शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीहरी प्रतिष्ठानतर्फे महिलांचा गौरव नामपूर : प्रभातफेरीसह बेटी बचावचा संदेश देणाºया नाटिकेने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:07 IST

सटाणा : नामपूर येथील श्रीहरी प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील तेरा कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्टÑातील महिलावर्गाने पुढाकार घेण्याची गरज भ्रूणहत्या व नकोशी मुलींच्या वाढत्या प्रमाणाबद्दलही चिंता

सटाणा : नामपूर येथील श्रीहरी प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील तेरा कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी महिलांच्या सन्मानाचे उत्सवी उपचाराचे सोहळे साजरे न करता एकूणच स्त्रीचे अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मान जपण्याचे व तो अधिकाधिक वृद्धिंगत कसा होईल याची काळजी समाजाने वाहण्याची गरज प्रतिपादीत केली. कृष्णाई मंगल कार्यालयात अग्रवाल, बागलाण पंचायत समितीच्या उपसभापती शीतल कोर, कृषिरत्न पुरस्कारप्राप्त निलेश चव्हाण व प्रतिष्ठानच्या अध्यक्ष स्नेहलता नेरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी बोलताना अग्रवाल यांनी महाराष्टÑ ही राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या धुरिणींची भूमी आहे. त्यांचा समर्थ वारसा पुढे नेण्यासाठी महाराष्टÑातील महिलावर्गाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून समाजातील वाढत्या भ्रूणहत्या व नकोशी मुलींच्या वाढत्या प्रमाणाबद्दलही अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, महिला दिनाचे औचित्य साधून लोकमत सखी मंचच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्र माचे आयोजन केले होते.या स्पर्धेत नामपूरच्या होम मिनिस्टरचा मान यामिनी सावंत यांनी पटकावला. त्यांना अग्रवाल यांच्या हस्ते पैठणी साडीची भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्रीहरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शरद नेरकर,पूनम कोकणे , पूनम सोनवणे , नामपूरच्या उपसरपंच मंगला सावंत , संतोष सावंत, पांडुरंग सावळा, प्रकाश अहिरे , पूनम खरोटे ,सुनिता पाटील, समीना बोहरी, मयुरी शिरापुरे , सीमा बधान ,आशादेवी वाघ, पुष्पा मुथा, सोनाली निकम ,दिपाली चव्हाण ,मालती अग्नीहोत्री ,करुणा अलई ,प्रियंका अलई, योगिता सोनवणे यांच्यासह हजार ते अकराशे महिला उपस्थित होत्या.तेरा महिलांचा झाला सन्मान...सुनिता पाटील (स्मशानभूमी सेविका नाशिक), पूनम राऊत (पोलीस निरीक्षक दामिनी पथक), पार्वताबाई शंकर येवले (जीवन गौरव पुरस्कार नाशिक),अलींनी दीदी ,प्रजापिता ब्रम्हकुमारी ; चंद्रभागा धोंडीराम भोई (कृतीशील सरपंच, तळेगाव दिंडोरी), प्रियंका अभिजित बागड (अध्यक्ष रोटरी क्लब सटाणा), मनीषा राहुल खरे (अंगणवाडी सेविका, खमताणे), सुनंदा बाजीराव भामरे (माध्यमिक शिक्षिका, नामपूर), अलका किसनसिंग परदेशी (सेवाभावी अध्यापिका,नाशिक), लता बळीराम महाले (सेवाभावी मुख्याध्यापिका, नामपूर) कविता बळवंत सावंत (सरपंच ,नामपूर), इंदुबाई चिला अहिरे (कृतीशील कृषीकन्या टेंभे) मंगल भिका शिरोळे (लिपिक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, नामपूर)भावस्पर्शी नाटकब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या महिलांनी ‘स्रीभ्रुण हत्या’ या विषयावर सादर केलेल्या नाटिकेला उपस्थिांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी तळेगाव विद्यालयाच्या बाल सावित्री पायल चौधरी ,वैष्णवी चौधरी, धनश्री ढाकणे या विद्यार्थीनींनी ‘महिला अबला की सबला?’ या विषयावर व्यक्त केलेल्या मनोगताला उत्स्फूर्त दाद मिळाली.