शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू
3
१२ वर्षांनी गुरु-रवि युती, ७ राशींची ३० दिवस चांदीच चांदी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-लाभ!
4
अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ
5
Share Market Today: ३ दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारला, या स्टॉक्समध्ये तेजी
6
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
7
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
8
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
9
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली
10
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
11
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
12
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
13
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
14
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
15
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
16
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
17
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
18
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
19
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
20
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत

एकीचे बळ : बुजलेला लोंढा नाला पुनरुज्जीवित करून युवकांनी सोडवला शेतीपाण्याचा प्रश्न

By admin | Updated: August 21, 2014 00:16 IST

पाण्याच्या वेडात नामपूरचे वीर दौडले आठ

शरद नेरकर ल्ल नामपूरमोसम खोऱ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना येथील आठ-दहा युवक एकत्र येतात, तहान-भूक विसरून परिसराच्या भल्यासाठी राबराब राबतात, पदरमोड करतात व बुजलेला पूर्वीचा लोंढा नाला पुनरुज्जीवित करून परिसरातील ७०० एकर बागायत क्षेत्र जिवंत करतात ही गोष्ट सोपी नाही. पाणीप्रश्न सोडविण्याच्या वेडाने झपाटलेल्या युवकांच्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांनी आदर्श असे काम उभे केले आहे. पूर्वी ऐतिहासिक नोंद असलेला लोंढा नाला नामपूर येथील फळबागायतीतून जात होता. अतिवृष्टी, अतिक्रमण व महापूर यांच्या तडाख्यात हा बुजला गेला. या नाल्याचे कुठलेही नामोनिशाण या ठिकाणी नव्हते. परंतु पाणीप्रश्नाची तीव्रता जाणवू लागल्यावर पाणी कुठून उपलब्ध करावे हा निर्वाणीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. या साऱ्या गोष्टींचा विचार करून नामपूर येथील युवा कार्यकर्ते राजेंद्र सावंत, बिपीन सावंत, अन्नू देसले, जयदीप सावंत, कृष्णा भावसार, भाऊसाहेब सावंत, योगेश चौधरी, रोहित सावंत यांनी एकत्र येऊन लोंढा नाला विकासाची चर्चा केली. शेतीला कितीही विक्रीचे पाणी घेतले तरी ते शेतीस पुरेसे नसते. त्याऐवजी जर पाण्यावर पैसे देण्यापेक्षा हा पैसा जर लोंढा नाला खोदाई व दुरुस्तीसाठी वापरला तर? यासाठी ११ युवक एकत्र आलेत. वडीलधाऱ्यांचा याबाबत सल्ला घेतला. सर्वांच्याच तोंडून होकार आला. काम तर मोठे होते पैसा भरपूर लागणार होता. पैसा उपलब्ध करायचा कसा? मात्र प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणून कामाचा श्रीगणेशा केला. अनेक विहिरी मालक शेतकऱ्यांनीसुद्धा या प्रकल्पात स्वत:हून मदत दिली. सुरुवातीला गैरसमजातून विरोध करणाऱ्यांनी अखेर या कामासाठी फक्त वेळच नाही तर आर्थिक मदतीचाही हात पुढे केला. लोंढा नाला हा तसा मोसम नदीतून खामलोण शिवारापासून सुरू होतो. मात्र या युवकांनी हा नाला साक्री रस्त्यापासून सुरू केला, तर तो बिजोरसेजवळ मोसम नदीत येऊन मिळतो. मात्र साक्री रस्त्यापासून येणारे हे पूरपाणी पुन्हा मोसमनदीलाच जाऊन मिळते. हिरव्या शेतीचे स्वप्न बघणाऱ्या या युवकांना अनेकांचे सहकार्य मिळाल्याने हा नाला आता तब्बल दोन कि. मी. एवढा झाला आहे. हा नाला ३५ फूट रुंद व १५ फूट खोल असून, लांबी दोन कि.मी. पर्यंत आहे. हरणबारी धरण भरले त्याचे पूरपाणी मोसम पात्रात आले हे पूरपाणी या नवयुवकांनी लोंढा नाल्यात वळवले, पुन्हा हे पूरपाणी मोसम मातेच्या पात्रात येऊन सोडले. तरीही या पाण्याचा फायदा ७०० ते ८०० एकराला होऊन बिजोरसे गावाच्या पाणीपुरवठा योजनेस यामुळे संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पात या युवकांनी मातीचे बांध बांधले आहेत. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे हे बांध फुटतात व पाण्याचे नुकसान होते. मात्र या प्रकल्पात शासनाने सात ते आठ साखळी बंधाऱ्यासाठी निधी (सीमेंटचे) दिला तर पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर परक्युलेशन होणार आहे.