शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

लोकसहभागातून शिरपूर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 17:47 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील आदर्शगाव म्हणून नोंद झालेले किकवारी खुर्द कमी पर्जन्यमानमुळे गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील आदर्शगाव म्हणून नोंद झालेले किकवारी खुर्द कमी पर्जन्यमानमुळे गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी वाहून जाणारे पाणी अडवणे आवश्यक आहे,यासाठी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजविले मात्र गावकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर वेळ न दवडता किकवारीकरांनी लोकसहभागातून पावसाळ्यापूर्वीच हत्ती नदीपात्र, ब्राम्हणदरा , वाघदर नाल्याचे तब्बल दीड किलोमीटर खोलीकरण करून पुनर्जीवन केले. या शिरपूर पॅटर्नमुळे पावसाचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवला जाणार आहे. परिणामी, भविष्यात किकवारी खुर्द परिसरातील सहा किलोमीटर परिसरातील आठ ते नऊशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने या एकजुटीमुळे किकवारीकरांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.आदर्शगाव किकवारी खुर्द परिसर म्हणजे एकेकाळी पावसाचे आगर होते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठला. नदी,नाले,धरणे कोरडी पडली. शेती हाच मुख्य व्यवसाय असल्यामुळे पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात सापडला. दुष्काळ निवारणासाठी शासन उपयोजना करेल, बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शासन काहीतरी ठोस पाऊले उचलून जलसंधारणेची कामे करेल अशी आशा किकवारीकरांना होती. मात्र पदरी निराशाच पडल्यानंतर शासनाच्या निधीची व मदतीची अपेक्षा न करता लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून गाव पुढे सरसावले. आदर्श ग्रामचे शिल्पकार केदा बापू काकुळते यांनी ग्रामसभा घेऊन आपली भूमिका मांडली व सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी जमा केली. गावाला लाभलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या हत्ती नदीवर जेसीबीने खोलीकरण करून नदीचे पुनर्जीवन केले. तसेच गावाच्या उत्तरेस असलेल्या ब्राम्हणदर, वाघदर या नाल्याचे खोलीकरण करून ठिकठिकाणी बांध घातले. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब अडवून भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी