेंच्या मराठामध्ये लेख छापून आल्याने स्फूर्ती मिळाली. लहान वयात एवढी सुंदर समज व लेखन म्हणून आचार्य अत्रे यांचे प्रत्यक्ष शाबासकीसह आशीर्वाद मिळाल्यानेही खूप प्रेरणा लाभल्याचे मोरे यांनी नमूद केले . लेखन, वाचन, चिंतन, समीक्षा, तत्त्वज्ञानाचा व्यासंग हे सर्व ओघाओघाने घडत गेले. महात्मा फुलेंचे प्रेरणास्थान संत तुकाराम होते. या संदर्भातील अक्षरधनामुळे वैचारिक संतुलन निर्माण झाल्याचेही मोरे यांनी नमूद केले. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांच्या कार्याचे मोरे यांनी कौतुक केले. प्रास्ताविक सावळीराम तिदमे यांनी तर सूत्रसंचालन सुरेखा बोऱ्हाडे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक