शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

लोकसभा निवडणुकीनंतर  त्रिशंकू सरकार येण्याचे संकेत : सुरेश भटेवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:06 IST

यंदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू सरकार सत्तेवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी वर्तवले आहे.

नाशिक : यंदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू सरकार सत्तेवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी वर्तवले आहे.कुसुमाग्रज स्मारक येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत मानव उत्थान मंचतर्फे अंतर्गत ६४ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी ‘लोकसभा निवडणुकीचे अंतरंग’ या विषयावर बोलताना त्यांनी देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचे सांगतानाच निवडणुकीत विकासाचे मुद्दे नसून त्याऐवजी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक असे विषय पुढे आणले जात असल्याचे अधोरेखित केले. गेल्या पंचवार्षिकमध्ये २०१४ पेक्षा आता परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणात आता पूर्वीसारखा आवेश नसून ते बचावात्मक पवित्र्यात दिसत आहे. सरकारचे परराष्ट्र धोरणही कुचकामी ठरत असून, मागील पाच वर्षांत पंतप्रधानांनी ८६ देशांचे दौरे केले, पण त्यातून भारताला काही लाभ झाल्याचे वाटत नाही. बांगलादेश, श्रीलंका यांसारखे पारंपरिक शेजारी देश आपल्यापासून दुरावले. नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था रुळावरून घसरली आहे. उद्योगधंदे, बँकिंग क्षेत्र अडचणीत आले असून बेरोजगारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एनडीएला २२५ पर्यंतच मजल मारणे शक्य होणार असून, बिजू जनता दल, एआयएडीएमके, तेलगू देसम, वायएसआर पक्ष, टीआरएस यांनी मदत केल्यास एनडीएला पुन्हा देशात सत्ता मिळवता येईल. तर काँग्रेसचीही अशीच स्थिती असून, त्यांनाही बहुमताचा आकडा मिळवणे कठीणच आहे. त्यांच्याकडे किंगमेकरची भूमिका राहू शकते. मात्र कोणत्याही स्थितीत एकाच पक्षाच्या हाती संपूर्ण सत्ता मिळणे यावेळी कठीण असल्याचे मत सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले. शामला चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. घिया यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक