शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

मुंबई रिटर्नचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:03 IST

निफाड तालुक्यात सलग चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न असल्याने निफाडकर धास्तावले आहेत. त्यामुळे निफाडच्या सीमेवर आणि गावातील गल्लोगल्ली मुंबईहून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाऊ लागली आहे.

ठळक मुद्देनिफाडकरांची वाढली चिंता; तालुक्यातील रुग्णसंख्या १५ वर

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न असल्याने निफाडकर धास्तावले आहेत. त्यामुळे निफाडच्या सीमेवर आणि गावातील गल्लोगल्ली मुंबईहून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाऊ लागली आहे.कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. तरीही तालुक्यात आजमितीस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या चार दिवसांत ओझर, विष्णुनगर, उगाव, सुकेणे येथे आढळून आलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईवरून आले असल्याने निफाडकरांनी या मुंबईकरांचा चांगलाच धसका घेतलाआहे.नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा निफाड तालुक्यातील लासलगाव येथे आढळून आला होता.त्यानंतर मात्र त्याच्या संपर्कातील सर्वच रु ग्ण निगेटिव्ह आल्याने मोठी काळजी मिटली होती.त्यानंतर आढळून आलेलेपॉझिटिव्ह रुग्ण लासलगाव परिसरातच वेगवेगळ्या गावांमध्ये निघाले.तालुक्यातील दुसºया भागात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हते. त्यामुळे प्रशासनास काम करताना अगदी सोपे जात होते तसेच नागरिकही काळजीत नव्हते; मात्र चार दिवसांपूर्वी ओझर येथे आढळून आलेला रुग्ण, दुसºया दिवशी सुकेणे येथे आढळून आलेला रुग्ण हे दोघे मुंबई येथे बँकेत कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले.सदर रुग्ण घरी आल्यानंतर आजारी पडला. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचे मुंबई कनेक्शन उघड झाले. त्यानंतरउगाव येथे आढळून आलेला पॉझिटिव्ह रुग्णही मुंबईवरूनआला आहे, तर विष्णुनगर येथे आढळून आलेला रुग्णाचेसुद्धामुंबई कनेक्शन आहे. त्यामुळेनिफाड तालुक्यात मुंबईवरून आणखी किती नागरिक निफाड तालुक्यात आले आहेत, यावर प्रशासनातही खल सुरू झालाआहे.मुंबईहून येणाऱ्यांना रोखानिफाड तालुक्यातील अनेक लोक वेगवेगळ्या कामांसाठी मुंबईत स्थायिक झाले आहेत. मात्र मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक लोक खेड्याकडे येत आहेत. येताना मात्र योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली जात नसल्यामुळे ते इकडे आल्यानंतर आजारी पडतात आणि पर्यायाने त्यांना कोरोना रोगाची लागण झालेली दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईहून येणाºयांना रोखावे अथवा त्यांची तातडीने तपासणी करुन त्यांना क्वॉरण्टाइन करावे, अशी मागणी होत आहे. सदर लोकांना मुंबईवरून कसे सोडले जाते, त्यांना सोडताना त्यांची योग्य चाचणी केली जाते किंवा नाही, ्रअशी शंका तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या