शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नाशिकमध्ये २० शाळांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा जिल्ह्यातून सहा शाळांचे प्रस्ताव : दोन ‘ओजस’ शाळा करणार १८ ‘तेजस’ शाळांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:14 IST

नाशिक : नववर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमधून १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची निर्मिती करण्यात येणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोन शाळांचाही समावेश करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘तेजस’ शाळा निर्माण करण्याचा निर्णय पटसंख्येची अट शिथिल

नाशिक : नववर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमधून १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची निर्मिती करण्यात येणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोन शाळांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे २० शाळांना येणाºया नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. राज्य सरकारने राज्यभरात १० ‘ओजस’ आणि ९० ‘तेजस’ शाळा निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही आंतराराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.नाशिक जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी सहा शाळांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाकडून या शाळांना मार्गदर्शन मिळणार आहे. राज्यात कोकण (मुंबई वगळून), पुणे (पुणे शहर वगळून)- प्रत्येकी एक, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर- प्रत्येकी दोन ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती केली जाणार आहे. या शाळा त्यांच्या परिसरातील अन्य नऊ शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी मदत करतील. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातीन दोन ओजस शाळा अन्य १८ शाळांनाही आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी मदत करणार असल्याने जिल्ह्यात एकूण २० शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थी पटसंख्या प्रत्येकी दोन तुकड्यांसाठी पहिली ते पाचवीसाठी ३००, सहावी ते आठवीसाठी २१०, नववी ते दहावीसाठी १६० विद्यार्थी अपेक्षित असून, किमान एक हजार पटसंख्या सामावण्याची क्षमता आवश्यक आहे. एखाद्या विभागात दोन तुकड्यांच्या शाळांनी अर्ज न केल्यास एक तुकडी असलेल्या शाळांना प्राधान्य दिले जाणार असून, गेल्या काही वर्षांत शाळेतील पटसंख्येत झालेली वाढ आणि शाळेत परिसरातील गावांमधून आपल्या गावातील शाळेऐवजी या शाळेत येणारे विद्यार्थी, शाळेतील शिक्षकांची इच्छा आदींचा विचार करून शिक्षण आयुक्त संबंधित शाळेच्या पटसंख्येची अट शिथिल करण्यास मान्यता देणार आहेत. या निकषांचा अभ्यास करून नाशिक जिल्ह्यातून तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी व गटविकास अधिकाºयांनी शाळांची तपासणी करून सहा शाळांचे प्रस्ताव महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडे पाठविले असून, यातील दोन शाळांची ओजस शाळा म्हणून निवड होणार आहे.