शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कपातीने एका दिवसात ५० एमएलडी पाण्याची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:29 IST

गंगापूर धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ३१ जुलै अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी महापालिकेने रविवारपासून शहरात एक वेळ पाणीकपात सुरू केली असून, पाणीकपातीतून पहिल्या दिवशी सुमारे ५० एमएलडी पाण्याची बचत झाली.

ठळक मुद्देफेरविचाराची शक्यता : पाणी नियोजनाचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गंगापूर धरणाने गाठलेला तळ पाहता, संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून महापालिकेने रविवारपासून एक वेळ पाणीपुरवठा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने पहिल्याच दिवशी ५० एमएलडी पाण्याची बचत झाली आहे. तथापि, रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने तिसऱ्या दिवशीही हजेरी कायम ठेवल्यामुळे धरणाच्या पाण्यात किंचित वाढ झाल्याने पाणीकपातीच्या निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता आहे.

गंगापूर धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ३१ जुलै अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी महापालिकेने रविवारपासून शहरात एक वेळ पाणीकपात सुरू केली असून, पाणीकपातीतून पहिल्या दिवशी सुमारे ५० एमएलडी पाण्याची बचत झाली. पाणीकपात करूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळाल्याचा दावा करून पाणीपुरवठा विभागाने यानंतर पुढच्या काही दिवसांत टप्प्या टप्प्यानुसार ही कपात ६० एमएलडीपर्यंत नेण्यात येणार असल्याचे सांगितले.यापूर्वी संपूर्ण शहरात अगोदर दररोज ४६० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. त्यात काही ठिकाणी दोन वेळा तर काही ठिकाणी एकवेळ परंतु दोन ते तीन तासांपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यात आता कपात करण्यात आली आहे. शहराला पुरवल्या जाणाºया पाण्यातून पहिल्याच दिवशी ५० एमएलडी पाण्याची कपात करण्यात आली आहे. पाणीकपातीच्या माध्यमातून वाचवलेल्या पाण्यातून सध्याच्या पाणीपुरवठ्याप्रमाणेच शहराला ३१ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. रविवारपासून सलग आजही शहरात पाऊस सुरू असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाणीकपात कायम ठेवण्यात आलेली आहे. मात्र आठ दिवसांत धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास गुरुवारी संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय बदलला जाऊ शकतो, अशी शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका