शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कापसाचे  पीक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:05 IST

अगोदरच उशिराने केलेली पेरणी व त्यातच तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने मारलेल्या दडीमुळे नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कापूस पीक धोक्यात आले असून, पावसाअभावी सोयाबीनला लागणाऱ्या फुलांच्या संख्येत घट झाली

नाशिक : अगोदरच उशिराने केलेली पेरणी व त्यातच तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने मारलेल्या दडीमुळे नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कापूस पीक धोक्यात आले असून, पावसाअभावी सोयाबीनला लागणाऱ्या फुलांच्या संख्येत घट झाली तर कापसाचे बोंडाची वाढ खुंटल्यामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना त्यात आता या दोन्ही पिकांना किडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.  जिल्ह्यात जून महिन्यात उशिराने मान्सूनचे आगमन झाल्यामुळे त्याचा पेरणीवर परिणाम झाला, परंतु जुलैच्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवीत होऊन जिल्ह्यात जवळपास जुलैअखेर ८८ टक्के पीक पेरण्या पूर्ण करण्यात आल्या. नाशिक जिल्हा खरीप पेरणीचा असल्यामुळे पूर्व भागात मका, बाजरी, सोयाबीन, तूर, भुईमुगाची लागवड करण्यात आली, तर पश्चिम भागात भात, नागलीच्या पेरण्या करण्यात येऊन पिकांना कोंब फुटेपर्यंत पावसाने हात दिला, परंतु त्यानंतर जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील एकूण लागवडीखाली क्षेत्रापैकी ५९,३४३ इतके क्षेत्र सोयाबीनचे असले तरी, यंदा मात्र त्यात वाढ करण्यात येऊन ६४,२६३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली तर कापसाचे क्षेत्र काहीसे घटले आहे. कापसाचे ४५,५३५ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी फक्त ३७,१५५ हेक्टर क्षेत्रावरच लागवड करण्यात आली. त्यामागे गेल्या वर्षी बोंडअळीने उभे पीक फस्त केल्यामुळे कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये नैराश्य आल्याचे व पावसाने दीर्घ दडी मारल्याचे कारण दिले जात आहे.  आता दोन दिवसांपासून पावसाने काहीशी हजेरी लावली असली तरी, तत्पूर्वी या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे. सोयाबीनची पाने खाणारी अळी काही भागांत आढळली तर कापसावरही यंदा बोंडअळीची तसेच पिकाचे रस शोषणाºया किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.  जुलैअखेर व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनच्या शेंगा लागण्याअगोदर फुले लागण्यास सुरुवात होते व अशा वेळी पिकाला पाण्याची गरज असते; परंतु पाऊस नसल्यामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात आले, तीच परिस्थिती कापसाची असून, पिकाची पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत असताना कापसाची वाढ खुंटली परिणामी कापसाचे फूल फुलण्याअगोदर तयार होणाºया बोंडाची पाहिजे त्या प्रमाणात वाढ होऊ शकली नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस