शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

‘एसएफआय’चा आदिवासी आयुक्तालयाला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 02:03 IST

आदिवासी वसतिगृहांतील खानावळ (मेस) बंद करून भोजनाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरण करण्याच्या निर्णयाविरोधात स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य समितीतर्फे मंगळवारी (दि. २८) आदिवासी आयुक्तालयात दिवसभर महाघेराव आंदोलन करण्यात आले.

नाशिक : आदिवासी वसतिगृहांतील खानावळ (मेस) बंद करून भोजनाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरण करण्याच्या निर्णयाविरोधात स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य समितीतर्फे मंगळवारी (दि. २८) आदिवासी आयुक्तालयात दिवसभर महाघेराव आंदोलन करण्यात आले.  आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत डीबीटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी विकास आयुक्तांनी स्वत: विद्यार्थ्यांना सामोरे जात आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा व आदिवीसी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत दि. ४ सप्टेंबरला मंत्रालयात एसएफआयच्या प्रतिनिधींसोबत बैठक निश्चित झाल्याचे लेखी आश्वासन आश्वासन दिले. त्यानंतर एसएफआयने आंदोलनाला स्थगिती दिली. मात्र प्रशासन व सरकारने शब्द फिरवला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे.आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहातील खानावळ (मेस) बंद करून ती रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने दि. ५ एप्रिलला घेतला आहे. हा शासन निर्णय वसतिगृह व्यवस्था मोडीत काढून आदिवासींचे शैक्षणिक भवितव्य उद््ध्वस्त करणारा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, हा निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी करीत स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य समितीने गुरुवारी या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी आदिवासी विकास आयुक्त किरण कुलकर्णी यांनी एसएफआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. विक्रम सिंग, मोहन जाधव, बालाजी कलेटवाड, कम्युनिस्ट नेते डॉ. अशोक ढवळे, किसान सभेचे डॉ. अजित नवले आदींच्या प्रतिनिधी मंडळाशी व आदिवासी विकास मंत्र्यांसोबत चर्चा करून डीबीटीच्या विषयावर दि. ४ सप्टेंबरला बैठक घेण्याचे आश्वासन दिले.परंतु, आंदोलकांचे समाधान न झाल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्तांनी आंदोलकांना सामोरे जाऊन लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनीही बंदोबस्त वाढविला; मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी किरण कुलकर्णी यांनी स्वत: आंदोलकांशी संवाद साधून बैठक निश्चित झाल्याचे पत्र दिल्याने एसएफआयने आंदोलन स्थगित केले. या आंदोलनात सुरगाण्याच्या पंचायत समिती सभापती सुवर्णा गांगुडे, सुनील मालुसरे यांच्यासह एसएफआयचे दत्ता चव्हाण, मंजुश्री कबाडे, सोमनाथ निर्मळ, रोहिदास जाधव, कविता वरे, अनिल मिसाळ, विलास साबळे, राजू शेळके, नवनाथ मोरे, उत्तम गावित, विलास भुयाळ, हरिष धोंगडे, अजय टोपले, सचिन खडके आदी पदाधिकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.गोल्फ क्लबपासून आयुक्तालयापर्यंत मोर्चाएसएफआयच्या आंदोलकांनी गोल्फ क्लब मैदानाजवळ एकत्र येऊन आदिवासी आयुक्तालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सरकारच्या डीबीटी निर्णयाविरोधात तीव्र विरोध नोंदविला. सरकारने डीबीटीचा निर्णय घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असून, शासन वसतिगृहाच्या मूलभूत समस्यांपासून पळ काढीत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी विविध चित्रपटगीतांसह लोकगीते व क्रांतिगीतांच्या माध्यमातून सरकार विरोधात निषेध नोंदविला.

टॅग्स :Studentविद्यार्थीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना