शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

कवडीमोल दर; पिकांवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:21 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. या बरोबरच गावोगाव सीमाबंदी तर शहरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सर्वच भागातील आठवडे बाजार बंद झाले आहेत. परिणामी शेतात तयार झालेला शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उभा ठाकला आहे. यातून स्थानिक भाजीपाला बाजारातही शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने, यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने हताश झालेले शेतकरी आता पीक नांगरत असून, एका शेतकऱ्याने तर वांगी, कोबीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : लॉकडाउनमुळे वाढल्या अडचणी

येवला : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. या बरोबरच गावोगाव सीमाबंदी तर शहरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सर्वच भागातील आठवडे बाजार बंद झाले आहेत. परिणामी शेतात तयार झालेला शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उभा ठाकला आहे. यातून स्थानिक भाजीपाला बाजारातही शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने, यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने हताश झालेले शेतकरी आता पीक नांगरत असून, एका शेतकऱ्याने तर वांगी, कोबीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेल्या तालुक्यातील अनेक द्राक्ष उत्पादकांनी आपल्या बागांवर कुºहाड चालविली होती. या पाठोपाठ काही द्राक्ष उत्पादकांनी शेतात पडून असलेली द्राक्ष खराब होण्याऐवजी रस्त्यारस्त्याने पंधरा-वीस मातीमोल दराने विक्री केली. अशीच अवस्था टरबूज उत्पादकांची झाली. त्यांनाही व्यापारी वा बाजारपेठ मिळत नसल्याने गाव-खेड्यांवर तर तसेच शहरात गल्लोगल्ली टरबूज विकावे लागत आहे. दोनच दिवसांपूर्वी जऊळके येथील टमाटे उत्पादकाने पाचशे कॅरेट टमाटे जेसीबीच्या साहाय्याने खड्डे करून दाबून टाकले. तर बुधवारी (दि.१५) आडगाव चोथवा येथील वांगे व कोबी उत्पादक शेतकरी काकासाहेब शिंदे यांनी आपल्या एक एकरातील वांगे, कोंबी पीक मातीमोल बाजारभावामुळे नांगरून टाकले आहे. सर्वच शेतकरी वर्ग कोरोनाच्या संकटाने आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. आहे तो शेतमाल विकता येत नाही, जो काही विकला जात आहे त्यातून खर्चही सुटत नाही. अशा इकडे आड-तिकडे विहीर परिस्थितीने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.खरेदीदार नसल्याने नुकसानतालुक्यातील आडगाव चोथवा येथील शेतकरी काकासाहेब शिंदे यांनी आपल्या एक एकर शेतीत कोबी आणि वांग्याचे पीक घेतले होते. या पिकासाठी सुमारे ५० ते ६० हजार रु पये खर्च केला. ऐन विक्र ीच्या वेळीस कोरोनाचे संकट आले. कोबी आणि वांग्याला मागणी नसल्याने घाऊक खरेदीदार मातीमोल भावाने मागणी करत आहे. यातून उत्पादन खर्च तर दूर वाहतूक खर्चही निघणे दुरापास्त झाल्याने कोबी आणि वांग्यांच्या उभ्या पिकावर शिंदे यांनी ट्रॅक्टर फिरवून पीक नांगरून टाकले.शासनाने शेतमालाची वाहतूक तातडीने सुरळीत करून, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ व चांगला बाजारभाव कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.- शिवाजी वाबळे,शेतकरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी