शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य : देगलूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:54 IST

मनुष्य पैसा व संपत्ती असतानाही समाधानी होऊ शकत नाही, कारण त्याचे मन स्थिर नसते. मन हे चंचल आणि चपळ असल्याने मनुष्य नेहमी असमाधानी असतोे. अशा चंचल व चपळ मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य असून, त्यासाठी संंतांनी दाखविलेला अध्यात्माच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

नाशिक : मनुष्य पैसा व संपत्ती असतानाही समाधानी होऊ शकत नाही, कारण त्याचे मन स्थिर नसते. मन हे चंचल आणि चपळ असल्याने मनुष्य नेहमी असमाधानी असतोे. अशा चंचल व चपळ मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य असून, त्यासाठी संंतांनी दाखविलेला अध्यात्माच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.परशुराम सायखेडकर नाट्यगृहात बस्तीरामजी सारडा स्मृती व्याख्यानमालेत सोमवारी (दि.२८) चैतन्य महाराज देगलूरकर यांनी समारोपाचे तृतीय पुष्प गुंफताना ‘संत साहित्य ही आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, चंचल मन हे हातात घेतलेले काम सोडून दुसरे काम हाती घेते तर चपळ मन हे हातातील काम तत्काळ पूर्ण करून दुसरे काम हाती घेणारे असते, असेही देगलूरकर महाराज यांनी सांगितले.संत ज्ञानेश्वरांनी मन चपळ असल्याचे वर्णन केले आहे. मात्र तुकाराम महाराज मन हे चपळ आणि चंचल असे दोन्ही असल्याचे सांगतात. त्यामुळे अशा चपळ व चंचल मनाला स्थिर करण्यासाठी त्यावर ताबा मिळविणे आवश्यक असून, मनावर प्रभुत्व मिळविण्याचा मार्ग संत साहित्याने दाखविला आहे. त्यामुळेच संत साहित्य ही आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री असल्याचे चैतन्य महाराज देगलूरकर यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक