शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धुक्याचा द्राक्षबागा, पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:21 IST

येवला तालुक्यात आठ दिवसांपासून सकाळी धुके, दवं आणि दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच कांदा पिकही करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : शेतकरी सापडले आर्थिक संकटात

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात आठ दिवसांपासून सकाळी धुके, दवं आणि दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच कांदा पिकही करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.सध्या शेतकर्यांची द्राक्ष बागेची डिपिंग, थिनिंग आदी कामे शेवटच्या टप्प्यात असल्याने व बहुतेक कामे आटोपल्याने शेतकरी आता ढगाळ वातावरणाने धास्तावले आहे. थंडीने द्राक्ष बागेच्या मण्यांना तडे जात असुन अहोरात्र मेहनत घेऊन शेतकर्यांवर संकटावर संकट येत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तसेच द्राक्षबागेला औषधे, बुरशीनाशके, कीटकनाशके यांचे अति प्रमाणात झाल्याने निर्यातक्षम द्राक्षबागेला अडचणी निर्माण होत आहेत.पहाटे दवं आणि धुके पडत असल्याने द्राक्ष बागेला शेकोटीचा आधार देत आहेत. भरमसाठ झालेला खर्चही वसूल होतो की नाही त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतातुर झाल्याचे चित्र दिसत आहे.शेतकर्यांचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते. पण त्यावरही करपा, मावा रोड आणि तुडतुड्यांनी आक्रमण केले आहे. औषधांची फवारणी करुनही कांदा पिकाची वाढ होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.द्राक्षबागेच्या छाटणीपासून सुरू झालेली संकटांची मालिका सुरूच आहे. पीक हाती येते की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. सुरुवातीलाच पावसामुळे घडामध्ये पन्नास टक्के कुज झाल्याने उरल्यासुरल्या द्राक्षबागेवरही ढगाळ वातावरणामुळे भुरी, डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने द्राक्षबागा वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना मोठा खर्च होत असल्याचे जळगाव नेऊर येथील द्राक्ष उत्पादक बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले. तर सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदे पिकावर करपा येऊन कांदे पिकास हानी पोहोचली आहे. औषधांचा खर्च भरमसाठ होत असून, त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे, असे जऊळके येथील कांदा उत्पादक संतोष सोनवणे म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा