शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
4
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
5
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
6
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
7
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
8
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
9
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
10
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
11
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
12
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
13
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
16
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
17
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
18
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
19
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
20
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाच्या आमंत्रणासाठी हवे सोशल मीडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:55 IST

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़

नाशिक : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़  सोशल मीडियावरील या चळवळीबाबत ‘लोकमत’ने केलेल्या या वृत्ताचे वाचकांनी समर्थन केले आहे़ विवाहपत्रिका घरोघरी जाऊन निमंत्रण देण्यासारख्या पारंपरिक मार्गाऐवजी आधुनिकतेची कास धरण्याची गरज असल्याचे मतही काहींनी व्यक्त केले आहे़  तुलसीविवाहानंतर विवाह सोहळे सुरू होत असले तरी विवाहांची सर्वाधिक संख्या ही उन्हाळ्याच्या सुटीतच असते़ मुलांच्या परीक्षा, सुट्या या सर्वांचा विचार करून उन्हाळ्यात विवाह समारंभाचे आयोजन केले जाते़ उन्हाचा कडाका, दूर अंतरावरील नातेवाईक, प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण यामुळे पत्रिका वाटप करणारे वर-वधूचे कुटुंबीय हैराण होतात़पूर्वी सोशल मीडिया वा मोबाइलसारखी साधने नव्हती, त्यामुळे पत्रिका छापणे आमंत्रण देणे हे अपरिहार्य होते़ मात्र आता काळ बदलला आहे. मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया वेगवान झाले आहेत. एका मिनिटात हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते़ मुलाच्या विवाहासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक होता व आमंत्रणाच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धत सुरू करावी यासाठी केवळ देवी-देवता, मंदिर व विवाहाचे प्रमाणपत्र यासाठी केवळ अकरा पत्रिका छापल्या़ उर्वरित अग्रवाल समाजातील सर्व नातेवाइकांचा ग्रुप तयार करून विवाहाच्या आमंत्रणाचे संदेश पाठविले़ सुशिक्षित लोकांना हा प्रयोग खूप आवडला मात्र बुजुर्ग लोकांना ही पद्धत फारशी रुचली नाही़ मोठा मुलगा लंडनला आहे, त्याला हा प्रकार सर्वात आवडला़ या पद्धतीमध्ये केवळ एकदा संदेश पाठवून होत नाही तर वारंवार स्मरण करून द्यावे लागते इतकेच़  - ओ़ पी़ रुंग्ठा, नागरिक, नाशिककर्जबाजारीपेक्षा खर्च कमी करावालग्नसराईच्या काळात लग्नपत्रिका वाटपाचे महत्त्वाचे काम असते आणि ग्रामीण भागात याबाबत अधिक काम असते. मानपान सांभाळणे आणि प्रत्येकापर्यंत पत्रिका पोहोचवण्याची जबाबदारी लग्नघरातील कुटुंबाला पार पाडावी लागते. पत्रिकांचे वाटप कमी केल्यास खर्च कमी होतो, परंतु मुळात पत्रिकेपेक्षा वाटपावरच मोठा खर्च होतो. त्यातच ग्रामीण भागातील शेतकरी घरातील लग्नासाठी कर्जबाजारी होतात, परंतु लग्न जोमाने साजरे करतात. कर्जबाजारी होण्यापेक्षा मर्यादित खर्च बरा आणि पत्रिका वाटपाची काळानुसार कितपत गरज आहे, याचा विचार करून शक्य त्या ठिकाणी फोन किंवा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे.  - कैलास दळवी, माजी सरपंच, विंचूर दळवीपुतण्याच्या विवाहात मानापमान नाट्य, रुसवे-फुगवे टाळण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पत्रिका छापून वाटल्या़ मात्र पत्रिकांची संख्या मर्यादित ठेवून उर्वरित बहुतांशी सर्व आमंत्रणे ही मोबाइल व सोशल मीडियावरून दिली़ विवाह समारंभात पत्रिका मिळाली नाही याऐवजी तुमचा सोशल मीडियावर संदेश आला व ही पद्धती चांगली असल्याच्या प्रतिक्रियाच बहतांशी नातेवाइकांनी दिल्या़ त्यामुळे आमंत्रणासाठी सोशल मीडियाचा वापर केल्यास वेळ, पैसा यांची बचतच होईल़ - धनंजय माळोदे, आडगाव

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया