शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

कवडीमोल दर; पिकांवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:21 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. या बरोबरच गावोगाव सीमाबंदी तर शहरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सर्वच भागातील आठवडे बाजार बंद झाले आहेत. परिणामी शेतात तयार झालेला शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उभा ठाकला आहे. यातून स्थानिक भाजीपाला बाजारातही शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने, यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने हताश झालेले शेतकरी आता पीक नांगरत असून, एका शेतकऱ्याने तर वांगी, कोबीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : लॉकडाउनमुळे वाढल्या अडचणी

येवला : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. या बरोबरच गावोगाव सीमाबंदी तर शहरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सर्वच भागातील आठवडे बाजार बंद झाले आहेत. परिणामी शेतात तयार झालेला शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उभा ठाकला आहे. यातून स्थानिक भाजीपाला बाजारातही शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने, यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने हताश झालेले शेतकरी आता पीक नांगरत असून, एका शेतकऱ्याने तर वांगी, कोबीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेल्या तालुक्यातील अनेक द्राक्ष उत्पादकांनी आपल्या बागांवर कुºहाड चालविली होती. या पाठोपाठ काही द्राक्ष उत्पादकांनी शेतात पडून असलेली द्राक्ष खराब होण्याऐवजी रस्त्यारस्त्याने पंधरा-वीस मातीमोल दराने विक्री केली. अशीच अवस्था टरबूज उत्पादकांची झाली. त्यांनाही व्यापारी वा बाजारपेठ मिळत नसल्याने गाव-खेड्यांवर तर तसेच शहरात गल्लोगल्ली टरबूज विकावे लागत आहे. दोनच दिवसांपूर्वी जऊळके येथील टमाटे उत्पादकाने पाचशे कॅरेट टमाटे जेसीबीच्या साहाय्याने खड्डे करून दाबून टाकले. तर बुधवारी (दि.१५) आडगाव चोथवा येथील वांगे व कोबी उत्पादक शेतकरी काकासाहेब शिंदे यांनी आपल्या एक एकरातील वांगे, कोंबी पीक मातीमोल बाजारभावामुळे नांगरून टाकले आहे. सर्वच शेतकरी वर्ग कोरोनाच्या संकटाने आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. आहे तो शेतमाल विकता येत नाही, जो काही विकला जात आहे त्यातून खर्चही सुटत नाही. अशा इकडे आड-तिकडे विहीर परिस्थितीने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.खरेदीदार नसल्याने नुकसानतालुक्यातील आडगाव चोथवा येथील शेतकरी काकासाहेब शिंदे यांनी आपल्या एक एकर शेतीत कोबी आणि वांग्याचे पीक घेतले होते. या पिकासाठी सुमारे ५० ते ६० हजार रु पये खर्च केला. ऐन विक्र ीच्या वेळीस कोरोनाचे संकट आले. कोबी आणि वांग्याला मागणी नसल्याने घाऊक खरेदीदार मातीमोल भावाने मागणी करत आहे. यातून उत्पादन खर्च तर दूर वाहतूक खर्चही निघणे दुरापास्त झाल्याने कोबी आणि वांग्यांच्या उभ्या पिकावर शिंदे यांनी ट्रॅक्टर फिरवून पीक नांगरून टाकले.शासनाने शेतमालाची वाहतूक तातडीने सुरळीत करून, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ व चांगला बाजारभाव कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.- शिवाजी वाबळे,शेतकरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी