शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

श्रीहरी प्रतिष्ठानतर्फे महिलांचा गौरव नामपूर : प्रभातफेरीसह बेटी बचावचा संदेश देणाºया नाटिकेने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:07 IST

सटाणा : नामपूर येथील श्रीहरी प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील तेरा कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्टÑातील महिलावर्गाने पुढाकार घेण्याची गरज भ्रूणहत्या व नकोशी मुलींच्या वाढत्या प्रमाणाबद्दलही चिंता

सटाणा : नामपूर येथील श्रीहरी प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील तेरा कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी महिलांच्या सन्मानाचे उत्सवी उपचाराचे सोहळे साजरे न करता एकूणच स्त्रीचे अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मान जपण्याचे व तो अधिकाधिक वृद्धिंगत कसा होईल याची काळजी समाजाने वाहण्याची गरज प्रतिपादीत केली. कृष्णाई मंगल कार्यालयात अग्रवाल, बागलाण पंचायत समितीच्या उपसभापती शीतल कोर, कृषिरत्न पुरस्कारप्राप्त निलेश चव्हाण व प्रतिष्ठानच्या अध्यक्ष स्नेहलता नेरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी बोलताना अग्रवाल यांनी महाराष्टÑ ही राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या धुरिणींची भूमी आहे. त्यांचा समर्थ वारसा पुढे नेण्यासाठी महाराष्टÑातील महिलावर्गाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून समाजातील वाढत्या भ्रूणहत्या व नकोशी मुलींच्या वाढत्या प्रमाणाबद्दलही अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, महिला दिनाचे औचित्य साधून लोकमत सखी मंचच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्र माचे आयोजन केले होते.या स्पर्धेत नामपूरच्या होम मिनिस्टरचा मान यामिनी सावंत यांनी पटकावला. त्यांना अग्रवाल यांच्या हस्ते पैठणी साडीची भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्रीहरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शरद नेरकर,पूनम कोकणे , पूनम सोनवणे , नामपूरच्या उपसरपंच मंगला सावंत , संतोष सावंत, पांडुरंग सावळा, प्रकाश अहिरे , पूनम खरोटे ,सुनिता पाटील, समीना बोहरी, मयुरी शिरापुरे , सीमा बधान ,आशादेवी वाघ, पुष्पा मुथा, सोनाली निकम ,दिपाली चव्हाण ,मालती अग्नीहोत्री ,करुणा अलई ,प्रियंका अलई, योगिता सोनवणे यांच्यासह हजार ते अकराशे महिला उपस्थित होत्या.तेरा महिलांचा झाला सन्मान...सुनिता पाटील (स्मशानभूमी सेविका नाशिक), पूनम राऊत (पोलीस निरीक्षक दामिनी पथक), पार्वताबाई शंकर येवले (जीवन गौरव पुरस्कार नाशिक),अलींनी दीदी ,प्रजापिता ब्रम्हकुमारी ; चंद्रभागा धोंडीराम भोई (कृतीशील सरपंच, तळेगाव दिंडोरी), प्रियंका अभिजित बागड (अध्यक्ष रोटरी क्लब सटाणा), मनीषा राहुल खरे (अंगणवाडी सेविका, खमताणे), सुनंदा बाजीराव भामरे (माध्यमिक शिक्षिका, नामपूर), अलका किसनसिंग परदेशी (सेवाभावी अध्यापिका,नाशिक), लता बळीराम महाले (सेवाभावी मुख्याध्यापिका, नामपूर) कविता बळवंत सावंत (सरपंच ,नामपूर), इंदुबाई चिला अहिरे (कृतीशील कृषीकन्या टेंभे) मंगल भिका शिरोळे (लिपिक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, नामपूर)भावस्पर्शी नाटकब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या महिलांनी ‘स्रीभ्रुण हत्या’ या विषयावर सादर केलेल्या नाटिकेला उपस्थिांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी तळेगाव विद्यालयाच्या बाल सावित्री पायल चौधरी ,वैष्णवी चौधरी, धनश्री ढाकणे या विद्यार्थीनींनी ‘महिला अबला की सबला?’ या विषयावर व्यक्त केलेल्या मनोगताला उत्स्फूर्त दाद मिळाली.