शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:54 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील तयार झालेली पिके काढण्यास पावसामुळे अडथळा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम रब्बी हंगामाची पेरणी वर झाला आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर पडण्याचे चित्र परिसरासह तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील तयार झालेली पिके काढण्यास पावसामुळे अडथळा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम रब्बी हंगामाची पेरणी वर झाला आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर पडण्याचे चित्र परिसरासह तालुक्यात पाहावयास मिळत आहे.यावर्षी पावसाचे आगमन उशिराने झाल्याने खरीप हंगामातील पिकांची पेरण्यांनाही खऱ्या अर्थाने जुलैनंतर वेग आला होता. या हंगामात पेरलेली मका, सोयाबीन व बाजरी यासारखी पिके आता काढणीला आली आहे. नांदूरशिंगोटे परिसरात साधारणत: १३०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे. यातील काही पिकांची सोंगणी झाली असून काही पिके अजूनही शेतात उभी आहेत.पावसाचे दिवस संपत आले तरी पावसाचा मुक्काम कायम आहे. त्यामुळे तयार झालेली पिके काढण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अधूनमधून जोरदार पाऊस होत असल्याने शेतात पाणी साचले आहे. सध्या पिके काढता येणे शक्य नाही. खरीपाची पिके अजूनही शेतात उभी असल्याने रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. नांदूरशिंगोटे परिसरात जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पिकांचे उद्दिष्ट आहे. यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजमितीस ज्वारी व हरभºयाच्या पेरणीला सुरुवात होणे आवश्यक होते. गव्हाची पेरणी थोडी उशिराने केली तरी चालणार आहे. या साºया पिकांच्या पेरण्यांसाठी आधी शेत तयार करावे लागणार असून, त्यासाठी खरिपाची पिके काढणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र हीच पिके शेतात उभी असल्याने शेत तयार करणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जोपर्यंत वाफसा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. येत्या दहा दिवसांत चांगल्या प्रमाणात ऊन पडले तर वाफसा होणार आहे. ही परिस्थिती पाहता रब्बीसाठी शेतकºयांना तूर्त तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक