शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘कळसुबाई’ शिखरावर सैनिकांनी फडकावला तिरंगा! 'हर शिखर तिरंगा’ मोहिमेत देशातील २८पर्वत करणार सर!

By अझहर शेख | Updated: August 16, 2023 14:47 IST

दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला.

नाशिक : हलका-मध्यम सरींचा वर्षाव अंगावर झेलत भारतमातेचा जयजयकार करत सैन्याच्या ‘ॲडव्हेंचर विंग’च्या चमूने मंगळवारी (दि.१५) राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईवर चढाई सुरू केली. दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला.

भारतीय सैन्यदलातील कर्नल रणवीर सिंह जामवाल यांच्या नेतृत्वात मे महिन्यात ‘हर शिखर तिरंगा’ ही आगळीवेगळी साहसी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील २८ राज्यांमध्ये भ्रमंती करत तेथील सर्वोच्च शिखरावर चढाई करून तिरंगा फडकाविला जात आहे. मंगळवारी या चमूने कळसुबाईच्या रूपाने १५वे सर्वोच्च शिखर सर केले. हा चमू राजस्थानच्या गुरूशिखर, गुजरातचे गिरणार आणि मध्यप्रदेशच्या धूपगडावर तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला नाशिक शहरात दाखल झाला होता. या चमूने मंगळवारी (१५) पहाटे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी पोहचला. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १ हजार ६४६ मीटर इतकी आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटरपर्यंत आहे. 

झुंजुमुंज होताच जामवाल यांच्यासह १३सैनिक व स्थानिक युवकांनीसुद्धा हातात तिरंगा ध्वज खेत भारतमातेचा जयघोष केला. एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कळसूबाई शिखरावर चढाई सुरू केली. सकाळी आठ वाजता माथा गाठून ध्वजारोहण करत तिरंग्याला ‘सॅल्यूट’ केला. यावेळी स्थानिक युवक, युवतींनी जल्लोषपूर्ण वातावरणात देशभक्तीपर घोषणा देत शिखर दणाणून सोडला. यानंतर पुढील प्रवासात दुपारी मुंढेगावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत जामवाल यांनी संवाद साधला. त्यानंतर नाशिकमधून पुढे गोव्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.ऑगस्टमध्ये या शिखरांवर फडकवणार तिरंगाऑगस्टअखेरपर्यंत सैनिकांचा हा चमू २४ तारखेला गोव्यामधील उच्चशिखर सोसोगडावर त्यानंतर २६ तारखेला कर्नाटकच्या मुलनगिरी शिखर, २७ तारखेला तमिळनाडूमधील दोटाबेटा पर्वतावर आणि २८ तारखेला केरळमधील अनामुरी शिखरावर हा चमू तिरंगा फडकावणार आहे. ही मोहीम अशीच पुढे सर्व २८ राज्यांत पोहचणार आहे. ऑक्टोबरमध्ये मोहिम ‘फत्ते’ होणार आहे.

..असा आहे साहसवीरांचा चमूकर्नल रणवीर सिंह जामवाल, सुभेदार रवी देवडकर, तेसांग चोसगेल, हवालदार केवल, नेहपाल सिंह, राकेश यादव, नायक गणेश पाल, संजय कुमार, लोगु के., लोबसंग बापू, रूपक छत्री, थुटेन, राजा रामचिराय, समयाक राज मेहता असा १४ सैनिकांचा हा चमू आहे. या चमूने आतापर्यंत देशातील १४शिखरे लीलयापणे सर केली आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकIndependence Dayस्वातंत्र्य दिन