शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘कळसुबाई’ शिखरावर सैनिकांनी फडकावला तिरंगा! 'हर शिखर तिरंगा’ मोहिमेत देशातील २८पर्वत करणार सर!

By अझहर शेख | Updated: August 16, 2023 14:47 IST

दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला.

नाशिक : हलका-मध्यम सरींचा वर्षाव अंगावर झेलत भारतमातेचा जयजयकार करत सैन्याच्या ‘ॲडव्हेंचर विंग’च्या चमूने मंगळवारी (दि.१५) राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईवर चढाई सुरू केली. दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला.

भारतीय सैन्यदलातील कर्नल रणवीर सिंह जामवाल यांच्या नेतृत्वात मे महिन्यात ‘हर शिखर तिरंगा’ ही आगळीवेगळी साहसी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील २८ राज्यांमध्ये भ्रमंती करत तेथील सर्वोच्च शिखरावर चढाई करून तिरंगा फडकाविला जात आहे. मंगळवारी या चमूने कळसुबाईच्या रूपाने १५वे सर्वोच्च शिखर सर केले. हा चमू राजस्थानच्या गुरूशिखर, गुजरातचे गिरणार आणि मध्यप्रदेशच्या धूपगडावर तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला नाशिक शहरात दाखल झाला होता. या चमूने मंगळवारी (१५) पहाटे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी पोहचला. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १ हजार ६४६ मीटर इतकी आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटरपर्यंत आहे. 

झुंजुमुंज होताच जामवाल यांच्यासह १३सैनिक व स्थानिक युवकांनीसुद्धा हातात तिरंगा ध्वज खेत भारतमातेचा जयघोष केला. एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कळसूबाई शिखरावर चढाई सुरू केली. सकाळी आठ वाजता माथा गाठून ध्वजारोहण करत तिरंग्याला ‘सॅल्यूट’ केला. यावेळी स्थानिक युवक, युवतींनी जल्लोषपूर्ण वातावरणात देशभक्तीपर घोषणा देत शिखर दणाणून सोडला. यानंतर पुढील प्रवासात दुपारी मुंढेगावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत जामवाल यांनी संवाद साधला. त्यानंतर नाशिकमधून पुढे गोव्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.ऑगस्टमध्ये या शिखरांवर फडकवणार तिरंगाऑगस्टअखेरपर्यंत सैनिकांचा हा चमू २४ तारखेला गोव्यामधील उच्चशिखर सोसोगडावर त्यानंतर २६ तारखेला कर्नाटकच्या मुलनगिरी शिखर, २७ तारखेला तमिळनाडूमधील दोटाबेटा पर्वतावर आणि २८ तारखेला केरळमधील अनामुरी शिखरावर हा चमू तिरंगा फडकावणार आहे. ही मोहीम अशीच पुढे सर्व २८ राज्यांत पोहचणार आहे. ऑक्टोबरमध्ये मोहिम ‘फत्ते’ होणार आहे.

..असा आहे साहसवीरांचा चमूकर्नल रणवीर सिंह जामवाल, सुभेदार रवी देवडकर, तेसांग चोसगेल, हवालदार केवल, नेहपाल सिंह, राकेश यादव, नायक गणेश पाल, संजय कुमार, लोगु के., लोबसंग बापू, रूपक छत्री, थुटेन, राजा रामचिराय, समयाक राज मेहता असा १४ सैनिकांचा हा चमू आहे. या चमूने आतापर्यंत देशातील १४शिखरे लीलयापणे सर केली आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकIndependence Dayस्वातंत्र्य दिन