शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

दिंडोरी तालुक्यात महिलाराजची चिन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:23 IST

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महिला उमेदवारांनी बाजी मारत आदीशक्तीची ताकद दाखविल्याने तालुक्यात ब-याच ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसाठ ग्रामपंचायत निवडणूकीत २७९ महिला विजयी

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महिला उमेदवारांनी बाजी मारत आदीशक्तीची ताकद दाखविल्याने तालुक्यात ब-याच ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दिंडोरी तालुक्यात नुकत्याच साठ गावांच्या ग्रामपंचायत निवडणूका या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या . काही गावांमध्ये पॅनल निर्माण झाले होते. तर काही गावांमध्ये पॅनलची निर्मिती नव्हती. वैयक्तिक प्रचार करून उमेदवार आपल्या प्रभागातून निवडून आले.यंदाच्या निवडणूकीचे मुख्य वैशिष्ट्ये ठरले ते महिला वर्गाने उभारलेली विजयाची गुढी. या निवडणुकीत साठ ग्रामपंचायतीमधुन जवळ जवळ २७९ महिला उमेदवार निवडून आल्याने एक प्रकारे आश्चर्यकारक धक्कांच दिला आहे.तर २४० पुरुष उमेदवार उमेदवार निवडून आलेले आहेत.विशेष म्हणजे निवडून आलेल्या महिला उमेदवारांनी मातब्बर महिला उमेदवारांचा पराभव केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ब-याच ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच होतील का काय ? त्यामुळे येत्या २८ जानेवारीला कोण सरपंचपदाचे दावेदार होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लखमापुरला गेल्या वीस वर्षांपासुन महिला सरपंच आहे. त्यात सुभद्रा देशमुख, ज्योती देशमुख, वर्षा सोनवणे, मंगला सोनवणे या महिलांनी लखमापुरगावचे सरपंच पद भुषविले आहे. त्यामुळे यंदा लखमापुर येथील महिला सरपंच मालिका खंडित होते की काय?लखमापुर ग्रामपंचायतीवर आतापर्यंत फक्त एकच महिला उपसरपंच म्हणून निवडून आलेल्या आहे. त्यानंतर सर्व पुरुष वर्गाकडेच उपसरपंचपदांचा कार्यभाग पाहायला मिळतो. यंदाच्या निवडणूकीत मातब्बर उमेदवारांचा पराभव झाल्याने आता पुढे काय ? याकडे संपूर्ण लखमापुरवासीयांचे लक्ष लागले आहे.यंदा जरी महिला उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून असल्या तरी पण काही ग्रामपंचायतीवर पुरुष सरपंचपद जास्त मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. यंदाच्या निवडणूकीत तरुण महिला उमेदवारांनी जोरदार मुंसडी मारल्याने मातब्बर जुन्या व अनुभवी महिला उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे यंदा राजकारणांचा अनुभव नसलेल्या नवीन महिला उमेदवार गाव विकासासाठी काय नवीन धोरण अवलंबतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.- यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक मातब्बर उमेदवारांना पराभव पाहावा लागला.- गावच्या विकासांच्या ध्येयाने महिला उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या.- निवडून आलेल्या सर्व महिला युवा उमेदवार उच्च शिक्षीत.- तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत यंदा तरुण वर्ग मोठ्या संख्येने उतरला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारण