शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मुंबई रिटर्नचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:03 IST

निफाड तालुक्यात सलग चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न असल्याने निफाडकर धास्तावले आहेत. त्यामुळे निफाडच्या सीमेवर आणि गावातील गल्लोगल्ली मुंबईहून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाऊ लागली आहे.

ठळक मुद्देनिफाडकरांची वाढली चिंता; तालुक्यातील रुग्णसंख्या १५ वर

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न असल्याने निफाडकर धास्तावले आहेत. त्यामुळे निफाडच्या सीमेवर आणि गावातील गल्लोगल्ली मुंबईहून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाऊ लागली आहे.कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. तरीही तालुक्यात आजमितीस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या चार दिवसांत ओझर, विष्णुनगर, उगाव, सुकेणे येथे आढळून आलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईवरून आले असल्याने निफाडकरांनी या मुंबईकरांचा चांगलाच धसका घेतलाआहे.नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा निफाड तालुक्यातील लासलगाव येथे आढळून आला होता.त्यानंतर मात्र त्याच्या संपर्कातील सर्वच रु ग्ण निगेटिव्ह आल्याने मोठी काळजी मिटली होती.त्यानंतर आढळून आलेलेपॉझिटिव्ह रुग्ण लासलगाव परिसरातच वेगवेगळ्या गावांमध्ये निघाले.तालुक्यातील दुसºया भागात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हते. त्यामुळे प्रशासनास काम करताना अगदी सोपे जात होते तसेच नागरिकही काळजीत नव्हते; मात्र चार दिवसांपूर्वी ओझर येथे आढळून आलेला रुग्ण, दुसºया दिवशी सुकेणे येथे आढळून आलेला रुग्ण हे दोघे मुंबई येथे बँकेत कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले.सदर रुग्ण घरी आल्यानंतर आजारी पडला. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचे मुंबई कनेक्शन उघड झाले. त्यानंतरउगाव येथे आढळून आलेला पॉझिटिव्ह रुग्णही मुंबईवरूनआला आहे, तर विष्णुनगर येथे आढळून आलेला रुग्णाचेसुद्धामुंबई कनेक्शन आहे. त्यामुळेनिफाड तालुक्यात मुंबईवरून आणखी किती नागरिक निफाड तालुक्यात आले आहेत, यावर प्रशासनातही खल सुरू झालाआहे.मुंबईहून येणाऱ्यांना रोखानिफाड तालुक्यातील अनेक लोक वेगवेगळ्या कामांसाठी मुंबईत स्थायिक झाले आहेत. मात्र मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक लोक खेड्याकडे येत आहेत. येताना मात्र योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली जात नसल्यामुळे ते इकडे आल्यानंतर आजारी पडतात आणि पर्यायाने त्यांना कोरोना रोगाची लागण झालेली दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईहून येणाºयांना रोखावे अथवा त्यांची तातडीने तपासणी करुन त्यांना क्वॉरण्टाइन करावे, अशी मागणी होत आहे. सदर लोकांना मुंबईवरून कसे सोडले जाते, त्यांना सोडताना त्यांची योग्य चाचणी केली जाते किंवा नाही, ्रअशी शंका तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या