शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

टंचाई आराखड्यात अल्प कपात

By admin | Updated: January 14, 2017 00:42 IST

टॅँकरच्या संख्येत घट : गावेही घटली

नाशिक : टंचाई कृती आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू करण्याची वेळ समीप आलेली असताना जिल्हा परिषदेने तयार केलेल्या कृती आराखड्यात बदल करण्यात आला असून, जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला शिल्लक पाणीसाठा व पाण्याची मागणी याचा ताळमेळ बसविताना टॅँकरच्या संख्येत घट होऊन खर्चातही कपात करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने डिसेंबर महिन्यात सादर केलेल्या टंचाई कृती आराखड्यात सुमारे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात येऊन जिल्ह्यात ४७१ गावे व ८३४ वाड्या अशी सुमारे १३०५ गावे, वाड्यांना यंदा भीषण पाणीटंचाई भासण्याची शक्यता व्यक्त करून त्यावर उपाययोजनांसाठी आराखडा तयार करण्यात आला. मुळात आॅक्टोबर ते डिसेंबर हा कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा असताना जिल्हा परिषदेने डिसेंबरअखेर आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविला. गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झाल्याने भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा पाण्याची मागणी घटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना प्रत्यक्षात जिल्हा परिषदेचा आराखडा अपेक्षेपेक्षा अधिक खर्चिक असल्याने त्याची खातरजमा करण्यात आली. त्यातील काही योजनांची गरज नसल्याचे तसेच गेल्या काही वर्षांत टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करण्यात आल्याने टंचाईची गावे घटली आहेत, शिवाय जलयुक्त शिवार योजनेमुळेही काही गावांमध्ये अजून तरी पाण्याची मागणी होण्याची चिन्हे नाहीत.(प्रतिनिधी)त्यामुळे या आराखड्यात कपात सूचविण्यात आली असून, नवीन आराखड्यानुसार २३८ गावे, ६२३ वाड्यांना पाणीटंचाई भासेल व त्यासाठी १२८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)