शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

शिर्डी-साक्र ी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:02 IST

सटाणा : येथून जाणार्या शिर्डी-साक्र ी महामार्गावरील खड्ड्यांमुळे मार्गाची चाळण झाली असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमध्ये वाहने पडून अनेक वाहने नादुरु स्त झाली आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर कित्येक वाहनधारकांना जायबंदी व्हावे लागले आहे. संबंधित विभागाकडून या महामार्गावरील खड्ड्यांची कुठलीही दुरु स्ती होत नसल्याने वाहनधारकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देखड्ड्यांमुळे चाळण : अपघातांचे प्रमाण वाढले; वाहनचालकांची कसरत

सटाणा : येथून जाणार्या शिर्डी-साक्र ी महामार्गावरील खड्ड्यांमुळे मार्गाची चाळण झाली असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमध्ये वाहने पडून अनेक वाहने नादुरु स्त झाली आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर कित्येक वाहनधारकांना जायबंदी व्हावे लागले आहे. संबंधित विभागाकडून या महामार्गावरील खड्ड्यांची कुठलीही दुरु स्ती होत नसल्याने वाहनधारकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.ढोलबारे फाटा ते द्वारकाधिश हॉटेल येथील काही ठिकाणी महामार्गावरील रस्ता गायब झालेला दिसतो. महामार्गावर मोठ-मोठी खड्डे पडले असल्यामुळे रोज अपघातांना आमंत्रण मिळत आहे. अनेक ठिकाणी खड्डे तीन ते चार फूट तर तर काही ठिकाणी पाच ते सात फूट रु ंदीचे मोठमोठे खड्डे पडले असून महामार्गावरील या पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.या महामार्गावरून प्रवास करताना भावडबारी, डांग्या मारु ती, पिर साहेब , औंदाणे गाव, तरसाळी फाटा, वनोली, वीरगाव, करंजाड लागते. त्या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहने खड्ड्यात आदळत आहेत. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघातही घडत आहेत.अनेकांना पाठदुखीच्या आजारांनी घेरलेमहामार्गावरील खड्ड्यांमुळे शेतकर्यांना पिकवलेला शेतमाल तालुक्यात असलेल्या बाजार समितीत नेताना खड्ड्यांमुळे विलंब होतो. त्यामुळे शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना पाठदुखीच्या आजारांनी घेरले आहे. विंचुर प्रकाशा हा महामार्ग गुजरातला जाण्यासाठी व नाशिक, धुळे, मालेगाव, सिन्नर, मनमाड येथे जाण्यासाठी जवळचा व सोयीचा आहे. त्यामुले वर्दळ असते. तसेच या भागातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना लागणारा कच्चा मालही याच महामार्गावरु न नेला जात असल्याने खड्ड्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडत आहे.अनेक वेळा निवेदन दिले असुन, महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपणही केले होते. संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. संबंधित विभागाने आठ दिवसांच्या आत महामार्गावरील खड्डे व बुजविल्यास कोणतीही सूचना न देता रास्ता रोको करण्यात येईल.हा महामार्ग खड्ड्यामुळे मृत्युचा सापळा बनला असून, महामार्गाची पूर्णत: चाळण झाली आहे.रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता तेही समजत नाही. मार्गक्र म करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यात आदळत असुन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.लवकरात लवकर खड्डे बुजवून होणार्या त्रासापासून सुटका करावी.- प्रभाकर रौंदळ, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीमहामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे पिकविलेला माल तालुक्यात तसेच इतर बाजार समतिीत विक्र ीसाठी नेण्यास विलंब होतो. त्यामुळे मोठ्या कष्टाने पिकविलेला माल बाजारपेठेत कवडीमोल भावात विकावा लागत आहे.तसेच या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना पाठदुखीच्या आजाराने ग्रासले असुन,अनेक वाहणे रात्रीच्या वेळेस खड्ड्यात पडुन अपघात घडुन वाहनधारक जायबंदी होत आहेत.- दीपक रौंदळ, शेतकरी(फोटो : 12सटाणा1,2,3)

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स