शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

कवडीमोल दर; पिकांवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:21 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. या बरोबरच गावोगाव सीमाबंदी तर शहरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सर्वच भागातील आठवडे बाजार बंद झाले आहेत. परिणामी शेतात तयार झालेला शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उभा ठाकला आहे. यातून स्थानिक भाजीपाला बाजारातही शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने, यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने हताश झालेले शेतकरी आता पीक नांगरत असून, एका शेतकऱ्याने तर वांगी, कोबीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : लॉकडाउनमुळे वाढल्या अडचणी

येवला : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. या बरोबरच गावोगाव सीमाबंदी तर शहरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सर्वच भागातील आठवडे बाजार बंद झाले आहेत. परिणामी शेतात तयार झालेला शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उभा ठाकला आहे. यातून स्थानिक भाजीपाला बाजारातही शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने, यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने हताश झालेले शेतकरी आता पीक नांगरत असून, एका शेतकऱ्याने तर वांगी, कोबीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेल्या तालुक्यातील अनेक द्राक्ष उत्पादकांनी आपल्या बागांवर कुºहाड चालविली होती. या पाठोपाठ काही द्राक्ष उत्पादकांनी शेतात पडून असलेली द्राक्ष खराब होण्याऐवजी रस्त्यारस्त्याने पंधरा-वीस मातीमोल दराने विक्री केली. अशीच अवस्था टरबूज उत्पादकांची झाली. त्यांनाही व्यापारी वा बाजारपेठ मिळत नसल्याने गाव-खेड्यांवर तर तसेच शहरात गल्लोगल्ली टरबूज विकावे लागत आहे. दोनच दिवसांपूर्वी जऊळके येथील टमाटे उत्पादकाने पाचशे कॅरेट टमाटे जेसीबीच्या साहाय्याने खड्डे करून दाबून टाकले. तर बुधवारी (दि.१५) आडगाव चोथवा येथील वांगे व कोबी उत्पादक शेतकरी काकासाहेब शिंदे यांनी आपल्या एक एकरातील वांगे, कोंबी पीक मातीमोल बाजारभावामुळे नांगरून टाकले आहे. सर्वच शेतकरी वर्ग कोरोनाच्या संकटाने आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. आहे तो शेतमाल विकता येत नाही, जो काही विकला जात आहे त्यातून खर्चही सुटत नाही. अशा इकडे आड-तिकडे विहीर परिस्थितीने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.खरेदीदार नसल्याने नुकसानतालुक्यातील आडगाव चोथवा येथील शेतकरी काकासाहेब शिंदे यांनी आपल्या एक एकर शेतीत कोबी आणि वांग्याचे पीक घेतले होते. या पिकासाठी सुमारे ५० ते ६० हजार रु पये खर्च केला. ऐन विक्र ीच्या वेळीस कोरोनाचे संकट आले. कोबी आणि वांग्याला मागणी नसल्याने घाऊक खरेदीदार मातीमोल भावाने मागणी करत आहे. यातून उत्पादन खर्च तर दूर वाहतूक खर्चही निघणे दुरापास्त झाल्याने कोबी आणि वांग्यांच्या उभ्या पिकावर शिंदे यांनी ट्रॅक्टर फिरवून पीक नांगरून टाकले.शासनाने शेतमालाची वाहतूक तातडीने सुरळीत करून, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ व चांगला बाजारभाव कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.- शिवाजी वाबळे,शेतकरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी