शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

घाटांवर साचला गाळ

By admin | Updated: September 21, 2015 23:33 IST

अस्वच्छता : घाटांची स्वच्छता राखण्याचे आव्हान

नाशिक : कुंभमेळ्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने गोदावरी नदीकिनारी कॉँक्रीट घाट बांधले. टाळकुटेश्वर पुलापासून तर थेट टाकळीपर्यंत कॉँक्रीट घाट तयार करण्यात आले आहेत. या घाटांवरील पाणी ओसरल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात गाळ साचला. गोदाकाठालगत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुर्गंधी फैलावत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.कुंभमेळ्याचे शाहीस्नान आटोपल्यानंतर नदीपात्राची पाण्याची पातळीही कमी झाली आहे. यामुळे गोदाकाठालगत नव्याने बांधण्यात आलेल्या घाटांवरील पाणी ओसरले असून सर्वत्र गाळ साचला आहे. यामुळे कुंभमेळ्याच्या पर्वणीआगोदर चकाकणारे कॉँक्रीट घाट गाळामध्ये हरविले आहे. परिणामी नदीसौंदर्याचे तीनतेरा वाजले आहे. या घाटांची स्वच्छता राखण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आगामी काळामध्ये राहणार आहे. कारण टाळकुटेश्वर पुलापासून तर थेट गोदावरी कपिला संगमापर्यंत अखंड कॉँक्रीट घाट तयार करण्यात आला आहे. या घाटांवर भाविकांना उतरण्यासाठी रस्तेदेखील तयार करण्यात आल्यामुळे भविष्यात येथे भिकाऱ्यांचे वास्तव्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सार्वजनिक शौचालयाचे ठिकाण म्हणूनदेखील घाटांचा वापर होण्याचा धोका असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाने तयार केलेले कॉँक्रीट घाट स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचा यक्षप्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)