शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

प्रचाराचा ज्वर शिगेला!

By admin | Updated: October 11, 2014 22:00 IST

प्रचाराचा ज्वर शिगेला!

मतदान अवघ्या ७२ तासांवर आल्याने सर्वच पक्षीयांचा जाहीर प्रचार शिगेस पोहोचला आहे. विशेष म्हणजे, वैयक्तिक गाठीभेटी व संपर्काखेरीज यंदा जाहीर सभांचा धुरळा मोठ्या प्रमाणात उडाला. यात सर्वाधिक सभा भाजपा नेत्यांनी घेतल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात येऊ न शकलेल्या नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्यात सत्ता येणारच आहे, असे गृहीत धरून मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत धावणाऱ्या अनेकविध नेत्यांपर्यंत, अनेकांनी जिल्ह्यात सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. अर्थात, मोदींचे गुणगान व सत्तारुढांवरील टीका यावरच भाजपेयींचा भर होता. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही वणीसारख्या आदिवासी भागात सभा घेऊन आपल्या पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आदिंच्याही सभा ठिकठिकाणी झाल्या, पण त्यांचे विचारधन वेचून मतदान कुणाला करायचे याचा निर्णय घेता येण्याऐवजी संभ्रमच पडावा, अशी स्थिती आहे. याच्या- त्याच्यावर आरोप करण्याखेरीज कसले ‘व्हिजन’ म्हणून कुणीही काही सांगितल्याचे या प्रचारात आढळत नाही. शरद पवार यांनी मात्र आरोपांखेरीज काही शेतीविषयक प्रश्नांची चर्चा करीत जिल्हा पिंजल्याचे दिसून आले. पहिल्याच टप्प्यात मोदी येऊन गेल्याने त्यांचा येथील सभेत आवाज खणखणीत होता, परंतु उद्धव ठाकरे अंतिम पर्वात आल्याने त्यांची दमणूक झाल्याचे स्पष्टपणे जाणवणारे होते. मुद्दे तेच, पण जोश वा त्वेष गेलेला; अशी त्यांची अवस्था होती. स्थानिक पूररेषेसारख्या व ‘एलबीटी’च्या प्रश्नाला त्यांनी स्पर्श जरूर केला, परंतु भर होता तो भाजपाच्या समाचारावरच. ‘युती’ तुटल्याची बोच त्यांना किती सलते आहे हे उद्धवजींच्या बोलण्यातून पदोपदी प्रतीत होणारे होते. या सभेत सिन्नरचे उदय सांगळे यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. युवक कॉँग्रेस ते व्हाया राष्ट्रवादी, सेनेत आलेल्या सांगळेंमुळे सेनेला वंजारी समाजाचेही बळ लाभेल, परंतु तिकडे येवल्यात उद्धव ठाकरेंनी मैदान गाजवून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी भुजबळांसोबत जाण्याचा निर्णय घोषित करून सेनेला घरचा अहेर दिला. शिवसेनेला खरेच चांगले दिवस येऊ घातले असतील, तर अशी अवदसा कल्याणरावांना का आठवावी? प्रवाहाविरुद्धचे हे पोहणे जेव्हा घडून येते, तेव्हा घरातली आहे ती माणसे सांभाळली जात नसल्याचाच संकेत त्यातून जातो. निवडणुकीच्या काळात बेरजेचेच राजकारण करायचे असते. नांदगावात माजी आमदार पवार यांच्या बाबतीत ते जसे केले गेले, तसे येवल्यात झाले नाही. सर्वच पक्षीयांच्या सभांनंतर राज ठाकरे यांच्या सभा झाल्यात. जिल्ह्यातही काही उमेदवार उभे केले असताना त्यांनी प्राधान्य नाशकातील तीन जागांना दिले. यावरूनही खरेतर त्यांच्या पक्षाचा शहरी ‘आवाका’ लक्षात यावा. जिल्ह्यातील सर्वच सर्व जागांवर उमेदवार उभे असलेल्या ‘बसपा’च्या सर्वोच्च नेत्या बहन मायावती यांना नाशकातील शिखरेवाडीच्या मैदानावर सभा घ्यावी लागली, यावरून त्यांच्याही मर्यादा लक्षात याव्यात. एकूणच, या सर्व नेत्यांच्या प्रचारसभांनी माहौल मात्र टिपेस पोहोचल्याचे चित्र आहे.- किरण अग्रवाल