शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:06 IST

केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंमुळे १३ जणांचे बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकाही सतर्क झाली असून, जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन तथा कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे.

नाशिक : केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंमुळे १३ जणांचे बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकाही सतर्क झाली असून, जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन तथा कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे. नाशिक शहरात मोठ्या संख्येने केरळी बांधव वास्तव्यास आहेत. प्रामुख्याने, आर्टिलरी सेंटर, नोट प्रेस, गांधीनगर प्रेस या केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांमध्येही केरळी बांधव सेवेत आहेत. सध्या सुट्यांचा हंगाम असल्याने अनेक केरळी बांधव आपल्या प्रांतात गावी गेले आहेत. सुट्यांचा कालावधी संपत आल्याने परतीचा प्रवासही सुरू झालेला आहे. याशिवाय, नाशिकमधून केरळमध्ये पर्यटनासाठी जाणाºयांची संख्या मोठी असते. केरळमध्ये प्रवास करण्याचे टाळावे आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले असतानाच नाशिक महापालिकेनेही सतर्कता म्हणून जुन्या नाशकातील कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित केला आहे. निपाह व्हायरसमुळे ३ ते १४ दिवसांचा ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास अडचणी, मेंदूला सूज तसेच मांसपेशी दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे सदर लक्षणे आढळून आल्यास त्यांनी कथडा रुग्णालयात विशेष कक्षात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. राजेंद्र भंडारी यांनी केले आहे. महाराष्ट सरकारकडून अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. परंतु, नाशिक महापालिकेने सतर्कता म्हणून  डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित केलेला आहे. सदर व्हायरसचा महाराष्टला धोका नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तरीही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.- डॉ. राजेंद्र भंडारी,  वैद्यकीय अधीक्षक, मनपा

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू