शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

बोगस कांदा बियाण्यांमुळे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:43 IST

पाळे खुर्द : कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील आसोली येथे उघडकीस आला आहे. अस्मानी संकटावर मात करत हात उसनवारी करत न्हाळी कांद्याची लागवड केली, परंतु बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समितीतील कृषी विभागाकडे तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे पाळे खुर्द : शेतकऱ्याचे १२ लाखांचे नुकसान, कृषी विभागाकडे तक्रार

कळवण तालुक्यातील आसोली येथील शेतकरी भीमराव वामन देवरे यांनी २१ सप्टेंबर २०२० रोजी उन्हाळी कांदा बियाणे खरेदी केले. दोन एकरमध्ये लागवड केलेल्या कांदे ८० टक्के टोंगळे व डिरले, पोकळ निघाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धुळे येथील एका बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रातून घेतलेल्या कांदा बियाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी देवरे आर्थिक संकट सापडले आहेत. संपूर्ण उन्हाळी हंगाम वाया जाणार आहे. त्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्नच शून्य होणार आहे. त्यामुळे आगामी वर्षाचे त्यांचे उपजीविकेचे साधनच हिरावले गेले आहे. बियाणे खरेदी व शेती मशागतीसाठी नातेवाइकांकडून घेतलेले हात उसनवारीचे पैसे कसे फेडायचे, ही विवंचना त्यांना सतावत आहे. तसेच कळवण येथील एका केंद्रातून काही शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले होते. मात्र लागवड केल्यानंतर ६० ते ७० दिवसानंतर कांद्याच्या पातीला टोंगळे, डिरले निघाल्याने जमिनीत कांदाच तयार झाला नाही. त्यामुळे उत्पन्न निघणार नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी विभागाने तत्काळ पंचनामा करून शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावा व बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. याबाबत तहसीलदार बी. ए. कापसे, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी राहुल आहेर यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.माझ्या शेतात २ दोन एकर बियाण्याची कांदा लागवड केली आहे. मात्र ६० दिवसानंतर कांद्याला टोंगळे व डीरले निघाल्याने माझे पूर्णतः कांदा पीक वाया गेले आहे. उत्पन्न दोन एकरमध्ये १२ ट्रॅक्टर निघाले असते. चारशे क्विंटल कांद्याचे उत्पन्न झाले असते. शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.- भीमराव देवरे, शेतकरी, आसोलीअधिकाऱ्यांकडून दुर्लक्षदरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक पिकांचे बोगस बियाणे बाजारात विक्रीसाठी येत असतात. याबाबत शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर बोगस बियाणे निघाल्याचे कळताच कृषी विभागाकडे तक्रार केली जाते; मात्र या तक्रारीची कोणतीच दखल न घेता कृषी दुकानदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार होतो. म्हणून वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन संबंधित कृषी बियाणे विक्री केंद्रांवर व दोषी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.शेतकऱ्याची तक्रार आली आहे. लवकरच कांदा बियाणे संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, बियाणे कंपनीचे मालक, विक्रेता, तालुका कृषी अधिकारी अशी टीम जाऊन पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.- राहुल आहेर, कृषी अधिकारी, पंचायत समिती

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती