शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

लोकसहभागातून शिरपूर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 17:47 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील आदर्शगाव म्हणून नोंद झालेले किकवारी खुर्द कमी पर्जन्यमानमुळे गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील आदर्शगाव म्हणून नोंद झालेले किकवारी खुर्द कमी पर्जन्यमानमुळे गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी वाहून जाणारे पाणी अडवणे आवश्यक आहे,यासाठी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजविले मात्र गावकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर वेळ न दवडता किकवारीकरांनी लोकसहभागातून पावसाळ्यापूर्वीच हत्ती नदीपात्र, ब्राम्हणदरा , वाघदर नाल्याचे तब्बल दीड किलोमीटर खोलीकरण करून पुनर्जीवन केले. या शिरपूर पॅटर्नमुळे पावसाचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवला जाणार आहे. परिणामी, भविष्यात किकवारी खुर्द परिसरातील सहा किलोमीटर परिसरातील आठ ते नऊशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने या एकजुटीमुळे किकवारीकरांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.आदर्शगाव किकवारी खुर्द परिसर म्हणजे एकेकाळी पावसाचे आगर होते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठला. नदी,नाले,धरणे कोरडी पडली. शेती हाच मुख्य व्यवसाय असल्यामुळे पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात सापडला. दुष्काळ निवारणासाठी शासन उपयोजना करेल, बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शासन काहीतरी ठोस पाऊले उचलून जलसंधारणेची कामे करेल अशी आशा किकवारीकरांना होती. मात्र पदरी निराशाच पडल्यानंतर शासनाच्या निधीची व मदतीची अपेक्षा न करता लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून गाव पुढे सरसावले. आदर्श ग्रामचे शिल्पकार केदा बापू काकुळते यांनी ग्रामसभा घेऊन आपली भूमिका मांडली व सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी जमा केली. गावाला लाभलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या हत्ती नदीवर जेसीबीने खोलीकरण करून नदीचे पुनर्जीवन केले. तसेच गावाच्या उत्तरेस असलेल्या ब्राम्हणदर, वाघदर या नाल्याचे खोलीकरण करून ठिकठिकाणी बांध घातले. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब अडवून भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी