शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सिडकोत डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:22 IST

एकीकडे सिडको परिसरात स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली असताना, दुसरीकडे मात्र सिडको भागातील बहुतांशाी खासगी भूखंड व मोकळ्या मैदानात तसेच रहिवासी भागात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसत असल्याने महापालिकेने याबाबतही गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

सिडको : एकीकडे सिडको परिसरात स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली असताना, दुसरीकडे मात्र सिडको भागातील बहुतांशाी खासगी भूखंड व मोकळ्या मैदानात तसेच रहिवासी भागात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसत असल्याने महापालिकेने याबाबतही गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.  एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता मनपाने सिडको भागात व्यापक स्वरूपात स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच मलेरिया विभागाच्या वतीने औषध व धूर फवारणी करण्याची गरज आहे. तुळजाभवानी चौकात एकाच भागात पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून, या घटनेनंतर मनपाने या भागात स्वच्छता तसेच धूर व औषध फवारणी केली असल्याने मनपाचे वरातीमागून घोडे अशीच गत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. यानंतर या भागात मनपाच्या आरोग्य विभागाच्या समितीनेही नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पाठोपाठच आता सपना थिएटर, मंगलमूर्ती परिसर, वृंदावन कॉलनी, खोडे मळा, गायत्रीनगर या परिसरातही डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ झाली असून, वाढलेल्या गाजरगवतामुळे परिसरात डासांचे प्रमाणही प्रचंड वाढले असल्याचे दिसून येत आहे. या भागातील खासगी भूखंडांसह मोकळ्या जागा, उद्यान व रस्त्याच्या साइडपट्ट्या भागात मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढले असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना डेंग्यूसदृश आजाराबरोबरच साथीच्या आजाराची लागण झाली आहे. मनपाने याबाबत तातडीने दखल घेत याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून मलेरिया विभागाच्या वतीने औषध व धूर फवारणी करणे गरजेचे आहे. धूर, औषध फवारणी नाही मनपाच्या वतीने धूर व औषध फवारणीसाठी मक्तेदारास लाखो रुपयांचा ठेका दिला जात असला, तरी या ठेकेदाराकडून याबाबत व्यवस्थित औषध व धूर फवारणी केली जाते का याबाबत कोणाचाही अंकुश नसून सदर ठेका हा सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीकडे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मक्तेदारही कोणास जुमानत नसल्याचे दिसून येत असले, तरी केवळ धूर व औषध फवारणी करीत असल्याच्या दिखाव्यामुळे मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने मनपाने याबाबत गांभीयाने दखल घेण्याची गरज आहे.