शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

व्यवस्थेतूनच कौशल्याला सामाजिक प्रतिष्ठा

By admin | Updated: March 9, 2015 01:07 IST

व्यवस्थेतूनच कौशल्याला सामाजिक प्रतिष्ठा

नाशिक : आजकाल केवळ पदवीच्या कागदांवर माणसाचा मोठेपणा मोजला जातो आहे. परंतु यामुळे कमी शिकलेल्या; परंतु कौशल्य असलेल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होते आहे. आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या शिक्षण व्यवस्थेचे हे अपयश असून, यापुढे शिक्षण व्यवस्थेतूनच कौशल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल असा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.‘डिपेक्स २०१५’च्या निमित्ताने वसंतराव गोवारीकर नगरी येथे कौशल्य विकास या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते उद््घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी डिपेक्स संयोजन समितीचे आलोक झा आणि सृजन न्यासाचे विश्वस्त भरत अमळकर व्यासपीठावर उपस्थित होते. खरं तर कौशल्य विकास कार्यक्र माला अनेक बाजू आहेत. त्याचा नुसता सरकारी पातळीवर विचार करून चालणार नाही. हा विचार एकूण समाजाच्या सहभागाचा झाला पाहिजे. आठवडाभराचा रायगड महोत्सव करताना शिवकालीन व्यवस्थापन हेही लोकांच्या समोर आणण्याची गरज आहे. कौशल्य विकास कार्यक्र माला अनेक प्रकारच्या संधी असून, पर्यटन, आरोग्य आणि योग क्षेत्र, खेड्यापाड्यातील तरु णांपर्यंत कौशल्य विकास कार्यक्रम पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. भरत अमळकर यांनी परिसंवादाला सुरु वात करताना शिक्षणाच्या सद्य:स्थिती विषयी आपली भूमिका उपस्थित विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षणसंस्थाचालक यांच्यासमोर मांडली. आपल्या येथे बेरोजगारीच्या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत एक कष्ट करणाऱ्या मानसिकतेचा अभाव आणि सोयीस्कर आरामशीर अशी नोकरी किंवा सरकारी नोकरीकडे ओढा, तर दुसरीकडे एकूण समाजात योग्य अशा कार्यसंस्कृतीचा अभाव हे मुख्य कारण आहे.समाजात कौशल्य विकास हा योग्य पद्धतीने साधायचा असेल तर कर्तृत्वाला समाजात प्रतिष्ठा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. स्वत:च्या पंखात बळ निर्माण करणारे कौशल्य शिक्षण यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नुसत्या प्रमाणपत्रावर आधारित पुस्तकी शिक्षणाने हे साध्य होणार नाही. मातृभाषेतील शिक्षण लुप्त होत चालले आहे. आधुनिक काळाबरोबर मातृभाषेतून शिक्षण देताना मराठी ही विज्ञानाची भाषा होणे आवश्यक आहे. मातृभाषेच्या मर्यादा असतील, तर इंग्रजी शब्दही वापरायला हरकत नाही, असेही ते म्हणाले.प्रश्नोत्तरच्या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये प्रवेश करून प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तावडे यांनी मोकळेपणाने उत्तर दिले. अधिक बोलताना शिक्षणाचा विचार हा कौशल्य, उद्योग, शिक्षण असा एकत्रित करण्याची गरज आहे. शासन म्हणून आम्ही याच दिशेने पावले उचलत आहोत. असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी डिपेक्समधील काही निवडक प्रतिकृती असणाऱ्या भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी उद्योजकांबरोबरही तावडेंनी संवाद साधला. (प्रतिनिधी)