शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठी धुक्याची दुलई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:42 IST

पारा ६.५ अंशांवर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीचा निच्चांक सायखेडा : नवीन वर्षाच्या पहिल्याच पहाटे गोदाकाठसह निफाड तालुक्यात धुक्याने आपली झालर पसरून जणूकाही स्वागतच केले. थंडीने यंदाचा निच्चांक गाठला असून गोदाकाठ भागात ६.५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

सायखेडा : नवीन वर्षाच्या पहिल्याच पहाटे गोदाकाठसह निफाड तालुक्यात धुक्याने आपली झालर पसरून जणूकाही स्वागतच केले. थंडीने यंदाचा निच्चांक गाठला असून गोदाकाठ भागात ६.५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. पिकांना थंडी अनुकूल असली तरी धुके मात्र शेती पिकांना नुकसानकारक ठरत आहे.काही दिवसांपासून ढगाळ हवामान गेल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. थंडीत वाढ झाली आहे. यापुढे काही दिवस थंडी वाढत राहून 0 अंशावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने थंडीत वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार राज्यात महाबळेश्वर नंतर सर्वाधिक थंडी निफाड तालुक्यात असते. त्यामुळे येथे मागील वर्षी ज्या प्रमाणे दवं गोठले, हिमकन तयार होऊन झालर पसरली त्याप्रमाणे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा ती वेळ येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.थंडीचा परिणाम हा सर्वाधिक प्राण्यांना बसतो. शेतात, नदीच्या काठावर वास्तव्यास असणारे विविध प्राणी आणि शेतकऱ्यांच्या घरी असणारे पाळीव प्राणी यांना थंडीचा फटका बसतो. मानवी जनजीवन विस्कळीत होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत माणूस घरातून बाहेर पडत नाही, त्यामुळे कामे रखडतात आणि रात्री इतक्या थंडीत शेतात पिकांना पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे थंडी अनुकूल असली तरी तितक्याच प्रमानात डोकेदुखी ठरते.------------------शेतकरी धास्तावलेकांदे, गहू हरबरा या रब्बी हंगामातील पिकांना थंडी अनुकूल असते. पिकांवर रोग येत नाही. पिके जोमाने वाढतात, मात्र धुक्याने पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून होतो. पीकाचे शेंडे करपू लागतात, मोठ्या प्रमाणावर वाढ थांबते. द्राक्ष पीकाला फटका बसतो फुगवण थांबते, भुरी नियंत्रणासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागते महागड्या औषधांची फवारणी करावी लागते त्यामुळे वाढत्या थंडीने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे.-------------------------गोदाकाठ भागात नदीच्या काठी पहाटे मोठ्या प्रमाणावर धुके पसरलेले असते. नदीच्या पाण्याचे बाष्पीभवन आणि झाडे ,गवत यावर पडलेले दवं यामुळे हवेत गारवा निर्माण होतो. धुके आणि गारवा शरीराला स्पर्श करतांना वेगळीच अनुभूती येत असली तरी प्राणी, काही पिके यांना त्रासदायक ठरू शकते- सागर पोटे, कोठूरे

टॅग्स :Nashikनाशिक