शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

शिरवाडे वाकद : महिलांची पाण्यासाठी भटकंती; पाणीटंचाईने नागरिक त्रस्त पाणीपुरवठा योजना अपूर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:01 IST

देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्वेला येवला आणि कोपरगाव तालुक्याच्या सीमेलगत शिरवाडे वाकद गाव असून, या गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देयोजना अपूर्णावस्थेत असल्यामुळे पाणीटंचाई तब्बल २२ लाख रुपयांची पाणी योजना अंमलात

देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्वेला येवला आणि कोपरगाव तालुक्याच्या सीमेलगत शिरवाडे वाकद गाव असून, या गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विविध योजना अपूर्णावस्थेत असल्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. शिरवाडे वाकद येथे मंजूर ्रअसलेली भारत निर्माण पाणीपुरवठा योजना तब्बल नऊ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. ती केव्हा पूर्ण होईल याची खात्री नाही. त्यातच एकमेव कूपनलिकेचा वीजपुरवठा थकीत वीजबिलाअभावी तोडण्यात आला आहे. गावठाणातील सर्वच हातपंपांना क्षारयुक्त पाणी आहे. त्यामुळे गोई नदीने वळसा घातलेल्या या गावाला वर्षभर पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना मूत्रविकाराचे आजार जडल्याचे चित्र आहे. शिरवाडे ग्रामपंचायतीच्या गावठाणात पाण्याचे जे स्रोत आहेत ते अत्यंत खराब असून, त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. सुमारे १३-१४ वर्षांपूर्वी गावात स्व-जलधारा योजनेतून दोन लाख ८५ हजार रुपयांचा निधी खर्च करून विहीर खोदण्यात आली. विहिरीला पाणीही मुबलक लागले; परंतु आजतागायत विहीर ते जलकुंभापर्यंत पाइपलाइन काही झाली नाही. त्यामुळे ही विहीर ‘असून अडचण, नसून खोळंबा’ ठरत असतानाच सन २००९ मध्ये भारत निर्माण योजनेंतर्गत तब्बल २२ लाख रुपयांची पाणी योजना अंमलात आली. ही योजना वर्षभरात पूर्ण न झाल्यास तब्बल २२ लाखांचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण गावाची पिण्याच्या पाण्याची मदार येथील प्रभावतीनगर या आदिवासी वस्तीतील एकमेव हातपंपावर आहे. या हातपंपाला पाणी टिकून राहावे म्हणून गोदावरी कालव्याच्या आवर्तनातून बंधाºयात पाणी सोडावे लागते; मात्र यावेळेस आवर्तन मिळाले नाही. त्यामुळे या हातपंपावर जो प्रथम येईल त्यालाच पाणी मिळत असल्याने पहाटेपासूनच महिलांची गर्दी होत असते. त्यामुळे बहुतांश नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. स्मशानभूमीजवळ बोअरवेल घेतली असून, या बोअरवेलचे पाणी हनुमान मंदिराजवळच्या जलकुंभात टाकले जाते; मात्र तेही पाणी खराब असल्याने या पाण्याचा वापर केवळ घरगुती वापरासाठीच होतो. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसत असून, जनतेची तहान भागवण्यात प्रशासन असमर्थ ठरले आहे. येथील अपुºया पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करावे ही येथील जनतेची जुनी मागणी असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने शिरवाडेकरांच्या नशिबी पाण्यासाठी भटकंती आणखी किती दिवस सुरू राहणार? हा एक प्रश्नच आहे.