शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

कृषी विभागाचा कक्षात बसून पेरणी अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:37 IST

पावसाचे माहेरघर आणि धरणांचा तालुका म्हणून सर्वांनाच परिचित असलेले इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुके भात पिकाच्या उत्पादनातही अग्रेसर आहे. त्यामुळेच जून महिन्याच्या पूर्वार्धात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील सुमारे ५० ते ६० टक्के क्षेत्रावर भात लावणीसाठी रोपवाटिका तयार झाल्या असून, काही भागात भात लावणीलाही सुरुवात झालेली आहे.

नाशिक : पावसाचे माहेरघर आणि धरणांचा तालुका म्हणून सर्वांनाच परिचित असलेले इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुके भात पिकाच्या उत्पादनातही अग्रेसर आहे. त्यामुळेच जून महिन्याच्या पूर्वार्धात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील सुमारे ५० ते ६० टक्के क्षेत्रावर भात लावणीसाठी रोपवाटिका तयार झाल्या असून, काही भागात भात लावणीलाही सुरुवात झालेली आहे. परंतु, जिल्हा कृषी कार्यालयाने जाहीर केलेल्या पीक पेरणी अहवालात प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र शून्य दाखवले असून यावरून कृषी विभाग अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम २०१८-१९ पीकनिहाय पेरणी अहवालात नाशिक जिल्हा कृषी कार्यालयाने भात पिकाच्या ६६ हजार ७४९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी अद्याप कुठेही पेरणी झाली नसल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात इगतपुरी तालुक्यातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह सिंचन क्षेत्रात भाताच्या रोपवाटिका जून अखेरीस तयार झाल्या असून, सद्यस्थितीत अनेक भागात भात लावणीही सुरू आहे. परंतु, ही माहिती कार्यालयात बसून अहवाल तयार करणाºया अधिकाºयांपर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे जिल्हा कृषी अधिकाºयांनी जुलै महिना सुरू झाल्यानंतरही जिल्ह्णात अद्याप भाताची लावणी झालीच नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. विशेष म्हणजे भात लागवडीत अग्रेसर असणाºया इगतपुरी तालुक्यात यंदा ३२ हजार २३७ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून चालू हंगामात तालुक्यात २७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती तालुकास्तरावरून दिली जात असताना जिल्हा कृषी विभागाकडे अद्यापही भात लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र ६६ हजार ७४९ हेक्टर एवढे आहे. यावरून जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्णातील पीक बदलांचेही अद्याप सर्वेक्षण केले नसल्याचे दिसून येत आहे.भात लावणीची लगबगकृषी विभागाच्या अहवालात पेरणीचे क्षेत्र शून्य दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात लावणीची लगबग सुरू आहे. सद्यस्थितीत कृषिपंपाचा उपसा करून काही शेतकरी भाताची लावणी करीत आहेत. तर अनेक शेतकºयांनी रोपवाटिका तयार केल्या असून, ते लावणीसाठी पावसाची वाट पाहत आहे. सिंचनाची सोय उपलब्ध नसलेल्या ठिकाणी मात्र पेरणीसाठी अजूनही पावसाची प्रतीक्षा असून असे शेतकरीही अपेक्षित पाऊस झाला तर परिसरातून भाताचे रोप विकत घेऊन लावणी करण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :agricultureशेती