शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

दिंडोरी तालुक्यात महिलाराजची चिन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:23 IST

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महिला उमेदवारांनी बाजी मारत आदीशक्तीची ताकद दाखविल्याने तालुक्यात ब-याच ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसाठ ग्रामपंचायत निवडणूकीत २७९ महिला विजयी

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महिला उमेदवारांनी बाजी मारत आदीशक्तीची ताकद दाखविल्याने तालुक्यात ब-याच ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दिंडोरी तालुक्यात नुकत्याच साठ गावांच्या ग्रामपंचायत निवडणूका या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या . काही गावांमध्ये पॅनल निर्माण झाले होते. तर काही गावांमध्ये पॅनलची निर्मिती नव्हती. वैयक्तिक प्रचार करून उमेदवार आपल्या प्रभागातून निवडून आले.यंदाच्या निवडणूकीचे मुख्य वैशिष्ट्ये ठरले ते महिला वर्गाने उभारलेली विजयाची गुढी. या निवडणुकीत साठ ग्रामपंचायतीमधुन जवळ जवळ २७९ महिला उमेदवार निवडून आल्याने एक प्रकारे आश्चर्यकारक धक्कांच दिला आहे.तर २४० पुरुष उमेदवार उमेदवार निवडून आलेले आहेत.विशेष म्हणजे निवडून आलेल्या महिला उमेदवारांनी मातब्बर महिला उमेदवारांचा पराभव केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ब-याच ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच होतील का काय ? त्यामुळे येत्या २८ जानेवारीला कोण सरपंचपदाचे दावेदार होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लखमापुरला गेल्या वीस वर्षांपासुन महिला सरपंच आहे. त्यात सुभद्रा देशमुख, ज्योती देशमुख, वर्षा सोनवणे, मंगला सोनवणे या महिलांनी लखमापुरगावचे सरपंच पद भुषविले आहे. त्यामुळे यंदा लखमापुर येथील महिला सरपंच मालिका खंडित होते की काय?लखमापुर ग्रामपंचायतीवर आतापर्यंत फक्त एकच महिला उपसरपंच म्हणून निवडून आलेल्या आहे. त्यानंतर सर्व पुरुष वर्गाकडेच उपसरपंचपदांचा कार्यभाग पाहायला मिळतो. यंदाच्या निवडणूकीत मातब्बर उमेदवारांचा पराभव झाल्याने आता पुढे काय ? याकडे संपूर्ण लखमापुरवासीयांचे लक्ष लागले आहे.यंदा जरी महिला उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून असल्या तरी पण काही ग्रामपंचायतीवर पुरुष सरपंचपद जास्त मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. यंदाच्या निवडणूकीत तरुण महिला उमेदवारांनी जोरदार मुंसडी मारल्याने मातब्बर जुन्या व अनुभवी महिला उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे यंदा राजकारणांचा अनुभव नसलेल्या नवीन महिला उमेदवार गाव विकासासाठी काय नवीन धोरण अवलंबतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.- यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक मातब्बर उमेदवारांना पराभव पाहावा लागला.- गावच्या विकासांच्या ध्येयाने महिला उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या.- निवडून आलेल्या सर्व महिला युवा उमेदवार उच्च शिक्षीत.- तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत यंदा तरुण वर्ग मोठ्या संख्येने उतरला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारण