शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा दरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:16 IST

माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककरांच्या मनात घोळत राहिला.

नाशिक : माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककरांच्या मनात घोळत राहिला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘कुसुमाग्रज स्मरण’ अंतर्गत स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कवी किशोर पाठक, खलील मोमीन, लक्ष्मण महाडिक, रेखा भांडारे, गंगाधर अहिरे, तुकाराम धांडे हे सहभागी झाले होते. मैफलीची सुरुवात तुकाराम धांडे यांनी केली आणि ‘आई होती तेव्हा, जातं गाणं गायचं, उखळामध्ये नाचताना उड्या मारायचं’ ही माती आणि मातेचे नाते विशद करणारी कविता सादर केली. या कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली आणि ‘वन्स मोअर’ घेत धांडे यांनी पुन्हा एकदा कविता ऐकविली. त्यानंतर लक्ष्मण महाडिक यांनीही आजी आणि नातीचा संवाद साधणारी कविता सादर केली. ‘पहिला पाऊस झेलशील जेव्हा, चिंब पावसात भिजून घे’ या कवितेला उपस्थितांकडून दाद मिळाली. रेखा भांडारे यांनी ‘शल्य’ ही कविता सादर करताना सिग्नलवर गजरे विकणाºया चिमुरड्यांच्या वेदनांना हात घातला. ‘गिधाडे’ या कवितेतून ‘आतले ते माणसांचे, रंग होते वेगळे, सभ्यतेच्या आड त्यांचे, रूप ते झाकले’ असे सांगत माणसातल्या विकृतींवरही त्यांनी प्रहार केले. गंगाधर अहिरे यांनी ‘कळप’ या कवितेतून समाजातील भीषण वास्तव मांडले. ‘आला कळप कळप, त्याने घातली झडप, जीव कोवळा कोवळा, रक्ताळलेला सरे आम’ या काव्यपंक्तीने उपस्थितांना आत्मचिंतन करायला भाग पाडले. अहिरे यांनी राजकारणी आणि चोर यातील साम्यता दर्शविणारी कविता सादर करत मैफलीचा माहोल हलका-फुलका केला. खलील मोमीन यांनी ‘अनुनय’ आणि ‘पुनर्विवाह’ या कविता सादर करत दाद मिळविली. मैफलीचे निवेदन किशोर पाठक यांनी केले. प्रारंभी प्रतिष्ठानचे विलास लोणारी आणि अरविंद ओढेकर यांनी कवींचे स्वागत केले.रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादकुसुमाग्रज स्मरण उपक्रमांतर्गत स्थानिक कवींच्या मैफलीला नाशिककर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इगतपुरीचे कवी तुकाराम धांडे यांनी सादर केलेल्या पहिल्याच कवितेला ‘वन्स मोअर’ मिळाला आणि धांडे यांनीही रसिकांची निराशा न करता पुन्हा एकदा कविता ऐकविली.

टॅग्स :Nashikनाशिक