शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

चार गावांमधील सरपंच बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:09 IST

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द, शिरसमणी, कुंडाणे (ओ) व जयपूरच्या थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, बारा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी १७ उमेदवारांनी माघार नोंदविल्याने ३३ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

कळवण : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द, शिरसमणी, कुंडाणे (ओ) व जयपूरच्या थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, बारा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी १७ उमेदवारांनी माघार नोंदविल्याने ३३ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने जोरदार चुरस निर्माण झाली आहे.कळवण खुर्द, कुंडाणे (ओ) व जयपूर ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली असून, १४ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकीतून ७६ इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदविल्याने ६७ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर आठ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत.आॅक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान मुदत संपणाºया तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबरला तालुक्यात मतदान होणार असल्याने गावपातळीवर प्रचाराने जोर धरला आहे. हायटेक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, स्थानिक पुढाºयांसह त्यांना मानणाºया नेत्यांचीही प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. यंदा पहिल्यांदाच गावचा सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार असून, त्या पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने लोकनियुक्त १२ गावांतील सरपंचपदासाठी ३३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १४ ग्रामपंचायतींच्या ६४ जागांसाठी १३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने जोरदार रस्सीखेच होईल असे दिसून येते आहे. थेट सरपंचपदासाठीच्या १२ जागांसाठी ३३ (कोसुर्डे- २, पिळकोस- ३, देसराणे- २, मानूर- ४, भादवण- ३, पाळे खुर्द- २, वाडी बु.-३, बगडू- २, गोळाखाल- ५, जयदर-३, निवाणे- २, सुळे- २) उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ६४ जागांसाठी १३२ उमेदवार रिंगणात- कोसुर्डे ग्रामपंचायतमध्ये ३ प्रभागांतील ९ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून, त्यात एकनाथ बागुल, प्रभाबाई गायकवाड, निर्मला बागुल, प्रमिला वाघ व एकनाथ वाघ यांचा समावेश आहे. ४ जागांसाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पिळकोस ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांतील नऊ जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली. सोनाली राजेंद्र जाधव या बिनविरोध झाल्या असून, चार इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदविल्याने आठ जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. देसराणे ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांतील नऊ जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या. त्यात हिरामण बहिरम, सिंधूबाई बहिरम व शिवदासानी पवार बिनविरोध निवडून आले असून, दोघांनी माघार नोंदविल्याने सहा जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मानूर ग्रामपंचायतीमध्ये पाच प्रभागांतील १३ जागांपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या. त्यात गोपाळ पिठे, योगेश चव्हाण, वंदना पिठे, अनिल गांगुर्डे, गजेंद्र पवार, रंजना कुवर हे बिनविरोध निवडून आले असून, १३ इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदविल्याने पाच जागांसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात असून, दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. भादवण ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांतील नऊ जागांपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात रमेश पवार, पुष्कराज पाटील, रेश्माबाई पवार, प्रवीण जाधव, गुंजाबाई पवार व ललिता नीलेश जाधव हे बिनविरोध निवडून आले असून, १० उमेदवारांनी माघार नोंदविल्याने तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पाळे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांतील नऊ जागांसाठी १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, सहा इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदवली आहे.वाडी बु. ग्रामपंचायतमध्ये चार प्रभागांतील ११ जागांपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात दत्तू बागुल, सुमनताई वाघ, प्रभाकर पवार, मनीषा सोनवणे, भारती बोरसे व कमल मोरे हे बिनविरोध निवडून आले असून, नऊ इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदविल्याने पाच जागांसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बगडू ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांतील सात जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात दोधा पवार, साळूबाई सोनवणे, निंबा वाघ बिनविरोध निवडून आले असून, दोन उमेदवारांनी माघार नोंदविल्याने चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गोळाखाल ग्रामपंचायतीमध्ये चार प्रभागांतील ११ जागांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात बापू बहिरम, उज्ज्वला बहिरम, अनुसया पवार, मनीराम पवार, प्रकाश अहेर, कुसुम अहेर, भगवान महाले व जनाबाई पवार हे बिनविरोध निवडून आले असून, पाच उमेदवारांनी माघार नोंदविल्याने तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.