शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराचा ज्वर शिगेला!

By admin | Updated: October 11, 2014 22:00 IST

प्रचाराचा ज्वर शिगेला!

मतदान अवघ्या ७२ तासांवर आल्याने सर्वच पक्षीयांचा जाहीर प्रचार शिगेस पोहोचला आहे. विशेष म्हणजे, वैयक्तिक गाठीभेटी व संपर्काखेरीज यंदा जाहीर सभांचा धुरळा मोठ्या प्रमाणात उडाला. यात सर्वाधिक सभा भाजपा नेत्यांनी घेतल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात येऊ न शकलेल्या नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्यात सत्ता येणारच आहे, असे गृहीत धरून मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत धावणाऱ्या अनेकविध नेत्यांपर्यंत, अनेकांनी जिल्ह्यात सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. अर्थात, मोदींचे गुणगान व सत्तारुढांवरील टीका यावरच भाजपेयींचा भर होता. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही वणीसारख्या आदिवासी भागात सभा घेऊन आपल्या पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आदिंच्याही सभा ठिकठिकाणी झाल्या, पण त्यांचे विचारधन वेचून मतदान कुणाला करायचे याचा निर्णय घेता येण्याऐवजी संभ्रमच पडावा, अशी स्थिती आहे. याच्या- त्याच्यावर आरोप करण्याखेरीज कसले ‘व्हिजन’ म्हणून कुणीही काही सांगितल्याचे या प्रचारात आढळत नाही. शरद पवार यांनी मात्र आरोपांखेरीज काही शेतीविषयक प्रश्नांची चर्चा करीत जिल्हा पिंजल्याचे दिसून आले. पहिल्याच टप्प्यात मोदी येऊन गेल्याने त्यांचा येथील सभेत आवाज खणखणीत होता, परंतु उद्धव ठाकरे अंतिम पर्वात आल्याने त्यांची दमणूक झाल्याचे स्पष्टपणे जाणवणारे होते. मुद्दे तेच, पण जोश वा त्वेष गेलेला; अशी त्यांची अवस्था होती. स्थानिक पूररेषेसारख्या व ‘एलबीटी’च्या प्रश्नाला त्यांनी स्पर्श जरूर केला, परंतु भर होता तो भाजपाच्या समाचारावरच. ‘युती’ तुटल्याची बोच त्यांना किती सलते आहे हे उद्धवजींच्या बोलण्यातून पदोपदी प्रतीत होणारे होते. या सभेत सिन्नरचे उदय सांगळे यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. युवक कॉँग्रेस ते व्हाया राष्ट्रवादी, सेनेत आलेल्या सांगळेंमुळे सेनेला वंजारी समाजाचेही बळ लाभेल, परंतु तिकडे येवल्यात उद्धव ठाकरेंनी मैदान गाजवून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी भुजबळांसोबत जाण्याचा निर्णय घोषित करून सेनेला घरचा अहेर दिला. शिवसेनेला खरेच चांगले दिवस येऊ घातले असतील, तर अशी अवदसा कल्याणरावांना का आठवावी? प्रवाहाविरुद्धचे हे पोहणे जेव्हा घडून येते, तेव्हा घरातली आहे ती माणसे सांभाळली जात नसल्याचाच संकेत त्यातून जातो. निवडणुकीच्या काळात बेरजेचेच राजकारण करायचे असते. नांदगावात माजी आमदार पवार यांच्या बाबतीत ते जसे केले गेले, तसे येवल्यात झाले नाही. सर्वच पक्षीयांच्या सभांनंतर राज ठाकरे यांच्या सभा झाल्यात. जिल्ह्यातही काही उमेदवार उभे केले असताना त्यांनी प्राधान्य नाशकातील तीन जागांना दिले. यावरूनही खरेतर त्यांच्या पक्षाचा शहरी ‘आवाका’ लक्षात यावा. जिल्ह्यातील सर्वच सर्व जागांवर उमेदवार उभे असलेल्या ‘बसपा’च्या सर्वोच्च नेत्या बहन मायावती यांना नाशकातील शिखरेवाडीच्या मैदानावर सभा घ्यावी लागली, यावरून त्यांच्याही मर्यादा लक्षात याव्यात. एकूणच, या सर्व नेत्यांच्या प्रचारसभांनी माहौल मात्र टिपेस पोहोचल्याचे चित्र आहे.- किरण अग्रवाल