शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अकरा महिन्यांत सहा बिबटे अपघातांत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:17 IST

राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणाºया वाहनांपुढे जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस सदर समस्या गंभीर रूप धारण करत असून, ही धक्कादायक बाब आहे.

अझहर शेख ।नाशिक : राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणाºया वाहनांपुढे जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस सदर समस्या गंभीर रूप धारण करत असून, ही धक्कादायक बाब आहे.  जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, दिंडोरी, बागलाण, सटाणा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील परिसरात बिबट्याचा अधिवास आढळतो. त्यामुळे या भागात मानव-बिबट्याचा संघर्षही पहावयास मिळतो. पुरेसे भक्ष्य ऊसशेतीमध्ये किंवा परिसरातील विरळ झालेल्या वनक्षेत्रात न मिळाल्यामुळे मानवी वस्तीकडे भरकटणारा बिबट्या कधी शेतकºयांच्या पशुधनावर तर कधी लहान मुलांवर हल्ले करत असल्याच्या अनेक घटना या भागामध्ये घडल्या आहेत. दरम्यान, या तालुक्यांमधून जाणारे राज्य व राष्टÑीय महामार्ग ओलांडताना बिबट्यांना जीव गमवावा लागत आहे. महामार्गावरून धावणाºया वाहनांमुळे रस्ता ओलांडताना बिबटे गतप्राण होत आहेत. बिबट्यांसारख्या अन्य वन्यजिवांचाही महामार्गांलगतच्या वनक्षेत्रात असलेला वावर लक्षात घेत त्या वनपरिक्षेत्रांच्या हद्दीत संबंधित वनविभागाने ‘वन्यजिवांचा वावर, वाहने सावकाश चालवा’ असे आवाहन वजा सूचना करणारे फलकही लावले आहेत; मात्र वाहनचालक याकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात वाहने चालविणे पसंत करतात. त्यामुळे अचानकपणे संध्याकाळनंतर भक्ष्याच्या शोधात भटकं ती करणाºया बिबट्यासारख्या वन्यजिवांना आपले प्राण वाहनांच्या धडकेत गमवावे लागत आहे. वेग मर्यादेत असल्यास अचानकपणे बिबट्यासारखे वन्यजीव रस्ता ओलांडताना समोर आल्यास वाहन नियंत्रीत करणे शक्य होऊन अपघात टाळता येऊ शकतो; मात्र जर अमर्याद वेगाने वाहन धावत असेल तर मात्र अपघात टाळणे वाहनचालकांना शक्य होत नाही. अस्तित्वालाच धोका ! उसाच्या क्षेत्रात किंवा अन्य शेतीच्या क्षेत्रात व मोकळ्या भूखंडावर भक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा बिबट्याची वाट चुकते आणि संरक्षक कठडे नसलेल्या जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जिवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसित केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बिबट्या ठार होऊ लागला आहे. यामुळे बिबट्याचे अस्तित्वच जणू धोक्यात आले आहे. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. येथे पडले बिबटे मृत्युमुखी नाशिक-मुंबई महामार्गावरील पाडळी, विल्होळी शिवारात प्रत्येकी एक पुणे महामार्ग सिन्नर वनपरिक्षेत्रात दोन सिन्नर-घोटी राज्य मार्गावर एक मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड शिवारात एक असे सहा बिबटे अपघातात मृत्युमुखी पडले.

टॅग्स :TigerवाघAccidentअपघात