शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

लष्करी अळीमुळे दमछाक

By संजय डुंबले | Updated: August 4, 2019 01:15 IST

बाजरीला पर्याय आणि कमी खर्चाचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून खरिपात मका पिकाला पसंती दिली जात असते. यावर्षी मात्र लष्करी अळीने शेतकºयांची दमछाक केली असून, त्यांन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत फवारणी पंपांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याबरोबरच कीटकनाशकांचा खपही वाढला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड ; फवारणी पंपांना वाढली मागणी

नाशिक : बाजरीला पर्याय आणि कमी खर्चाचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून खरिपात मका पिकाला पसंती दिली जात असते. यावर्षी मात्र लष्करी अळीने शेतकºयांची दमछाक केली असून, त्यांन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत फवारणी पंपांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याबरोबरच कीटकनाशकांचा खपही वाढला आहे.कमी उत्पादन खर्च आणि भरघोस उत्पन्न यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी खरीप हंगामात मका पिकाला पसंती देऊ लागले आहेत. मक्याकडे कल वाढल्याने बाजरीचे क्षेत्र घटले आहे. घरी खाण्यापुरती बाजरी करून अनेक शेतकरी मक्याला पसंती देतात. विशेषत: येवला, निफाड, चांदवड, नांदगाव, कळवण आदी तालुक्यांंमध्ये मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अनेक शेतकरी मक्यातून रब्बी हंगामासाठी भांडवल उभे करीत असतात. मक्याला उत्पादन खर्चही कमी लागत असल्याने सर्वसामान्य शेतकºयांच्या दृष्टीने सर्वात सोपे पीक म्हणून मक्याकडे पाहिले जाते. यावर्षी मात्र मक्यावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने शेतकºयांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. लष्करी अळीने एक दोन नव्हे तर तालुक्यातील सर्वच क्षेत्रावर आक्रमण केले असल्याने अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांमध्येच चढाओढ लागली आहे. यामुळे भाडेतत्त्वावर फवारणी करून देणाºयांकडे शेतकºयांचे नंबर लागले आहेत. आपला नंबर केव्हा येईल याची तासा तासाने शेतकरी या व्यावसायिकांकडे विचारणा करीत आहेत. सर्वांची मागणी पूर्ण करताना व्यावसायिकांनाही तारेवरची कसरत करावी लागत असून, मोठ्या क्षेत्रावर फवारणी करताना त्यांचीही दमछाक होत आहे.फवारणी करणाºया व्यावसायिकांकडे लागलेले नंबर, त्यांचे वाढलेले दर आणि एका औषध फवारणीत अळीवर कोणताही परिणाम होत नसल्याने अनेक शेतकºयांनी स्वत:च नवीन फवारणी पंप विकत घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गेल्या महिना-दीड महिन्यापासून कृषी विक्रेत्यांकडे फवारणी पंपांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पूर्वी पाठीवर बांधता येणारे साधे फवारणी पंप मिळत असत आता यातही आधुनिकता आली असून, सध्या बाजारात बॅटरीवर आणि पेट्रोलवर चालणारे व एसटीपी फवारणी पंप उपलब्ध झाले आहेत. सध्या शेतकºयांकडून बॅटरीवर चालणाºया कृषी पंपांना अधिक पसंती दिली जात आहे.बॅटरीच्या पंपाची बॅटरी एकदा चार्ज केली की साधारणत: २०० ते २५० लिटर औषधाची फवारणी होते. तर पेट्रोल पंपाला एक लिटरमध्ये १५० ते २०० लिटर औषधाची फवारणी होते. साधा फवारणी पंप १००० ते १५००, बॅटरीवरील पंप १८०० ते २५००, पेट्रोलवरील ३५०० ते ३८०० आणि एसटीपी पंप ५००० ते ७००० रुपये या दराने विकले जात आहेत.एकादा फवारणी केल्यानंतर लष्करी अळीचा नायनाट होत नाही. किमान दोन तीन फवारण्या शेतकºयांना कराव्या लागत आहेत. दरवेळी भाडेतत्त्वावर पंप आणणे परवडणारे नसल्याने शेतकºयांनी स्वत:चा पंप घेण्यास अधिक पसंती दिली आहे. या खर्चा व्यतिरीक्त कीटक नाशकांसाठीही शेतकºयांना खर्च करावा लागत आहे. एक एकरावरील मकाच्या एक वेळच्या फवारणीसाठी किमान १२०० ते १५०० रुपयांची किटकनाशके खरेदी करावी लागतात.एक वेळच्या फवारणीने अळीवर कोणताही परीणाम होत नाही. काही शेतकºयांनी आताच तीन ते चार फवारण्या केल्या आहेत. यामुळे लष्करी अळीने शेतकºयांचे हाल तर विक्रेत्यांना मालामाल केल्याची चर्चा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होतआहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती