शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
2
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
3
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
4
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
5
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
6
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
7
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
8
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
9
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
10
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
11
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
12
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
13
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
14
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
15
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
16
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
17
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
18
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
19
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
20
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीनंतर  त्रिशंकू सरकार येण्याचे संकेत : सुरेश भटेवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:06 IST

यंदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू सरकार सत्तेवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी वर्तवले आहे.

नाशिक : यंदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू सरकार सत्तेवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी वर्तवले आहे.कुसुमाग्रज स्मारक येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत मानव उत्थान मंचतर्फे अंतर्गत ६४ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी ‘लोकसभा निवडणुकीचे अंतरंग’ या विषयावर बोलताना त्यांनी देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचे सांगतानाच निवडणुकीत विकासाचे मुद्दे नसून त्याऐवजी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक असे विषय पुढे आणले जात असल्याचे अधोरेखित केले. गेल्या पंचवार्षिकमध्ये २०१४ पेक्षा आता परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणात आता पूर्वीसारखा आवेश नसून ते बचावात्मक पवित्र्यात दिसत आहे. सरकारचे परराष्ट्र धोरणही कुचकामी ठरत असून, मागील पाच वर्षांत पंतप्रधानांनी ८६ देशांचे दौरे केले, पण त्यातून भारताला काही लाभ झाल्याचे वाटत नाही. बांगलादेश, श्रीलंका यांसारखे पारंपरिक शेजारी देश आपल्यापासून दुरावले. नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था रुळावरून घसरली आहे. उद्योगधंदे, बँकिंग क्षेत्र अडचणीत आले असून बेरोजगारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एनडीएला २२५ पर्यंतच मजल मारणे शक्य होणार असून, बिजू जनता दल, एआयएडीएमके, तेलगू देसम, वायएसआर पक्ष, टीआरएस यांनी मदत केल्यास एनडीएला पुन्हा देशात सत्ता मिळवता येईल. तर काँग्रेसचीही अशीच स्थिती असून, त्यांनाही बहुमताचा आकडा मिळवणे कठीणच आहे. त्यांच्याकडे किंगमेकरची भूमिका राहू शकते. मात्र कोणत्याही स्थितीत एकाच पक्षाच्या हाती संपूर्ण सत्ता मिळणे यावेळी कठीण असल्याचे मत सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले. शामला चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. घिया यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक