शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

पारा ४१ अंशांवर पोहोचण्याची चिन्हे

By admin | Updated: May 4, 2015 00:47 IST

पारा ४१ अंशांवर पोहोचण्याची चिन्हे

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून ३९ अंश सेल्सिअसवर स्थिर असलेल्या तपमानाच्या पाऱ्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात नोंदवला गेलेला ४० अंशांचा उच्चांक यंदा एप्रिलमध्येच अनुभवायला आला असून, मेअखेरीस पारा ४१ अंशांवर पोहोचण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या आठवड्याच्या उत्तरार्धात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारी शहराचे कमाल तपमान ३८.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. गेल्या काही दिवसांपासून शहराचे कमाल तपमान ३८ अंशांच्या वरच आहे. त्यामुळे सकाळी अकरा वाजेनंतर लोक कामाशिवाय घराबाहेर पडेनासे झाले आहेत. कार्यालयांतील कर्मचारी व अन्य व्यावसायिक डोके व चेहरा झाकूनच घराबाहेर पडत आहेत. दुपारी रस्ते ओस पडत आहेत. आज रविवार असल्याने दुपारी काही तास रस्ते निर्मनुष्य झाले होते. सध्या लग्नसराई सुरू असून, दाट लग्नतिथी आहेत. त्यामुळे भर उन्हातच लोकांना विवाहाची खरेदी, बस्ते करावे लागत असून, विवाह सोहळ्यांना हजेरी लावताना चांगलाच घाम निघत आहे. दरम्यान, दरवर्षी मे महिन्यात वादळ व मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसतो. या आठवड्यात ८ व ९ मे रोजी जिल्ह्यात असा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी