शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

टंचाई आराखड्यात अल्प कपात

By admin | Updated: January 14, 2017 00:42 IST

टॅँकरच्या संख्येत घट : गावेही घटली

नाशिक : टंचाई कृती आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू करण्याची वेळ समीप आलेली असताना जिल्हा परिषदेने तयार केलेल्या कृती आराखड्यात बदल करण्यात आला असून, जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला शिल्लक पाणीसाठा व पाण्याची मागणी याचा ताळमेळ बसविताना टॅँकरच्या संख्येत घट होऊन खर्चातही कपात करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने डिसेंबर महिन्यात सादर केलेल्या टंचाई कृती आराखड्यात सुमारे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात येऊन जिल्ह्यात ४७१ गावे व ८३४ वाड्या अशी सुमारे १३०५ गावे, वाड्यांना यंदा भीषण पाणीटंचाई भासण्याची शक्यता व्यक्त करून त्यावर उपाययोजनांसाठी आराखडा तयार करण्यात आला. मुळात आॅक्टोबर ते डिसेंबर हा कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा असताना जिल्हा परिषदेने डिसेंबरअखेर आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविला. गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झाल्याने भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा पाण्याची मागणी घटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना प्रत्यक्षात जिल्हा परिषदेचा आराखडा अपेक्षेपेक्षा अधिक खर्चिक असल्याने त्याची खातरजमा करण्यात आली. त्यातील काही योजनांची गरज नसल्याचे तसेच गेल्या काही वर्षांत टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करण्यात आल्याने टंचाईची गावे घटली आहेत, शिवाय जलयुक्त शिवार योजनेमुळेही काही गावांमध्ये अजून तरी पाण्याची मागणी होण्याची चिन्हे नाहीत.(प्रतिनिधी)त्यामुळे या आराखड्यात कपात सूचविण्यात आली असून, नवीन आराखड्यानुसार २३८ गावे, ६२३ वाड्यांना पाणीटंचाई भासेल व त्यासाठी १२८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)