शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

शीतल सांगळे : स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न सुरु सिन्नरला आदर्श ‘आशां’चा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:19 IST

आरोग्य विभागाचे विविध उपक्रम व योजनांची ग्रामीण भागात सुयोग्य अंमलबाजावणीचे काम आशा स्वयंसेविका करतात. त्यांना शासनाकडून अतिशय कमी स्वरूपात मानधन दिले जात आहे.

ठळक मुद्दे‘आदर्श आशा’ गुणगौरव सभारंभआशा स्वयंसेविका महत्त्वाचा घटकआरोग्य विभागाचा डोलारा यशस्वी

सिन्नर : आरोग्य विभागाचे विविध उपक्रम व योजनांची ग्रामीण भागात सुयोग्य अंमलबाजावणीचे काम आशा स्वयंसेविका करतात. त्यांना शासनाकडून अतिशय कमी स्वरूपात मानधन दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्याशी नाळ जोडलेल्या आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले.येथील हॉटेल पंचवटीमध्ये ‘आशा दिवस’निमित्त आयोजित तालुकास्तरीय ‘आदर्श आशा’ गुणगौरव सभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समितीचे गटनेते संग्राम कातकाडे, सदस्य जगन्नाथ भाबड, भगवान पथवे, संगीता पावसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव व्यासपीठावर उपस्थित होते. जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्याला फार महत्त्व आहे. ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचा आशा स्वयंसेविका महत्त्वाचा घटक आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी केवळ कागदावर योजना तयार करतात. या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविका यशस्वी पार पाडत असल्याचे गौरवोद्गार सांगळे यांनी काढले. तालुक्यात सध्या उपकेंद्रात प्रसूतीची टक्केवारी ९८ टक्क्यांच्या घरात आहे. ती शंभर टक्के होण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सोबतच ग्रामीण भागातील मुलींच्या जन्मदरात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आशा स्वयंसेविकांनी जनजागृती करावी, असे आवाहन सांगळे यांनी केले. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. या परिस्थितीत आशा स्वयंसेविका काम करतात. एकीकडे गरोदर महिला प्रसूती आणि दुसरीकडे लोकसंख्येला अटकाव अशी दोन विरुद्ध टोकांची जबाबदारी त्या यशस्वीपणे पेलतात. खºया अर्थाने आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा पाया आहे. याच पायावर आरोग्य विभागाचा डोलारा यशस्वी उभा आहे. मात्र, मूळ पायाकडेच शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत आमदार राजाभााऊ वाजे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील आदर्श आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला.या ‘आशां’ना आले गौरविण्यातशैला सानप (दापूर), मंगल बैरागी, संगीता मालपाणी (देवपूर), सुरेखा जगताप (पांढुर्ली), माया गायधने (नायगाव), सुरेखा हिंगे (वावी), सरला आव्हाड (दापूर), संगीता साबळे (पांढुर्ली), गंगूबाई गोराणे (ठाणगाव), हेमलता कासार (वावी), चंद्रकला मंडले (ठाणगाव), नीता जाधव (नायगाव), शोभा डगळे (ठाणगाव), सरु बाई कातोरे (पांढुर्ली), योगीता भालेराव (दापूर), कुसुम जाधव (देवपूर), अर्चना काटे (वावी), वैशाली वाकचौरे (पांढुर्ली).