शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा दरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:16 IST

माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककरांच्या मनात घोळत राहिला.

नाशिक : माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककरांच्या मनात घोळत राहिला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘कुसुमाग्रज स्मरण’ अंतर्गत स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कवी किशोर पाठक, खलील मोमीन, लक्ष्मण महाडिक, रेखा भांडारे, गंगाधर अहिरे, तुकाराम धांडे हे सहभागी झाले होते. मैफलीची सुरुवात तुकाराम धांडे यांनी केली आणि ‘आई होती तेव्हा, जातं गाणं गायचं, उखळामध्ये नाचताना उड्या मारायचं’ ही माती आणि मातेचे नाते विशद करणारी कविता सादर केली. या कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली आणि ‘वन्स मोअर’ घेत धांडे यांनी पुन्हा एकदा कविता ऐकविली. त्यानंतर लक्ष्मण महाडिक यांनीही आजी आणि नातीचा संवाद साधणारी कविता सादर केली. ‘पहिला पाऊस झेलशील जेव्हा, चिंब पावसात भिजून घे’ या कवितेला उपस्थितांकडून दाद मिळाली. रेखा भांडारे यांनी ‘शल्य’ ही कविता सादर करताना सिग्नलवर गजरे विकणाºया चिमुरड्यांच्या वेदनांना हात घातला. ‘गिधाडे’ या कवितेतून ‘आतले ते माणसांचे, रंग होते वेगळे, सभ्यतेच्या आड त्यांचे, रूप ते झाकले’ असे सांगत माणसातल्या विकृतींवरही त्यांनी प्रहार केले. गंगाधर अहिरे यांनी ‘कळप’ या कवितेतून समाजातील भीषण वास्तव मांडले. ‘आला कळप कळप, त्याने घातली झडप, जीव कोवळा कोवळा, रक्ताळलेला सरे आम’ या काव्यपंक्तीने उपस्थितांना आत्मचिंतन करायला भाग पाडले. अहिरे यांनी राजकारणी आणि चोर यातील साम्यता दर्शविणारी कविता सादर करत मैफलीचा माहोल हलका-फुलका केला. खलील मोमीन यांनी ‘अनुनय’ आणि ‘पुनर्विवाह’ या कविता सादर करत दाद मिळविली. मैफलीचे निवेदन किशोर पाठक यांनी केले. प्रारंभी प्रतिष्ठानचे विलास लोणारी आणि अरविंद ओढेकर यांनी कवींचे स्वागत केले.रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादकुसुमाग्रज स्मरण उपक्रमांतर्गत स्थानिक कवींच्या मैफलीला नाशिककर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इगतपुरीचे कवी तुकाराम धांडे यांनी सादर केलेल्या पहिल्याच कवितेला ‘वन्स मोअर’ मिळाला आणि धांडे यांनीही रसिकांची निराशा न करता पुन्हा एकदा कविता ऐकविली.

टॅग्स :Nashikनाशिक