शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिमला मिरची, गिलके जनावरांच्या पुढ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:31 IST

भाजीपाल्याचा लिलाव कमी तसेच सगळीकडे मार्केटही बंद असल्याने शेतमाल मातीमोल दराात विकण्यापेक्षा अडीच एकर शेतातील काढणीस आलेले गिलके व शिमला मिरची थेट जनावरांना खाऊ घातल्याचा प्रकार नाशिक तालुक्यातील नागलवाडी येथे घडला.

ठळक मुद्देनागलवाडी : उत्पादन खर्च निघत नसल्याने नैराश्य

नाशिक : भाजीपाल्याचा लिलाव कमी तसेच सगळीकडे मार्केटही बंद असल्याने शेतमाल मातीमोल दराात विकण्यापेक्षा अडीच एकर शेतातील काढणीस आलेले गिलके व शिमला मिरची थेट जनावरांना खाऊ घातल्याचा प्रकार नाशिक तालुक्यातील नागलवाडी येथे घडला.कोरोनाचे नवे संकट समोर उभे ठाकल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्ग देखील अडचणीत सापडला आहे. संचारबंदी व लॉकडाउनचा फटका त्यांनाही सोसावा लागत आहे. नागलवाडी येथील तरुण शेतकरी राहुल वसंत भोर व सागर वसंत भोर यांनी जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात बागायती क्षेत्र अधिक असल्याने द्राक्ष, भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. यंदाही हवामान अनुकूल व भरपूर पाणी असल्याने उन्हाळी बागायती पिके जोमात आहेत. मात्र द्राक्षांसोबत भाजीपाला विकायचा कुठे? ग्राहक नाही, व्यापारी माल घेत नाहीत,परप्रांतातील व्यापारी प्रांतात निघून गेले तसेच बाजार समितीत मातीमोल बाजारभाव असल्याने भाजीपाला विकायचा कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत सागर व राहुल या भावंडांनी शेतातील गिलके, लाखोंचे खर्च करून उभारलेल्या शेडनेटमधील शिमला मिरचीचे खुडलेले पीक क्रेटमध्ये भरून थेट गावात मोफत दिले, तर काही शेतातील जनावरांना खायला दिले. रोज ४५ क्रेट गिलके जनावरांना घालण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नव्हता.दोन लाख रुपये खर्च करून गिलक्याची बाग उभी केली तसेच शिमला मिरचीच्या बागेसाठी एकरी तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. बाजारभाव चांगला मिळेल या आशेने बागेची व पिकांची काळजी घेतली. पीक हातात आले असतानाच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी घोषित झाली. त्यामुळे लिलावांवर परिणाम झाला आणि सगळीकडे मार्केटही बंद झाल्या. त्यामुळे मातीमोल भावात शेतमाल विकण्यापेक्षा पहिल्या खुडणीचे गिलके आणि शिमला मिरची जनावरांना खाऊ घातली. तसेच त्यातील काही नागरिकांना मोफत वाटले. कोरोनाच्या संकटात सामान्य लोकांची उपासमार होत असताना, लॉकडाउनमुळे मजूर मिळत नाही. भाजीपाला मातीमोल विकला जात आहे. शेतमालाची मागणीही रोडावली आहे. त्यात कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र