शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सिन्नर फाटा उपबाजार समितीत शुकशुकाट

By admin | Updated: June 2, 2017 01:48 IST

बळीराजाने पहिल्यांदाच संपाचे हत्यार उपसल्याने कुठलाही शेतीमाल कृषी बाजार समितीमध्ये गेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी बळीराजाने पहिल्यांदाच संपाचे हत्यार उपसल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील गावातून कुठलाही शेतीमाल कृषी बाजार समितीमध्ये गेला नाही. तर भाजी बाजारातील विक्रेत्यांनी गुरुवारी संपाच्या पहिल्या दिवशी भाजीबाजारात संपाचा परिणाम जाणवला नाही.शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी पहिल्यांदाच गुरुवारपासून संपाचे हत्यार उपसले होते. शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता व शासनाविरुद्ध असलेला संताप शहराबाहेरील ग्रामीण भागात जाणवत होता. संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्रीपर्यंत भाजीबाजारात विक्रेत्यांकडे शेतीमाल व भाजीपाला उतरविला जात होता. त्यामुळे भाजीविक्रेत्यांकडे एक-दोन दिवस विक्रीकरिता येईल इतका भाजीपाला उपलब्ध असल्याचे गुरुवारी संपाच्या पहिल्या दिवशी भाजीबाजारात संपाचा जास्त असर जाणवला नाही. मात्र कांदा, बटाटे, फळ, भाजी व इतर काही भाज्या या चार-पाच दिवस टिकत असल्याने त्यांचा साठा बहुतांश विक्रेत्यांकडे आहे. मात्र हिरवा भाजीपाला हा लवकर नाशवंत होत असल्याने शुक्रवारी दुपारनंतर भाजीबाजारात त्यांची टंचाई भासण्याची दाट शक्यता आहे. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावातून गुरुवारी कुठलाही शेतीमाल, भाजीपाला हा कृषी बाजार समिती, भाजी मार्केटमध्ये विक्रीसाठी आला नाही. सिन्नरफाटा येथील कृषि बाजार समितीचा उपबाजारात हा शेतकऱ्यांच्या संपामुळे शुकशुकाट पसरला होता. शेतकऱ्यांनी संपाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण ताकदीसह संप यशस्वी केल्याने शुक्रवारपासून बाजारात दूध, भाजीपाला आदिंचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकरोड भागातूनदेखील मुंबई-ठाण्याला भाजीपाला घेऊन जाणारा एक ट्रकसुद्धा गेला नाही. तसेच नाशिकरोड व आजुबाजूच्या ग्रामीण भागातून दुधाचे संकलन झाले नाही. संगमनेर, लोणी, बाभळेश्वर व नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नाशिक-पुणे महामार्गाने मुंबई, ठाणे, नाशिक आदि ठिकाणी दूध येते. मात्र शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांमुळे त्यांनीदेखील दुधाचे टॅँकर पाठविले नाही. यामुळे शुक्रवारपासुन दुधाचादेखील तुटवडा भासणार असल्याचे बोलले जात आहे.