शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाच्या आमंत्रणासाठी हवे सोशल मीडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:55 IST

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़

नाशिक : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़  सोशल मीडियावरील या चळवळीबाबत ‘लोकमत’ने केलेल्या या वृत्ताचे वाचकांनी समर्थन केले आहे़ विवाहपत्रिका घरोघरी जाऊन निमंत्रण देण्यासारख्या पारंपरिक मार्गाऐवजी आधुनिकतेची कास धरण्याची गरज असल्याचे मतही काहींनी व्यक्त केले आहे़  तुलसीविवाहानंतर विवाह सोहळे सुरू होत असले तरी विवाहांची सर्वाधिक संख्या ही उन्हाळ्याच्या सुटीतच असते़ मुलांच्या परीक्षा, सुट्या या सर्वांचा विचार करून उन्हाळ्यात विवाह समारंभाचे आयोजन केले जाते़ उन्हाचा कडाका, दूर अंतरावरील नातेवाईक, प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण यामुळे पत्रिका वाटप करणारे वर-वधूचे कुटुंबीय हैराण होतात़पूर्वी सोशल मीडिया वा मोबाइलसारखी साधने नव्हती, त्यामुळे पत्रिका छापणे आमंत्रण देणे हे अपरिहार्य होते़ मात्र आता काळ बदलला आहे. मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया वेगवान झाले आहेत. एका मिनिटात हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते़ मुलाच्या विवाहासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक होता व आमंत्रणाच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धत सुरू करावी यासाठी केवळ देवी-देवता, मंदिर व विवाहाचे प्रमाणपत्र यासाठी केवळ अकरा पत्रिका छापल्या़ उर्वरित अग्रवाल समाजातील सर्व नातेवाइकांचा ग्रुप तयार करून विवाहाच्या आमंत्रणाचे संदेश पाठविले़ सुशिक्षित लोकांना हा प्रयोग खूप आवडला मात्र बुजुर्ग लोकांना ही पद्धत फारशी रुचली नाही़ मोठा मुलगा लंडनला आहे, त्याला हा प्रकार सर्वात आवडला़ या पद्धतीमध्ये केवळ एकदा संदेश पाठवून होत नाही तर वारंवार स्मरण करून द्यावे लागते इतकेच़  - ओ़ पी़ रुंग्ठा, नागरिक, नाशिककर्जबाजारीपेक्षा खर्च कमी करावालग्नसराईच्या काळात लग्नपत्रिका वाटपाचे महत्त्वाचे काम असते आणि ग्रामीण भागात याबाबत अधिक काम असते. मानपान सांभाळणे आणि प्रत्येकापर्यंत पत्रिका पोहोचवण्याची जबाबदारी लग्नघरातील कुटुंबाला पार पाडावी लागते. पत्रिकांचे वाटप कमी केल्यास खर्च कमी होतो, परंतु मुळात पत्रिकेपेक्षा वाटपावरच मोठा खर्च होतो. त्यातच ग्रामीण भागातील शेतकरी घरातील लग्नासाठी कर्जबाजारी होतात, परंतु लग्न जोमाने साजरे करतात. कर्जबाजारी होण्यापेक्षा मर्यादित खर्च बरा आणि पत्रिका वाटपाची काळानुसार कितपत गरज आहे, याचा विचार करून शक्य त्या ठिकाणी फोन किंवा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे.  - कैलास दळवी, माजी सरपंच, विंचूर दळवीपुतण्याच्या विवाहात मानापमान नाट्य, रुसवे-फुगवे टाळण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पत्रिका छापून वाटल्या़ मात्र पत्रिकांची संख्या मर्यादित ठेवून उर्वरित बहुतांशी सर्व आमंत्रणे ही मोबाइल व सोशल मीडियावरून दिली़ विवाह समारंभात पत्रिका मिळाली नाही याऐवजी तुमचा सोशल मीडियावर संदेश आला व ही पद्धती चांगली असल्याच्या प्रतिक्रियाच बहतांशी नातेवाइकांनी दिल्या़ त्यामुळे आमंत्रणासाठी सोशल मीडियाचा वापर केल्यास वेळ, पैसा यांची बचतच होईल़ - धनंजय माळोदे, आडगाव

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया