शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सिन्नर तालुक्यात शेतात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:06 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. जनावरांना या पावसाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. जनावरांना या पावसाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. शेतमालाचे नुकसान होण्यासह शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी राहिली आहे. पशूधनही अडचणीत असून पाथरे परिसरातील शेतक-यांना पावसामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सोयाबीन, मका, बाजरी, डाळिंब, घास, द्राक्ष यासारखे पिकांचा पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकºयांना शेतामध्ये अजूनही पावसाचे पाणी तुंबलेले, साचलेले आहे. त्यामुळे रोगराईला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जनावरांनाही वेगवेगळे आजार होऊ लागले आहे. डासांच्या प्रमाणात वाढ होत आहे. येथील विनायक बन्सी नरोडे, सुरेश बन्सी नरोडे, गणपत शिवराम नरोडे, सतीश शिंदे या शेतकºयांच्या शेतात पावसाच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उजव्या कालव्याच्या शेजारीच या शेतकºयांची शेती, घरे आहेत. जवळपास एक महिन्यापासून पावसामुळे वाहून येणारे पाणी या शेतकºयांच्या शेतात साठत आहे. यामुळे तीन एकर डाळिंब, दोन एकर ऊस, दीड एकर मका, एक बिघा वांगे, घास आदी पिके पाण्यात आहे. शेजारी उजवा कालवा आणि बारा गाव पाणी पुरवठा योजना यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जीरत नाही आणि वाहून जाण्यास जागा नसल्याने ते तुंबून राहत आहे. त्यामुळे जवळपास वीस जनावरे गोठ्यात बांधता येत नाही आणि जनावरांना जमिनीवर बसताही येत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी बाधित शेतकºयांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेत त्यांना प्रशासनामार्फत योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक