शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

अकरा महिन्यांत सहा बिबटे अपघातांत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:17 IST

राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणाºया वाहनांपुढे जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस सदर समस्या गंभीर रूप धारण करत असून, ही धक्कादायक बाब आहे.

अझहर शेख ।नाशिक : राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणाºया वाहनांपुढे जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस सदर समस्या गंभीर रूप धारण करत असून, ही धक्कादायक बाब आहे.  जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, दिंडोरी, बागलाण, सटाणा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील परिसरात बिबट्याचा अधिवास आढळतो. त्यामुळे या भागात मानव-बिबट्याचा संघर्षही पहावयास मिळतो. पुरेसे भक्ष्य ऊसशेतीमध्ये किंवा परिसरातील विरळ झालेल्या वनक्षेत्रात न मिळाल्यामुळे मानवी वस्तीकडे भरकटणारा बिबट्या कधी शेतकºयांच्या पशुधनावर तर कधी लहान मुलांवर हल्ले करत असल्याच्या अनेक घटना या भागामध्ये घडल्या आहेत. दरम्यान, या तालुक्यांमधून जाणारे राज्य व राष्टÑीय महामार्ग ओलांडताना बिबट्यांना जीव गमवावा लागत आहे. महामार्गावरून धावणाºया वाहनांमुळे रस्ता ओलांडताना बिबटे गतप्राण होत आहेत. बिबट्यांसारख्या अन्य वन्यजिवांचाही महामार्गांलगतच्या वनक्षेत्रात असलेला वावर लक्षात घेत त्या वनपरिक्षेत्रांच्या हद्दीत संबंधित वनविभागाने ‘वन्यजिवांचा वावर, वाहने सावकाश चालवा’ असे आवाहन वजा सूचना करणारे फलकही लावले आहेत; मात्र वाहनचालक याकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात वाहने चालविणे पसंत करतात. त्यामुळे अचानकपणे संध्याकाळनंतर भक्ष्याच्या शोधात भटकं ती करणाºया बिबट्यासारख्या वन्यजिवांना आपले प्राण वाहनांच्या धडकेत गमवावे लागत आहे. वेग मर्यादेत असल्यास अचानकपणे बिबट्यासारखे वन्यजीव रस्ता ओलांडताना समोर आल्यास वाहन नियंत्रीत करणे शक्य होऊन अपघात टाळता येऊ शकतो; मात्र जर अमर्याद वेगाने वाहन धावत असेल तर मात्र अपघात टाळणे वाहनचालकांना शक्य होत नाही. अस्तित्वालाच धोका ! उसाच्या क्षेत्रात किंवा अन्य शेतीच्या क्षेत्रात व मोकळ्या भूखंडावर भक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा बिबट्याची वाट चुकते आणि संरक्षक कठडे नसलेल्या जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जिवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसित केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बिबट्या ठार होऊ लागला आहे. यामुळे बिबट्याचे अस्तित्वच जणू धोक्यात आले आहे. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. येथे पडले बिबटे मृत्युमुखी नाशिक-मुंबई महामार्गावरील पाडळी, विल्होळी शिवारात प्रत्येकी एक पुणे महामार्ग सिन्नर वनपरिक्षेत्रात दोन सिन्नर-घोटी राज्य मार्गावर एक मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड शिवारात एक असे सहा बिबटे अपघातात मृत्युमुखी पडले.

टॅग्स :TigerवाघAccidentअपघात