शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

हवी ‘एसपीसीए’समिती : मुक्या जीवांना मिळणारी क्रूर वागणूक थांबणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:20 IST

समिती गठित करण्याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मानव उत्थान मंचच्या वतीनने सोमवारी (दि.३०) अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.

नाशिक : प्राण्यांवरील होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएल्टी आॅन अ‍ॅनिमल’(एसपीसीए) नावाची समिती शहरात गठित करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाला दिले आहे; मात्र अद्याप समिती गठित करण्याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मानव उत्थान मंचच्या वतीनने सोमवारी (दि.३०) अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.राज्य सरकारने २००१ साली अध्यादेश काढून प्राणी क्रुरता प्रतिबंध समिती विविध जिल्ह्यांमध्ये गठित करावी, असे आदेश केंद्र सरकारच्या नियमानुसार दिले. त्यानंतर काही शहरांमध्ये अशाप्रकारची समिती गठित करण्याचे प्रयत्न सुरू झाले; मात्र राज्यात काही मोजक्याच शहरांमध्ये या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिकमध्येही अशाप्रकारे समिती गठित करून या समितीद्वारे जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली शहर व परिसरात जनावरांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याची मागणी मानव उत्थान मंचकडून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिका-यांनी पशुसंवर्धन उपआयुक्तांसोबत चर्चा करून पंधरा सदस्य असलेली समिती शासनाच्या नियमानुसार गठित करण्याच्या सूचना दिल्या; मात्र यानंतर कुठल्याही प्रकारे प्रयत्न संबंधितांकडून होऊ शकले नाही, असा आरोप करत मंचाचे जसबीर सिंग, भारती जाधव, हेमंत जाधव, ज्योती ग्रोवर, प्रियंका वाघ, धनश्री कुलकर्णी, हेमल लडानी आदी प्राणिप्रेमींनी कार्यालयापुढे निदर्शने करीत नाशिकमध्ये ‘एसपीसीए’ का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक