शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा दरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:16 IST

माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककरांच्या मनात घोळत राहिला.

नाशिक : माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककरांच्या मनात घोळत राहिला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘कुसुमाग्रज स्मरण’ अंतर्गत स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कवी किशोर पाठक, खलील मोमीन, लक्ष्मण महाडिक, रेखा भांडारे, गंगाधर अहिरे, तुकाराम धांडे हे सहभागी झाले होते. मैफलीची सुरुवात तुकाराम धांडे यांनी केली आणि ‘आई होती तेव्हा, जातं गाणं गायचं, उखळामध्ये नाचताना उड्या मारायचं’ ही माती आणि मातेचे नाते विशद करणारी कविता सादर केली. या कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली आणि ‘वन्स मोअर’ घेत धांडे यांनी पुन्हा एकदा कविता ऐकविली. त्यानंतर लक्ष्मण महाडिक यांनीही आजी आणि नातीचा संवाद साधणारी कविता सादर केली. ‘पहिला पाऊस झेलशील जेव्हा, चिंब पावसात भिजून घे’ या कवितेला उपस्थितांकडून दाद मिळाली. रेखा भांडारे यांनी ‘शल्य’ ही कविता सादर करताना सिग्नलवर गजरे विकणाºया चिमुरड्यांच्या वेदनांना हात घातला. ‘गिधाडे’ या कवितेतून ‘आतले ते माणसांचे, रंग होते वेगळे, सभ्यतेच्या आड त्यांचे, रूप ते झाकले’ असे सांगत माणसातल्या विकृतींवरही त्यांनी प्रहार केले. गंगाधर अहिरे यांनी ‘कळप’ या कवितेतून समाजातील भीषण वास्तव मांडले. ‘आला कळप कळप, त्याने घातली झडप, जीव कोवळा कोवळा, रक्ताळलेला सरे आम’ या काव्यपंक्तीने उपस्थितांना आत्मचिंतन करायला भाग पाडले. अहिरे यांनी राजकारणी आणि चोर यातील साम्यता दर्शविणारी कविता सादर करत मैफलीचा माहोल हलका-फुलका केला. खलील मोमीन यांनी ‘अनुनय’ आणि ‘पुनर्विवाह’ या कविता सादर करत दाद मिळविली. मैफलीचे निवेदन किशोर पाठक यांनी केले. प्रारंभी प्रतिष्ठानचे विलास लोणारी आणि अरविंद ओढेकर यांनी कवींचे स्वागत केले.रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादकुसुमाग्रज स्मरण उपक्रमांतर्गत स्थानिक कवींच्या मैफलीला नाशिककर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इगतपुरीचे कवी तुकाराम धांडे यांनी सादर केलेल्या पहिल्याच कवितेला ‘वन्स मोअर’ मिळाला आणि धांडे यांनीही रसिकांची निराशा न करता पुन्हा एकदा कविता ऐकविली.

टॅग्स :Nashikनाशिक