शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

अध्यात्म म्हणजे देवभोळेपणा नव्हे: सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 01:19 IST

महाराष्ट्रातील विविध विचारधारांचा अभ्यास, चिंतन शालेय जीवनापासून सुरू झाले. अध्यात्म म्हणजे देवभोळेपणा नाही तर तो उन्नत व उत्कृष्ट जीवन जगण्याचा अध्याय या अंगाने प्रबोधन करू शकल्याचे समाधान असल्याचे प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देसूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या ऑनलाईन व्याख्यानात प्रतिपादन

नाशिक : महाराष्ट्रातील विविध विचारधारांचा अभ्यास, चिंतन शालेय जीवनापासून सुरू झाले. अध्यात्म म्हणजे देवभोळेपणा नाही तर तो उन्नत व उत्कृष्ट जीवन जगण्याचा अध्याय या अंगाने प्रबोधन करू शकल्याचे समाधान असल्याचे प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने झालेल्या ‘एक तास शब्द उपासकासोबत’ या उपक्रमाचे तिसरे पुष्प अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आणि सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. सदानंद मोरे यांनी गुंफले. आपला साहित्य प्रवास रसिकांसमोर उलगडताना ते म्हणाले की महाराष्ट्र केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. वारकरी संप्रदायाच्या संस्कारांनी जडणघडण घडत गेली. संत तुकारामांचा संपन्न वारसा लाभला हे खरोखरच माझे भाग्य आहे. तसेच सगळ्यात चिकित्सक बुद्धी म्हणजे वाचलेलं ऐकलेलं सत्याशी मिळतं जुळतं असेल तेच स्वीकारायचं, अशी जडणघडण बालवयात झाली. आचार्य अत्रेंच्या मराठामध्ये लेख छापून आल्याने स्फूर्ती मिळाली. लहान वयात एवढी सुंदर समज व लेखन म्हणून आचार्य अत्रे यांचे प्रत्यक्ष शाबासकीसह आशीर्वाद मिळाल्यानेही खूप प्रेरणा लाभल्याचे मोरे यांनी नमूद केले . लेखन, वाचन, चिंतन, समीक्षा, तत्त्वज्ञानाचा व्यासंग हे सर्व ओघाओघाने घडत गेले. महात्मा फुलेंचे प्रेरणास्थान संत तुकाराम होते. या संदर्भातील अक्षरधनामुळे वैचारिक संतुलन निर्माण झाल्याचेही मोरे यांनी नमूद केले. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांच्या कार्याचे मोरे यांनी कौतुक केले. प्रास्ताविक सावळीराम तिदमे यांनी तर सूत्रसंचालन सुरेखा बोऱ्हाडे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक