शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विवाहाच्या आमंत्रणासाठी हवे सोशल मीडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:55 IST

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़

नाशिक : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़  सोशल मीडियावरील या चळवळीबाबत ‘लोकमत’ने केलेल्या या वृत्ताचे वाचकांनी समर्थन केले आहे़ विवाहपत्रिका घरोघरी जाऊन निमंत्रण देण्यासारख्या पारंपरिक मार्गाऐवजी आधुनिकतेची कास धरण्याची गरज असल्याचे मतही काहींनी व्यक्त केले आहे़  तुलसीविवाहानंतर विवाह सोहळे सुरू होत असले तरी विवाहांची सर्वाधिक संख्या ही उन्हाळ्याच्या सुटीतच असते़ मुलांच्या परीक्षा, सुट्या या सर्वांचा विचार करून उन्हाळ्यात विवाह समारंभाचे आयोजन केले जाते़ उन्हाचा कडाका, दूर अंतरावरील नातेवाईक, प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण यामुळे पत्रिका वाटप करणारे वर-वधूचे कुटुंबीय हैराण होतात़पूर्वी सोशल मीडिया वा मोबाइलसारखी साधने नव्हती, त्यामुळे पत्रिका छापणे आमंत्रण देणे हे अपरिहार्य होते़ मात्र आता काळ बदलला आहे. मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया वेगवान झाले आहेत. एका मिनिटात हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते़ मुलाच्या विवाहासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक होता व आमंत्रणाच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धत सुरू करावी यासाठी केवळ देवी-देवता, मंदिर व विवाहाचे प्रमाणपत्र यासाठी केवळ अकरा पत्रिका छापल्या़ उर्वरित अग्रवाल समाजातील सर्व नातेवाइकांचा ग्रुप तयार करून विवाहाच्या आमंत्रणाचे संदेश पाठविले़ सुशिक्षित लोकांना हा प्रयोग खूप आवडला मात्र बुजुर्ग लोकांना ही पद्धत फारशी रुचली नाही़ मोठा मुलगा लंडनला आहे, त्याला हा प्रकार सर्वात आवडला़ या पद्धतीमध्ये केवळ एकदा संदेश पाठवून होत नाही तर वारंवार स्मरण करून द्यावे लागते इतकेच़  - ओ़ पी़ रुंग्ठा, नागरिक, नाशिककर्जबाजारीपेक्षा खर्च कमी करावालग्नसराईच्या काळात लग्नपत्रिका वाटपाचे महत्त्वाचे काम असते आणि ग्रामीण भागात याबाबत अधिक काम असते. मानपान सांभाळणे आणि प्रत्येकापर्यंत पत्रिका पोहोचवण्याची जबाबदारी लग्नघरातील कुटुंबाला पार पाडावी लागते. पत्रिकांचे वाटप कमी केल्यास खर्च कमी होतो, परंतु मुळात पत्रिकेपेक्षा वाटपावरच मोठा खर्च होतो. त्यातच ग्रामीण भागातील शेतकरी घरातील लग्नासाठी कर्जबाजारी होतात, परंतु लग्न जोमाने साजरे करतात. कर्जबाजारी होण्यापेक्षा मर्यादित खर्च बरा आणि पत्रिका वाटपाची काळानुसार कितपत गरज आहे, याचा विचार करून शक्य त्या ठिकाणी फोन किंवा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे.  - कैलास दळवी, माजी सरपंच, विंचूर दळवीपुतण्याच्या विवाहात मानापमान नाट्य, रुसवे-फुगवे टाळण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पत्रिका छापून वाटल्या़ मात्र पत्रिकांची संख्या मर्यादित ठेवून उर्वरित बहुतांशी सर्व आमंत्रणे ही मोबाइल व सोशल मीडियावरून दिली़ विवाह समारंभात पत्रिका मिळाली नाही याऐवजी तुमचा सोशल मीडियावर संदेश आला व ही पद्धती चांगली असल्याच्या प्रतिक्रियाच बहतांशी नातेवाइकांनी दिल्या़ त्यामुळे आमंत्रणासाठी सोशल मीडियाचा वापर केल्यास वेळ, पैसा यांची बचतच होईल़ - धनंजय माळोदे, आडगाव

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया