शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी परिसरात दोन महिन्यांत सहा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:47 IST

पंचवटी : गत दोन महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांच्या घटना पंचवटी परिसरात घडल्या असून, पोलिसांचा वचक कमी झाल्याचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचवटीत गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढत चालल्याने आगामी कालावधीत या टोळ्यांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे़ या टोळ्यांच्या आपसातील वर्चस्व वादातून हाणामाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यांच्या घटना यापूर्वीही घडल्या असून, यामध्ये आगामी काळात आणखी वाढ होण्याची अशी भीती नागरिकांमध्ये आहे़ विशेष म्हणजे गुन्हेगारी टोळके डोके वर काढत असूनही पोलीस ह्यदंडुकाह्ण फिरवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्दे या गुन्हेगारांवर दंडुका फिरवण्याची वेळ आली आहे.

पंचवटी : गत दोन महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांच्या घटना पंचवटी परिसरात घडल्या असून, पोलिसांचा वचक कमी झाल्याचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचवटीत गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढत चालल्याने आगामी कालावधीत या टोळ्यांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे़ या टोळ्यांच्या आपसातील वर्चस्व वादातून हाणामाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यांच्या घटना यापूर्वीही घडल्या असून, यामध्ये आगामी काळात आणखी वाढ होण्याची अशी भीती नागरिकांमध्ये आहे़ विशेष म्हणजे गुन्हेगारी टोळके डोके वर काढत असूनही पोलीस ह्यदंडुकाह्ण फिरवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.फुलेनगर येथे कौटुंबिक वादातून मामांनी भाच्याचा केलेला खून, रामवाडीत पूर्ववैमनस्यातून युवकाची हत्या, कालिकानगर येथे प्रेयसीसह तिची मुलगी व नातीला जिवंत जाळून ठार केल्याची घटना तसेच बुधवारी फुलेनगर पाण्याच्या पाटाजवळ मोबाइलचोर गुन्हेगाराचा धारदार हत्याराने केलेला खून या सहा घटना अवघ्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत घडल्या आहेत़ यामध्ये दोन दिवसांपूर्वीच्या खुनातील संशयित वगळता अन्य घटनेतील संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.पंचवटी परिसरात काही महिन्यांपासून गुन्हेगारी टोळीशी संबंधित असलेल्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. या टोळीतील संशयितांमध्ये अनेकदा वर्चस्व वादातून वाद-विवाद होतात़, तर काहीजण परिसरात दहशत माजविण्याचा हेतूने वाहनांची जाळपोळ, विनाकारण वाद, हाणामाºया यासारखे कृत्य करतात. गुन्हेगारी टोळके तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले संशयित यांच्यावर पोलिसांचा वचक कमी झाल्याने हे संशयित पुन्हा दहशत माजवतात़ विशेष म्हणजे पोलीस प्रशासन यापासून अनभिज्ञ असल्याचे दाखविते. परिसरातील वाढती गुन्हेगारी व गुन्हेगारी टोळ्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले असून, या गुन्हेगारांवर दंडुका फिरवण्याची वेळ आली आहे.