शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:54 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील तयार झालेली पिके काढण्यास पावसामुळे अडथळा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम रब्बी हंगामाची पेरणी वर झाला आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर पडण्याचे चित्र परिसरासह तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील तयार झालेली पिके काढण्यास पावसामुळे अडथळा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम रब्बी हंगामाची पेरणी वर झाला आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर पडण्याचे चित्र परिसरासह तालुक्यात पाहावयास मिळत आहे.यावर्षी पावसाचे आगमन उशिराने झाल्याने खरीप हंगामातील पिकांची पेरण्यांनाही खऱ्या अर्थाने जुलैनंतर वेग आला होता. या हंगामात पेरलेली मका, सोयाबीन व बाजरी यासारखी पिके आता काढणीला आली आहे. नांदूरशिंगोटे परिसरात साधारणत: १३०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे. यातील काही पिकांची सोंगणी झाली असून काही पिके अजूनही शेतात उभी आहेत.पावसाचे दिवस संपत आले तरी पावसाचा मुक्काम कायम आहे. त्यामुळे तयार झालेली पिके काढण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अधूनमधून जोरदार पाऊस होत असल्याने शेतात पाणी साचले आहे. सध्या पिके काढता येणे शक्य नाही. खरीपाची पिके अजूनही शेतात उभी असल्याने रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. नांदूरशिंगोटे परिसरात जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पिकांचे उद्दिष्ट आहे. यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजमितीस ज्वारी व हरभºयाच्या पेरणीला सुरुवात होणे आवश्यक होते. गव्हाची पेरणी थोडी उशिराने केली तरी चालणार आहे. या साºया पिकांच्या पेरण्यांसाठी आधी शेत तयार करावे लागणार असून, त्यासाठी खरिपाची पिके काढणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र हीच पिके शेतात उभी असल्याने शेत तयार करणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जोपर्यंत वाफसा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. येत्या दहा दिवसांत चांगल्या प्रमाणात ऊन पडले तर वाफसा होणार आहे. ही परिस्थिती पाहता रब्बीसाठी शेतकºयांना तूर्त तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक