शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

युतीचा निर्णय सेनेने लवकर घ्यावा : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:46 IST

नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी, यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज यांना साकडे तर घातलेच आहे, शिवाय आदर्श आचारसंहिता लागू होण्यासाठी महिनाभरापेक्षा कमी कालावधी असल्याने जो काही निर्णय असेल तो तर लवकर झालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीच्या महापूजेसाठी ते आले असता यावेळी त्यांनी संवाद साधला.

नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी, यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज यांना साकडे तर घातलेच आहे, शिवाय आदर्श आचारसंहिता लागू होण्यासाठी महिनाभरापेक्षा कमी कालावधी असल्याने जो काही निर्णय असेल तो तर लवकर झालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीच्या महापूजेसाठी ते आले असता यावेळी त्यांनी संवाद साधला. युतीसाठी भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी केल्याच्या विषयावरून उलटसुलट दावे सुरू असून, त्याबाबत बोलताना महाजन यांनी दूरध्वनी केला किंवा नाही केला अशाप्रकारच्या अनेक अफवा निवडणुकीच्या काळात पसरत असतात. त्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. परंतु काही घडलेच तर ते प्रवक्ते त्वरित सांगतील, तूर्तास युतीबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे भाजपाने लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. मात्र जे भाजपाकडे लोकसभा मतदार संघ आहेत त्याविषयीच आढावा घेण्यात आल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. स्वामीनाथन आयोग असो किंवा अन्य विषय असो, त्यांच्या अनेक मागण्या कार्यवाहीत आहेत. लोकआयुक्त नेमण्याच्या दिल्लीतील कामकाज अंतिम टप्प्यात आहे. निवड समितीचा प्रश्नदेखील सोडविण्यात आला आहे. लोकायुक्त नियुक्तीचा विषय बाकी असला तरी पंधरा दिवसांत हेही काम पूर्ण होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे यासंदर्भातील पत्र घेऊन हजारे यांची पुन्हा भेट घेऊ, असेही महाजन म्हणाले. हजारे यांच्या आणि त्यांच्या टीमच्या संपर्कात आपण आहोत आणि चर्चाही करीत आहोत. हजारे यांच्या वयाला आणि तब्येतीला आंदोलन मानवणारे नाही, त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही महाजन यांनी केले.