शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीनंतर  त्रिशंकू सरकार येण्याचे संकेत : सुरेश भटेवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:06 IST

यंदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू सरकार सत्तेवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी वर्तवले आहे.

नाशिक : यंदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू सरकार सत्तेवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी वर्तवले आहे.कुसुमाग्रज स्मारक येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत मानव उत्थान मंचतर्फे अंतर्गत ६४ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी ‘लोकसभा निवडणुकीचे अंतरंग’ या विषयावर बोलताना त्यांनी देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचे सांगतानाच निवडणुकीत विकासाचे मुद्दे नसून त्याऐवजी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक असे विषय पुढे आणले जात असल्याचे अधोरेखित केले. गेल्या पंचवार्षिकमध्ये २०१४ पेक्षा आता परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणात आता पूर्वीसारखा आवेश नसून ते बचावात्मक पवित्र्यात दिसत आहे. सरकारचे परराष्ट्र धोरणही कुचकामी ठरत असून, मागील पाच वर्षांत पंतप्रधानांनी ८६ देशांचे दौरे केले, पण त्यातून भारताला काही लाभ झाल्याचे वाटत नाही. बांगलादेश, श्रीलंका यांसारखे पारंपरिक शेजारी देश आपल्यापासून दुरावले. नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था रुळावरून घसरली आहे. उद्योगधंदे, बँकिंग क्षेत्र अडचणीत आले असून बेरोजगारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एनडीएला २२५ पर्यंतच मजल मारणे शक्य होणार असून, बिजू जनता दल, एआयएडीएमके, तेलगू देसम, वायएसआर पक्ष, टीआरएस यांनी मदत केल्यास एनडीएला पुन्हा देशात सत्ता मिळवता येईल. तर काँग्रेसचीही अशीच स्थिती असून, त्यांनाही बहुमताचा आकडा मिळवणे कठीणच आहे. त्यांच्याकडे किंगमेकरची भूमिका राहू शकते. मात्र कोणत्याही स्थितीत एकाच पक्षाच्या हाती संपूर्ण सत्ता मिळणे यावेळी कठीण असल्याचे मत सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले. शामला चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. घिया यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक