शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

गोदाकाठी धुक्याची दुलई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:42 IST

पारा ६.५ अंशांवर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीचा निच्चांक सायखेडा : नवीन वर्षाच्या पहिल्याच पहाटे गोदाकाठसह निफाड तालुक्यात धुक्याने आपली झालर पसरून जणूकाही स्वागतच केले. थंडीने यंदाचा निच्चांक गाठला असून गोदाकाठ भागात ६.५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

सायखेडा : नवीन वर्षाच्या पहिल्याच पहाटे गोदाकाठसह निफाड तालुक्यात धुक्याने आपली झालर पसरून जणूकाही स्वागतच केले. थंडीने यंदाचा निच्चांक गाठला असून गोदाकाठ भागात ६.५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. पिकांना थंडी अनुकूल असली तरी धुके मात्र शेती पिकांना नुकसानकारक ठरत आहे.काही दिवसांपासून ढगाळ हवामान गेल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. थंडीत वाढ झाली आहे. यापुढे काही दिवस थंडी वाढत राहून 0 अंशावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने थंडीत वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार राज्यात महाबळेश्वर नंतर सर्वाधिक थंडी निफाड तालुक्यात असते. त्यामुळे येथे मागील वर्षी ज्या प्रमाणे दवं गोठले, हिमकन तयार होऊन झालर पसरली त्याप्रमाणे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा ती वेळ येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.थंडीचा परिणाम हा सर्वाधिक प्राण्यांना बसतो. शेतात, नदीच्या काठावर वास्तव्यास असणारे विविध प्राणी आणि शेतकऱ्यांच्या घरी असणारे पाळीव प्राणी यांना थंडीचा फटका बसतो. मानवी जनजीवन विस्कळीत होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत माणूस घरातून बाहेर पडत नाही, त्यामुळे कामे रखडतात आणि रात्री इतक्या थंडीत शेतात पिकांना पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे थंडी अनुकूल असली तरी तितक्याच प्रमानात डोकेदुखी ठरते.------------------शेतकरी धास्तावलेकांदे, गहू हरबरा या रब्बी हंगामातील पिकांना थंडी अनुकूल असते. पिकांवर रोग येत नाही. पिके जोमाने वाढतात, मात्र धुक्याने पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून होतो. पीकाचे शेंडे करपू लागतात, मोठ्या प्रमाणावर वाढ थांबते. द्राक्ष पीकाला फटका बसतो फुगवण थांबते, भुरी नियंत्रणासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागते महागड्या औषधांची फवारणी करावी लागते त्यामुळे वाढत्या थंडीने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे.-------------------------गोदाकाठ भागात नदीच्या काठी पहाटे मोठ्या प्रमाणावर धुके पसरलेले असते. नदीच्या पाण्याचे बाष्पीभवन आणि झाडे ,गवत यावर पडलेले दवं यामुळे हवेत गारवा निर्माण होतो. धुके आणि गारवा शरीराला स्पर्श करतांना वेगळीच अनुभूती येत असली तरी प्राणी, काही पिके यांना त्रासदायक ठरू शकते- सागर पोटे, कोठूरे

टॅग्स :Nashikनाशिक