शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

रेशनमध्ये लवकरच तूरडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:53 IST

बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरात डाळ उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा पुरवठा विभाग: ७२० क्विंटल डाळ दोन दिवसांत पोहोचणार

नाशिक : बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरात डाळ उपलब्ध होणार आहे.तूरडाळींच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांना तूरडाळ खरेदी करणे अशक्य झाल्याने जिल्हा पुरवठा विभागाने रेशनद्वारे सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ खरेदी करता यावी यासाठी शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसात पुरवठा विभागाला सदर डाळ प्राप्त होणार असून, रेशन दुकानांमधून तूरडाळ ५५ रु पये प्रतिकिलो दराने दिली जाणार आहे. ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दराने डाळ मिळावी यासाठी रेशनदुकानारांना डाळीची मागणी नोंदविण्याबाबत कळविण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे कडधान्यांचे नुकसान झाले. काढणीची पिकेही वाहून गेली. याचा फटका डाळींच्या पुरवठ्यावर झाल्यामुळे नवीन डाळ बाजारात येऊ शकली नाही त्यामुळे बाजारपेठेत डाळीचा तुटवडा निर्माण झाला.मराठवाडा व विदर्भात कडधान्याची पिके घेतली जातात, परंतु परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने तेथून येणारी डाळही वेळेत येऊ शकली नाही. राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र, यंदा सर्वत्र कडधान्याचे क्षेत्र घटल्यामुळे डाळींचा भाव वधारला आहे. दुकानांमध्ये उडीद १२०, तर मूगडाळ ११० रु पये किलो दराने विक्र ी केली जात आहे. दुसरीकडे या डाळींना मागणी वाढली असून, पुरवठा घटला आहे. तूरडाळ, मूगडाळ, हरबरा डाळ, उडीद, मूग आदींच्या किमतीनी प्रति किलो शंभरी पार केली आहे. डाळीच्या किमती कमी न झाल्यास सर्वसामान्यांना डाळ खरेदी करणे मुश्किल झाले आहे. याचमुळे कार्डधारकांना वाजवी दरात तूरडाळ मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदवली होती. मागील नोव्हेंबर महिन्यात ही मागणी करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत तूरडाळ डाळ प्राप्त होणार आहे.तूरडाळीला उठाव नसल्यामुळे रेशनदुकानदारांकडून तूरडाळीची मागणी नोंदविली जात नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जात असताना दुसरीकडे ग्राहक मात्र तुरडाळ मिळत नसल्याची तक्रार करीत आहेत, तर मागणी नोंदवूनही तूरडाळ प्राप्त होत नसल्याचे रेशनदुकानदारंचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवाळीपासून तूरडाळीचा पुरवठा अनिश्चित झाला आहे. आता घाऊक बाजारात तुरडाळींचे भाव शंभरच्या पुढे गेल्याने आता रेशनदुकानातून तूरडाळ प्राप्त होणार आहे. यासाठी पुरवठा विभाग गंभीर असून, रेशनदुकानदारांच्या मागणीकडे लक्ष ठेवणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार