शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

विंचूर ग्रामपालिकेत पॅनलनिर्मितीचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 15:48 IST

विंचूर : ग्रामपालिका निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसे येथील वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणती रणनीती आखायची यासाठी सार्वजनिक बैठकांसह गुप्त बैठकांचा जोर वाढू लागला आहे. कोणाची काय रणनीती असणार याचा कानोसा इच्छुकांकडून घेतला जात आहे. गटातटावर अवलंबून असणाऱ्या या निवडणुकीत यंदा मात्र पॅनलनिर्मितीचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देनिवडणुकीचे वातावरण तापले : गुप्त बैठकांना जोर

निफाड तालुक्यातील महत्त्वाच्या आणि मोठ्या ग्रामपालिकांपैकी विंचूर हे एक गाव मानले जाते; परंतु गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकीत एकहाती नेतृत्व विंचूरला लाभले नाही. पूर्वीच्या काळी भास्करराव दरेकर पाटील यांच्या रूपाने एक नेतृत्व होते, तर त्यांच्या विरोधात लक्ष्मणराव माधवराव गुंजाळ यांचे नेतृत्व होते. या दोघांनाही काका नावाने लोक संबोधित. अनेक वर्षे दोन्ही काका एकमेकांच्या विरोधात पॅनल तयार करून निवडणुका लढावायचे. मात्र नंतरच्या काळात नाशिक जिल्ह्यात विंचूर असे गाव राहिले, की येथे कोणाचे पॅनल निर्मित होऊन एक हाती नेतृत्व तयार झाले नाही.यंदाच्या निवडणुकीत मात्र पॅनलनिर्मिती करून निवडणूक लढवावी या उद्देशाने येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वपक्षीय, सर्व जातीय, धर्माचे, सर्व पक्षांचे सामुदायिक नेतृत्व पुढे येऊन गावासाठी चांगला सक्षम पर्याय देण्याबाबत विचार-विनिमय करण्यात आला. यापूर्वीच्या निवडणुका प्रत्येक वॉर्डमध्ये आपापले नेतृत्व प्रस्थापित करून निवडणुका व्हायच्या व नंतर सरपंचपदासाठी रस्सीखेच, वेगवेगळ्या गोष्टींचा, जातीचा उपयोग करून सत्ता स्थापन झाल्या. सरपंच व उपसरपंचपदासाठी मोठ्या प्रमाणात निवडणुका झाल्या. यात वेळ, पैसा खर्च झाला. अनेक मोठ्या गावांमध्ये पॅनलनिर्मिती करून निवडणुका लढविल्या जातात, तशा विंचूरलाही व्हाव्यात अशी अनेकांची इच्छा होती. निवडणुकीत सामुदायिक नेतृत्वाने गावाला १७ लोकांचे पॅनल देऊन योग्य पर्याय देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्या माध्यमातून गावातील विविध पक्षांतील,सर्व जातीधर्माचे लोक एकत्र आले. ज्येष्ठ नागरिक भवनात झालेल्या बैठकीस प्रत्येकाने आपली भूमिका मांडली. उपस्थितांनी त्यास अनुमती दिली. या बैठकीत ॲड. संजय दरेकर, किशोर पाटील, संजय शेवाळे, कैलास सोनवणे, राजाराम दरेकर, अशोक दरेकर, सचिन दरेकर, अनिल मालपाणी, ॲड. जयंत शिरसाठ, आत्माराम दरेकर, किशोर जेऊघाले, आस्लम शेख, बाळासाहेब नेवगे, योगेश निकाळे, संदीप दरेकर यांनी विचार मांडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढील बैठक सावता महाराज मंदिरात बोलाविण्यात येऊन बैठकींंचे सत्र सुरू झाले. या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर चर्चा झाली. गावाच्या विकासासाठी सर्वांना सामावून पॅनलनिर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यासाठी ग्रामसमिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापल्याचे चित्र आहे. ग्रामपालिका सदस्य कसा असावा, सरपंच कसा असावा, यासाठीचे संदेश, विनोद, मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणूक, सरपंच यांच्याबाबत यापूर्वी विनोदातून मांडलेले भास्करराव पेरे पाटील आणि इंदोरीकर महाराज यांचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत