शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

‘त्या’ ४८ मजुरांच्या चेहऱ्यावर झळकले स्मितहास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:33 IST

कळवण : कामानिमित्त कळवण परिसरात असलेल्या, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात जाहीर झालेल्या लॉकडाउननंतर अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या घरी परतण्याची ओढ लागल्याने प्रशासनाच्या सहकार्यातून कळवण येथून मध्य प्रदेशातील ४८ मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले.

कळवण : कामानिमित्त कळवण परिसरात असलेल्या, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात जाहीर झालेल्या लॉकडाउननंतर अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या घरी परतण्याची ओढ लागल्याने प्रशासनाच्या सहकार्यातून कळवण येथून मध्य प्रदेशातील ४८ मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले.यावेळी गावी परतत असल्याच्या आनंदात मजुरांच्या चेहºयावर स्मितहास्य उमटत प्रशासनाप्रती कृतज्ञतेचे भाव दिसून आले.रोजगारासाठी मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड यांसह अनेक राज्यांतील मजूर, व्यावसायिक कळवण परिसरात आहेत. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चला पहिला लॉकडाउन लागू केल्याने सर्व कामधंदे बंद झाले होते. हातावर पोट असणाºया या मजुरांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आपल्या गावी जाण्याची ओढ त्यांना लागली होती.शासनाने तिसºया टप्प्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता आणत योग्य ती कार्यवाही पूर्ण करून गावी जाण्यास परवानगी दिल्याने या मजुरांना दिलासा मिळाला होता.या मजुरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी आॅनलाइन परवानगी घ्यावी लागत असल्यानेत्यांनी आॅनलाइन परवानगी मिळवल्यानंतर कळवणचे तहसीलदार बंडू कापसेयांनी मध्य प्रदेशातील एकूण ४८ मजुरांची यादी कळवणचे आगार प्रमुख हेमंत पगार यांच्याकडे दिली. या मजुरांना नाशिकरोड रेल्वे- स्थानकापर्यंत जाण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार येथील प्रशासनाने एस. टी. बसची सोय केली होती.कळवण बसस्थानकातून दोन बसेसमध्ये एकूण ४८ मजुरांना बसवून त्यांना नाशिकरोड रेल्वे स्थानक येथे सोडण्यात आले. तहसीलदार बंडू कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण बसस्थानकातून बस रवाना करतेवेळी नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तुप्ते, आगारप्रमुख हेमंत पगार उपस्थित होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून हे मजूर जिल्ह्यातील इतर मजुरांसह विशेष रेल्वेने मध्य प्रदेशकडे रवाना झाले. दोन महिन्यांनंतर आपल्या मूळ गावी परतता येत असल्याने मजुरांनी आनंद व्यक्त केला.---------------------------मध्य प्रदेशात जाण्यासाठी ४८ मजुरांनी नोंदणी केली होती. त्यानुसार सोशल डिस्टन्स ठेवून सर्व मजुरांना दोन बसमध्ये बसवून रवाना करण्यात आले. मजुरांना सोडताना योग्य काळजी घेण्यात आली.- बंडू कापसे,तहसीलदार, कळवण---------------------------------------------------------मजुरांना सोडण्यासाठी देण्यात आलेल्या सदर बसेस आधी निर्जंतुक करण्यात आल्या. मजुरांना सोडून कळवण येथे परतल्यानंतर सदर बसेस पुन्हा लगेच निर्जंतुक करण्यात आल्या.- हेमंत पगार,आगार व्यवस्थापक, कळवण

टॅग्स :Nashikनाशिक