शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

एकीचे बळ : बुजलेला लोंढा नाला पुनरुज्जीवित करून युवकांनी सोडवला शेतीपाण्याचा प्रश्न

By admin | Updated: August 21, 2014 00:16 IST

पाण्याच्या वेडात नामपूरचे वीर दौडले आठ

शरद नेरकर ल्ल नामपूरमोसम खोऱ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना येथील आठ-दहा युवक एकत्र येतात, तहान-भूक विसरून परिसराच्या भल्यासाठी राबराब राबतात, पदरमोड करतात व बुजलेला पूर्वीचा लोंढा नाला पुनरुज्जीवित करून परिसरातील ७०० एकर बागायत क्षेत्र जिवंत करतात ही गोष्ट सोपी नाही. पाणीप्रश्न सोडविण्याच्या वेडाने झपाटलेल्या युवकांच्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांनी आदर्श असे काम उभे केले आहे. पूर्वी ऐतिहासिक नोंद असलेला लोंढा नाला नामपूर येथील फळबागायतीतून जात होता. अतिवृष्टी, अतिक्रमण व महापूर यांच्या तडाख्यात हा बुजला गेला. या नाल्याचे कुठलेही नामोनिशाण या ठिकाणी नव्हते. परंतु पाणीप्रश्नाची तीव्रता जाणवू लागल्यावर पाणी कुठून उपलब्ध करावे हा निर्वाणीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. या साऱ्या गोष्टींचा विचार करून नामपूर येथील युवा कार्यकर्ते राजेंद्र सावंत, बिपीन सावंत, अन्नू देसले, जयदीप सावंत, कृष्णा भावसार, भाऊसाहेब सावंत, योगेश चौधरी, रोहित सावंत यांनी एकत्र येऊन लोंढा नाला विकासाची चर्चा केली. शेतीला कितीही विक्रीचे पाणी घेतले तरी ते शेतीस पुरेसे नसते. त्याऐवजी जर पाण्यावर पैसे देण्यापेक्षा हा पैसा जर लोंढा नाला खोदाई व दुरुस्तीसाठी वापरला तर? यासाठी ११ युवक एकत्र आलेत. वडीलधाऱ्यांचा याबाबत सल्ला घेतला. सर्वांच्याच तोंडून होकार आला. काम तर मोठे होते पैसा भरपूर लागणार होता. पैसा उपलब्ध करायचा कसा? मात्र प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणून कामाचा श्रीगणेशा केला. अनेक विहिरी मालक शेतकऱ्यांनीसुद्धा या प्रकल्पात स्वत:हून मदत दिली. सुरुवातीला गैरसमजातून विरोध करणाऱ्यांनी अखेर या कामासाठी फक्त वेळच नाही तर आर्थिक मदतीचाही हात पुढे केला. लोंढा नाला हा तसा मोसम नदीतून खामलोण शिवारापासून सुरू होतो. मात्र या युवकांनी हा नाला साक्री रस्त्यापासून सुरू केला, तर तो बिजोरसेजवळ मोसम नदीत येऊन मिळतो. मात्र साक्री रस्त्यापासून येणारे हे पूरपाणी पुन्हा मोसमनदीलाच जाऊन मिळते. हिरव्या शेतीचे स्वप्न बघणाऱ्या या युवकांना अनेकांचे सहकार्य मिळाल्याने हा नाला आता तब्बल दोन कि. मी. एवढा झाला आहे. हा नाला ३५ फूट रुंद व १५ फूट खोल असून, लांबी दोन कि.मी. पर्यंत आहे. हरणबारी धरण भरले त्याचे पूरपाणी मोसम पात्रात आले हे पूरपाणी या नवयुवकांनी लोंढा नाल्यात वळवले, पुन्हा हे पूरपाणी मोसम मातेच्या पात्रात येऊन सोडले. तरीही या पाण्याचा फायदा ७०० ते ८०० एकराला होऊन बिजोरसे गावाच्या पाणीपुरवठा योजनेस यामुळे संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पात या युवकांनी मातीचे बांध बांधले आहेत. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे हे बांध फुटतात व पाण्याचे नुकसान होते. मात्र या प्रकल्पात शासनाने सात ते आठ साखळी बंधाऱ्यासाठी निधी (सीमेंटचे) दिला तर पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर परक्युलेशन होणार आहे.