शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

व्यवस्थेतूनच कौशल्याला सामाजिक प्रतिष्ठा

By admin | Updated: March 9, 2015 01:07 IST

व्यवस्थेतूनच कौशल्याला सामाजिक प्रतिष्ठा

नाशिक : आजकाल केवळ पदवीच्या कागदांवर माणसाचा मोठेपणा मोजला जातो आहे. परंतु यामुळे कमी शिकलेल्या; परंतु कौशल्य असलेल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होते आहे. आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या शिक्षण व्यवस्थेचे हे अपयश असून, यापुढे शिक्षण व्यवस्थेतूनच कौशल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल असा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.‘डिपेक्स २०१५’च्या निमित्ताने वसंतराव गोवारीकर नगरी येथे कौशल्य विकास या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते उद््घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी डिपेक्स संयोजन समितीचे आलोक झा आणि सृजन न्यासाचे विश्वस्त भरत अमळकर व्यासपीठावर उपस्थित होते. खरं तर कौशल्य विकास कार्यक्र माला अनेक बाजू आहेत. त्याचा नुसता सरकारी पातळीवर विचार करून चालणार नाही. हा विचार एकूण समाजाच्या सहभागाचा झाला पाहिजे. आठवडाभराचा रायगड महोत्सव करताना शिवकालीन व्यवस्थापन हेही लोकांच्या समोर आणण्याची गरज आहे. कौशल्य विकास कार्यक्र माला अनेक प्रकारच्या संधी असून, पर्यटन, आरोग्य आणि योग क्षेत्र, खेड्यापाड्यातील तरु णांपर्यंत कौशल्य विकास कार्यक्रम पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. भरत अमळकर यांनी परिसंवादाला सुरु वात करताना शिक्षणाच्या सद्य:स्थिती विषयी आपली भूमिका उपस्थित विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षणसंस्थाचालक यांच्यासमोर मांडली. आपल्या येथे बेरोजगारीच्या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत एक कष्ट करणाऱ्या मानसिकतेचा अभाव आणि सोयीस्कर आरामशीर अशी नोकरी किंवा सरकारी नोकरीकडे ओढा, तर दुसरीकडे एकूण समाजात योग्य अशा कार्यसंस्कृतीचा अभाव हे मुख्य कारण आहे.समाजात कौशल्य विकास हा योग्य पद्धतीने साधायचा असेल तर कर्तृत्वाला समाजात प्रतिष्ठा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. स्वत:च्या पंखात बळ निर्माण करणारे कौशल्य शिक्षण यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नुसत्या प्रमाणपत्रावर आधारित पुस्तकी शिक्षणाने हे साध्य होणार नाही. मातृभाषेतील शिक्षण लुप्त होत चालले आहे. आधुनिक काळाबरोबर मातृभाषेतून शिक्षण देताना मराठी ही विज्ञानाची भाषा होणे आवश्यक आहे. मातृभाषेच्या मर्यादा असतील, तर इंग्रजी शब्दही वापरायला हरकत नाही, असेही ते म्हणाले.प्रश्नोत्तरच्या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये प्रवेश करून प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तावडे यांनी मोकळेपणाने उत्तर दिले. अधिक बोलताना शिक्षणाचा विचार हा कौशल्य, उद्योग, शिक्षण असा एकत्रित करण्याची गरज आहे. शासन म्हणून आम्ही याच दिशेने पावले उचलत आहोत. असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी डिपेक्समधील काही निवडक प्रतिकृती असणाऱ्या भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी उद्योजकांबरोबरही तावडेंनी संवाद साधला. (प्रतिनिधी)