शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिवसेनेचे भाऊ, दादा, नाना, अण्णा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:03 IST

नाशिक : शिवसेनेचे दुसºया क्रमांकाचे नेते म्हणून राज्याभिषेक झालेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणामुळे राज्यातील शिवसैनिकांबरोबरच नाशिकमधील अनेक भाऊ, भाई, दादा, नाना, आप्पांसह तमाम टोपणनाव परिचित नेत्यांचा रसभंग झाला आहे. यापुढे होर्डिंग्जवर अशा प्रकारची नावे लिहू नयेत, अशी तंबीच युवराजांनी दिली असल्याने खरी नावे लिहिण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.

ठळक मुद्देयुवराजांचे फर्मान यापुढे होर्डिंग्जवर खरे नाव टाकावे लागणार

 

 

नाशिक : शिवसेनेचे दुसºया क्रमांकाचे नेते म्हणून राज्याभिषेक झालेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणामुळे राज्यातील शिवसैनिकांबरोबरच नाशिकमधील अनेक भाऊ, भाई, दादा, नाना, आप्पांसह तमाम टोपणनाव परिचित नेत्यांचा रसभंग झाला आहे. यापुढे होर्डिंग्जवर अशा प्रकारची नावे लिहू नयेत, अशी तंबीच युवराजांनी दिली असल्याने खरी नावे लिहिण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.राजकारणात मोठे होणारे आणि होऊ इच्छिणारे नेते, कार्यकर्त्यांमध्ये भाई, दादा, नाना, आप्पा, अण्णा, काका, मामा अशा प्रकारच्या विशेष नामाने प्रसिद्ध होण्यासाठी चढाओढ असते. सर्वच पक्षांमध्ये अशाप्रकारचे नाव असलेले कथित मोठे नेते बघून छोट्या कार्यकर्त्यांमध्येदेखील स्पर्धा वाढते. अशा नावानेच लोकांनी आपल्याला हाका माराव्या किंवा परिचित व्हावे, यासाठी कार्यकर्ते संबंधित नेत्याला त्या नावाने संबोधित करतातच शिवाय ही उपाख्य नामे प्रसिद्ध व्हावीत यासाठी होर्डिंग्जचा आधार घेतला जातो. असेच होणार का?युवराज आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर तूर्तास अशा प्रकारची नावे वापरणाºयांची अडचण झाली असली तरी त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील नेत्यांना समांतर संघटना रद्द करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतरही नाशिकमध्ये असलेल्या समांतर सेना कायम राहिल्या होत्या. संबंधित नेते अन्य पक्षांत गेले तरी सेना या नावानेच या संघटना परिचित आहेत. त्यामुळे टोपणनावांच्या मनाई आदेशाचे असेच होणार काय, असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांत चर्चिला जात आहे.