शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात महिलाराजची चिन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:23 IST

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महिला उमेदवारांनी बाजी मारत आदीशक्तीची ताकद दाखविल्याने तालुक्यात ब-याच ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसाठ ग्रामपंचायत निवडणूकीत २७९ महिला विजयी

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महिला उमेदवारांनी बाजी मारत आदीशक्तीची ताकद दाखविल्याने तालुक्यात ब-याच ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दिंडोरी तालुक्यात नुकत्याच साठ गावांच्या ग्रामपंचायत निवडणूका या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या . काही गावांमध्ये पॅनल निर्माण झाले होते. तर काही गावांमध्ये पॅनलची निर्मिती नव्हती. वैयक्तिक प्रचार करून उमेदवार आपल्या प्रभागातून निवडून आले.यंदाच्या निवडणूकीचे मुख्य वैशिष्ट्ये ठरले ते महिला वर्गाने उभारलेली विजयाची गुढी. या निवडणुकीत साठ ग्रामपंचायतीमधुन जवळ जवळ २७९ महिला उमेदवार निवडून आल्याने एक प्रकारे आश्चर्यकारक धक्कांच दिला आहे.तर २४० पुरुष उमेदवार उमेदवार निवडून आलेले आहेत.विशेष म्हणजे निवडून आलेल्या महिला उमेदवारांनी मातब्बर महिला उमेदवारांचा पराभव केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ब-याच ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच होतील का काय ? त्यामुळे येत्या २८ जानेवारीला कोण सरपंचपदाचे दावेदार होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लखमापुरला गेल्या वीस वर्षांपासुन महिला सरपंच आहे. त्यात सुभद्रा देशमुख, ज्योती देशमुख, वर्षा सोनवणे, मंगला सोनवणे या महिलांनी लखमापुरगावचे सरपंच पद भुषविले आहे. त्यामुळे यंदा लखमापुर येथील महिला सरपंच मालिका खंडित होते की काय?लखमापुर ग्रामपंचायतीवर आतापर्यंत फक्त एकच महिला उपसरपंच म्हणून निवडून आलेल्या आहे. त्यानंतर सर्व पुरुष वर्गाकडेच उपसरपंचपदांचा कार्यभाग पाहायला मिळतो. यंदाच्या निवडणूकीत मातब्बर उमेदवारांचा पराभव झाल्याने आता पुढे काय ? याकडे संपूर्ण लखमापुरवासीयांचे लक्ष लागले आहे.यंदा जरी महिला उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून असल्या तरी पण काही ग्रामपंचायतीवर पुरुष सरपंचपद जास्त मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. यंदाच्या निवडणूकीत तरुण महिला उमेदवारांनी जोरदार मुंसडी मारल्याने मातब्बर जुन्या व अनुभवी महिला उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे यंदा राजकारणांचा अनुभव नसलेल्या नवीन महिला उमेदवार गाव विकासासाठी काय नवीन धोरण अवलंबतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.- यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक मातब्बर उमेदवारांना पराभव पाहावा लागला.- गावच्या विकासांच्या ध्येयाने महिला उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या.- निवडून आलेल्या सर्व महिला युवा उमेदवार उच्च शिक्षीत.- तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत यंदा तरुण वर्ग मोठ्या संख्येने उतरला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारण