शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

आतापर्यंत कर्तव्यावरील चार पोलीस शहीद

By admin | Updated: October 22, 2016 02:05 IST

शहीद पोलीस स्मृतिदिन : मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात चित्ते यांची विशेष कामगिरी

विजय मोरे ल्ल नाशिकसमाजाच्या सुरक्षिततेसाठी प्राणपणाने लढत शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ‘पोलीस शहीद दिना’निमित्त देशभरात मानवंदना दिली जात असताना, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत शहीद झालेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे. राज्यात तसेच जिल्हा आणि शहर मुख्यालयातही या दिवशी शहीद पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन केले जाते. आणि शूर पोलिसांच्या कामगिरीला उजाळा दिला जातो. नाशिक जिल्ह्यात १९५९ ते २०१६ या ५७ वर्षांच्या कालावधीत चार पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत़ विशेष म्हणजे, यातील तीन पोलीस कर्मचारी हे नाशिक शहरातील नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते़नाशिक जिल्ह्यातील कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई फिरोजखान अफजलखान पठाण (१९९२), पोलीस नाईक जगदीश मुरलीधर लोंढे (१९९९), पोलीस नाईक कृष्णकांत विनायक बिडवे (२००९) व वीरगाव येथील अरुण रघुनाथ चित्ते (२००८) यांचा समावेश आहे़ मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात १६६ नागरिकांबरोबरच १४ पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले़ त्यामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्यासोबत त्यांचे वाहनचालक पोलीस शिपाई अरुण चित्ते यांचा समावेश होता़ मूळचे सटाणा तालुक्यातील वीरगाव येथील रहिवासी असलेले चित्ते १३ वर्षांपासून साळसकर यांचे वाहनचालक होते़ १५ जानेवारी १९९२ रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई फिरोजखान पठाण हे रात्रीच्या वेळी सौभाग्यनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते़ त्यांना सराईत गुन्हेगार शिकलकरी खेमसिंग प्रतापसिंग जुनी हा आपल्या साथीदारांसह दिसल्याने त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला़ त्यातील एकास पकडण्यात त्यांना यशही आले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन त्याने त्याच्याजवळील सुऱ्याने पठाण यांच्यावर वार केले़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पठाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़१३ सप्टेंबर १९९९ रोजी भद्रकाली पोलीस ठाण्यातील पाटील गल्लीमध्ये दोन राजकीय नेत्यांमध्ये वाद सुरू होते़ कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही़ जे़ सूर्यवंशी व पोलीस नाईक जगदीश मुरलीधर लोंढे (मूळ राहणार सिन्नर) यांनी या दोघांना प्रतिबंध केला़ याचा राग आल्याने एकाने लोंढे यांच्या पोटावर चाकूने वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या लोंढेंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ १ जून २००९ रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील बिट मार्शल पोलीस नाईक कृष्णकांत बिडवे आपल्या सहकाऱ्यासह जेलरोड परिसरात कर्तव्य बजावत होते़ त्यांना स्वामी समर्थ केंद्राजवळ २० ते २५ जण लाठ्या- काठ्या व धारदार शस्त्र घेऊन उभे असल्याचे दिसले़ त्यांनी या इसमांना हत्त्यार टाकून देण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांवर लाठ्या-काठ्या व तलवारीने हल्ला केला गेला़ त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कृष्णकांत बिडवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़नाशिक जिल्ह्यातील या चार शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर शासनाने जगदीश लोंढे व कृष्णकांत बिडवे यांच्या मुलास पोलीस खात्यातच अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेतले आहे, तर यातील लोंढे यांच्या खून खटल्यातील संशयित निर्दोष सुटले असून, बिडवे खून खटला जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे सुरू आहे़