शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शिरसगाव लौकी बाजारात उष्णतेमुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:16 IST

मानोरी : यंदा शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच वैफल्यग्रस्त असताना मागील पाच ते सहा दिवसापासून उष्णतेचा पारा येवला तालुक्यात ३८ ते ४० अंश पर्यंत पोहचल्याने ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्यास सुरु वात झाली आहे.

ठळक मुद्देउष्णता कमालीची वाढल्याने बाजारपेठेत काहीसे आर्थिक व्यवहार मंदावले आहे.

मानोरी : यंदा शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच वैफल्यग्रस्त असताना मागील पाच ते सहा दिवसापासून उष्णतेचा पारा येवला तालुक्यात ३८ ते ४० अंश पर्यंत पोहचल्याने ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्यास सुरु वात झाली आहे.तालुक्यातील पश्चिम भागातील शिरसगांव लौकी येथे भरणारा सकाळच्या सत्रात भरणारा नियमीत आठवडे बाजारात उष्णतेच्या दाहकतेमुळे परिसरातील नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. व्यापारी ग्राहकांच्या प्रतिक्षेत होते.शिरगाव लौकी येथील बाजारात अनेक छोटे मोठे व्यापारी आपली दुकाने थाटून बसलेले असतात. यात भाजीपाला विक्र ीसाठी देखील अनेक व्यापारी आलेले असतात यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरीवर्गाकडून भाजीपाल्याचे पीक न घेतल्याने महागड्या दराने सर्वसामान्य शेतकरी वर्गाला भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.मागील चार ते पाच दिवसापासून वाढत्या तापमानामुळे व्यापाऱ्यांवर देखील काहीसे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. उष्णतेचा कहर झाला असून उन्हात मिनिटभर उभे राहणे देखिल कठीण झाले आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून या गावात उत्तम प्रकारे आठवडे बाजार भरतो. आणि व्यावसायिक ही चांगल्या प्रकारे आपला माल बाजारात विक्र ीस आणतात. परंतु दुष्काळ आणि वाढती उष्णता त्यात शेतकरी व मजुरांवर परिणाम होत असून ग्राहकांच्या गैर हजेरीत आठवडे बाजारात शुकशुकाट असल्याचे मिळत आहे.वळदगाव, जऊळके, पिंपळगाव लेप, शिरसगांव लौकी, शेळकेवाडी, सोमठाणदेश आदी गावातील ग्राहकांना हा आठवडे बाजार तीन-चार किलोमीटर असुन दिवसेंदिवस उष्णता कमालीची वाढल्याने शिरसगाव लौकीच्या बाजारपेठेत काहीसे आर्थिक व्यवहार मंदावले आहे.(फोटो ०२ मानोरी बाजार) : उष्णता वाढल्याने शिरसगाव लौकी बाजारात ओस पडलेली दुकाने.