शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

विंचूर ग्रामपालिकेत पॅनलनिर्मितीचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 15:48 IST

विंचूर : ग्रामपालिका निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसे येथील वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणती रणनीती आखायची यासाठी सार्वजनिक बैठकांसह गुप्त बैठकांचा जोर वाढू लागला आहे. कोणाची काय रणनीती असणार याचा कानोसा इच्छुकांकडून घेतला जात आहे. गटातटावर अवलंबून असणाऱ्या या निवडणुकीत यंदा मात्र पॅनलनिर्मितीचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देनिवडणुकीचे वातावरण तापले : गुप्त बैठकांना जोर

निफाड तालुक्यातील महत्त्वाच्या आणि मोठ्या ग्रामपालिकांपैकी विंचूर हे एक गाव मानले जाते; परंतु गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकीत एकहाती नेतृत्व विंचूरला लाभले नाही. पूर्वीच्या काळी भास्करराव दरेकर पाटील यांच्या रूपाने एक नेतृत्व होते, तर त्यांच्या विरोधात लक्ष्मणराव माधवराव गुंजाळ यांचे नेतृत्व होते. या दोघांनाही काका नावाने लोक संबोधित. अनेक वर्षे दोन्ही काका एकमेकांच्या विरोधात पॅनल तयार करून निवडणुका लढावायचे. मात्र नंतरच्या काळात नाशिक जिल्ह्यात विंचूर असे गाव राहिले, की येथे कोणाचे पॅनल निर्मित होऊन एक हाती नेतृत्व तयार झाले नाही.यंदाच्या निवडणुकीत मात्र पॅनलनिर्मिती करून निवडणूक लढवावी या उद्देशाने येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वपक्षीय, सर्व जातीय, धर्माचे, सर्व पक्षांचे सामुदायिक नेतृत्व पुढे येऊन गावासाठी चांगला सक्षम पर्याय देण्याबाबत विचार-विनिमय करण्यात आला. यापूर्वीच्या निवडणुका प्रत्येक वॉर्डमध्ये आपापले नेतृत्व प्रस्थापित करून निवडणुका व्हायच्या व नंतर सरपंचपदासाठी रस्सीखेच, वेगवेगळ्या गोष्टींचा, जातीचा उपयोग करून सत्ता स्थापन झाल्या. सरपंच व उपसरपंचपदासाठी मोठ्या प्रमाणात निवडणुका झाल्या. यात वेळ, पैसा खर्च झाला. अनेक मोठ्या गावांमध्ये पॅनलनिर्मिती करून निवडणुका लढविल्या जातात, तशा विंचूरलाही व्हाव्यात अशी अनेकांची इच्छा होती. निवडणुकीत सामुदायिक नेतृत्वाने गावाला १७ लोकांचे पॅनल देऊन योग्य पर्याय देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्या माध्यमातून गावातील विविध पक्षांतील,सर्व जातीधर्माचे लोक एकत्र आले. ज्येष्ठ नागरिक भवनात झालेल्या बैठकीस प्रत्येकाने आपली भूमिका मांडली. उपस्थितांनी त्यास अनुमती दिली. या बैठकीत ॲड. संजय दरेकर, किशोर पाटील, संजय शेवाळे, कैलास सोनवणे, राजाराम दरेकर, अशोक दरेकर, सचिन दरेकर, अनिल मालपाणी, ॲड. जयंत शिरसाठ, आत्माराम दरेकर, किशोर जेऊघाले, आस्लम शेख, बाळासाहेब नेवगे, योगेश निकाळे, संदीप दरेकर यांनी विचार मांडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढील बैठक सावता महाराज मंदिरात बोलाविण्यात येऊन बैठकींंचे सत्र सुरू झाले. या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर चर्चा झाली. गावाच्या विकासासाठी सर्वांना सामावून पॅनलनिर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यासाठी ग्रामसमिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापल्याचे चित्र आहे. ग्रामपालिका सदस्य कसा असावा, सरपंच कसा असावा, यासाठीचे संदेश, विनोद, मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणूक, सरपंच यांच्याबाबत यापूर्वी विनोदातून मांडलेले भास्करराव पेरे पाटील आणि इंदोरीकर महाराज यांचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत